* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789357205306
  • Edition : 1
  • Publishing Year : AUG 2024
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 156
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SANJEEV GIRASE IS AN IMPORTANT NAME IN RURAL LITERATURE IN MAHARASHTRA. GIRASE`S STORIES ARE FACTUAL, APPEALING TO RURAL SENTIMENTS, AND THEY CONVERSE WITH THE HEART OF THE READER ON A MENTAL LEVEL. THOUGH IT IS TRUE THAT ONE SHOULD ADOPT PROGRESSIVE LIVING, WHEN IT CROSSES HUMAN, MENTAL, AND THEORETICAL LIMITS, IT HAPPENS TO BE OBSTRUCTIVE FOR CIRCLE OF NATURE. THIS MINUTE DEPICTION IS SEEN IN THE STORY TITLE `DABARA` (PUDDLE). THE WRITER HAS SUCCESSFULLY PORTRAYED THE CHARACTER “NIRMALA” WHO IS SINGLEHANDEDLY RAISING CHILDREN, STRIVING TO FULFILL THE FAMILY`S NEEDS, IN SPITE OF HER HUSBAND BEING A GAMBLER- IS SEEN IN THE STORY `HAREEK` (JOY). BHIMA APPA IS VERY WELL DEPICTED AS HE FIGHTS AGAINST POLITICAL POWER, TRADERS, CORRUPT SYSTEM, AND SOMETIMES NEGATIVE NATURE IN THE STORY `VAZA` (BURDEN) `HAREEK` SHOULD BE CONSIDERED AS THE COLLECTION OF STORIES DEPICTING THE DELVING DEEP AT THE BOTTOM OF RURAL LIFE. IN BRIEF, THESE STORIES DEPICT INDIVIDUAL MENTAL TURBULENCE, SMOTHERING, FINANCIAL CRISES, AND SOCIAL HONOR AND DISHONOR.
मराठी ग्रामीण साहित्य प्रकारातले एक महत्त्वाचे नाव संजीव गिरासे! मातीतून जन्मलेली कथा, त्याच मातीत जगणारा साहित्यिक याचा सुंदर मेळ संजीव गिरासेंच्या कथात्मसाहित्यात दिसून येतो. वास्तवाला स्पर्श करीत ग्रामीण भाव-भावनांना अलवार स्पर्श केला आहे. वाचकांच्या मानसिक पातळीवरून थेट हृदयाशी संवाद साधणाऱ्या गिरासेंच्या कथा आहेत. पुरोगामी विचार हे जगण्याचं अंग असावं हे सत्य असलं, तरी त्यातील मानवी, मानसिक आणि सैद्धान्तिक परिसीमा ओलांडणारं पुरोगामित्व सृिष्टचक्राच्या गतीत अडथळा आणणारं ठरतं, हे `डाबरं` या कथेतून व्यक्त होते. संसारासाठी जगायचं, मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडायचं, नवरा जुगारी, सटोड्या, असं असताना एकांगी लढा देणारी निर्मला लेखक `हारीक` या शीर्षक कथेतून समर्थपणे उभी करतो. निसर्ग, राजकीय सत्ता, पुढारी, व्यापारी, भ्रष्ट व्यवस्था यांच्याशी झगडणारा भीमा अप्पा `वझं` या कथोतून प्रभावीपणे समोर येतो. ग्रामीण जीवनाच्या तळाशी जाऊन शोध घेणारे कथात्मसाहित्य म्हणून `हारीक` या कथा समूहाकडे पाहायला हवे. सारांश, ग्राम जीवनातील व्यक्तिपरत्वे मानसिक आंदोलने, घालमेल, आर्थिक कुतरओढ आणि सामाजिक ताना-बाना अधोरेखित करणाऱ्या या कथा आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य#मेहतापब्लिशिंगहाऊस#मराठीपुस्तके#कथासंग्रह #हारीक #संजीवगिरासे #MEHTAPUBLISHINGHOUSE#MARATHIBOOKS#HARIK#STORIES#SANJEEVGIRASE
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.

GANDHALI
GANDHALI by RANJEET DESAI Rating Star
Vaidya

भर दुपारची वेळ! त्यात उन्हाळा... अंगाची लाहीलाही करणारी गर्मी...खिडकीतून बाहेर बघितल्यावर समोर दिसणारं ओसाड माळरान, त्यावर झगमगणाऱ्या उन्हाच्या झळा आणि तिथं असलेला एक पिंपळ ज्याची सगळी पानं झडून गेल्याने त्यातून पलीकडे दिसणारा डोंगर, त्या पिंपळाच्या ोडाच्या सावलीत बसलेली गाईगुरे त्यांच्या शेजारीच कपाळाला हात लावून बसलेला शेतकरी अस काहीसं चित्रं मला माझ्या खिडकीतून दिसलं, त्या झाडावर एका सुध्दा चिटपाखरू दिसलं नाही अशा वेळी अचानक वारा सुटला... माळरानावरची माती उडू लागली, एकाएकी काळे ढग दाटू लागले आणि पाण्यासाठी आसुसलेली धरणी त्या पहिल्या पावसाच्या थेंबांनी मोहरुन गेली... जणू काही कित्येक जन्मानी तिला तिच्या पहिल्या प्रेमाची भेट असावी... क्षणातच असा काही मातीचा सुगंध दरवळू लागला की त्यापुढे माणसाची मती गुंग व्हावी सारी अत्तरे फिकी पडावी असा तो दरवळ आणि माझ्या समोर असलेलं नुकतंच वाचून काढलेलं ``गंधाली" हे रणजित देसाई यांचं पुस्तकं... या दोन्ही गोष्टी मध्ये मला एकच साम्य जाणवलं... अस्सल भारतीय मातीत घडलेल्या काहीश्या विस्मरणात गेलेल्या अजरामर प्रेमकथा! यांचा दरवळ भारतीय जनमानसात शतकं उलटली तरी टिकून आहे. प्रेमासाठी आयुष्य पणाला लावणारे सलीम- मेहरूंन्निसा, बाजीरावांच्या मृत्यू नंतर विष प्राशन करणारी मस्तानी, आपल्या बुद्धिचातुर्याने ने पेशवे दरबार जिंकणारी माहेलका, एका अस्सल कलावंताच्या जीवनाचा सूर झालेली चुन्ना, आपल्या स्नेहाने इतरांचे आयुष्य उजळणाऱ्या पुतळाबाई अशा इतिहासाच्या पानांमध्ये लुप्त झालेल्या प्रेमकथा तुम्हाला प्रेमाची नव्याने ओळख करून देतील....मन गहिवरून जाईल... वेदनेची कळ येईल... खरोखरच लेखकाचे शब्द वाचकाच्या मनाचा ठाव घेतात ..आपण कितीही म्हणालो "प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं" तरी प्रेमाचा गंध आणि प्रेमाची गोष्ट वेगळीच!! ...Read more