* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386888617
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 440
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :MANJUSHREE GOKHALE COMBO SET -11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS NOVEL DESCRIBES THE WHOLE PORTRAIT OF GREAT SANT TUKARAM. THIS NOVELS ELABORATES EVERYTHING ABOUT SANT TUKARAM SUCH AS HIS BIRTH,CHILDHOOD,HIS FRIENDS, HIS BRILLIANCE,HIS DEVOTION TOWORDS GOD VITTHAL,FIRST UNSUCCESSFUL MARRIAGE ,THEN HIS SECOND MARRIAGE WITH AWALI,SCHOCKING DEMISES OF HIS BELOVED FIVE FAMILY MEMBERS WHICH ENDED LEAVING TUKARAM IN TOTALLY DRAINED CONDITION,THEN HIS TOTAL SURRENDER AT GOD VITTHAL`S FEET.HE STARTED WRITING ABHANGAS.LANGUAGE AND HIDDEN KNOWLEDGE IN IT WAS APPRECIATED AND WELL ACCEPTED,PRAISED BY HIS FOLLOWERS.A LEAGUE OF COMMON PEOPLE. THIS HAS MADE ,SO CALLED HIGHER AUTHORITIES IN COMMUNITY,TO ENVY TUKOBA.THEY ORDERED TO ABOLISH HIS ABHANGAS AS PUNISHMENT FOR HIS OFFENCE OF VIOLATION OF CHATURVARNA SYSTEM.BUT TUKARAM COULD NOT BE WIPED OUT FROM HIS FOLLOWERS MIND .TUKARAM ABHANGA GATHA WAS RECONSTRUCTED BY HIS FOLLOWERS.EVEN AFTER 500YRS IT REMAINED LOOMED IN MINDS OF MAHARASTRIANS.THIS NOVEL UNDERLINES GREATNESS OF TUKOBA.IT ALSO GIVES INFORMATION ABOUT THAT TIME`S HERITAGE,CULTURE,RITUALS,SOCIAL LIFE,AND MANY OTHER THINGS.
संत तुकोबाराय, गेली साडेचारशे वर्षे मराठी माणसाच्या मनावर अगदी सगळ्या जगभरातल्या मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे, अणू एवढ्या अस्तित्वापासून आकाशाएवढं महानपद मिळवणारे संत तुकाराम. माझी हेचि दान देगा देवा ही कादंबरी तुकोबांचा हाच अणू पासून आकाशापर्यंतचा जीवनपट अधोरेखित करते. तुकोबांवर अनेक प्रकाराने अनेकांनी लिखाण केलं. पण कादंबरी रुपातून तुकोबांच्या जन्मापासून ते वैकुंठ गमनापर्यंतच त्यांचं चरित्र आणि चारित्र्य ‘हेचि दान देगा देवा’ मध्ये मी शब्द बद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. तुकोबांच्या जीवनातील विशिष्ट-विशिष्ट कालखंडावर खूपच लिखाण आहे. पण अणू पासून आकाशापर्यंतचा तुकोबांचा जीवन आलेख यात मला मांडायचा होता आणि तो मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मी संशोधक नाही. चिंतन आणि मनन करणारी विचारवंत, अभ्यासकही नाही. पण तुकोबांच्या भक्तीवर आणि त्यांच्यातल्या भक्तावर श्रद्धा ठेवणारी, तुकोबांचे अभंग विचारधन म्हणून वाचणारी नक्कीच आहे. आणि हीच माझी भावना ही कादंबरी लिहताना उपयोगी ठरली. तुकोबा भक्त म्हणून थोर होतेच, कवी म्हणूनही थोर होते पण त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून मी त्याचं माणूसपण ही शोधलं. खरंतर तेही सर्वश्रुतच आहे. पण त्यांच्या अभंगातून मला त्यांचं आणखी काही वेगळेपण दिसलं आणि मग ते अधोरेखित करण्यासाठी माझ्या कल्पना विश्वातून मी प्रसंग तयार करत गेले. याचं जाता जाता एक उदाहरण द्यायचंच झालं तर तुकोबांना संस्कृत येत होतं ही बाब सगळ्यांनी गृहीत धरली आहे. कारण तुकोबांचा वेदांचा आणि भगवद् गीतेचा अभ्यास होता हे त्यांच्या अभंगातून जाणवतं. पण त्या काळातील समाज व्यवस्था लक्षात घेता तुकोबा सहजपणे संस्कृत शिकले असतील असं वाटत नाही. मग त्यांना संस्कृत येत होतं हे अधोरेखित करण्यासाठी माझ्या कल्पना विश्वातून मी एक प्रसंग तयार केला आणि त्यात तुकोबा संस्कृत भाषा कुठं, कशी शिकले असावेत असा अंदाज बांधून तो प्रसंग लिहीला. हा प्रसंग कादंबरीत मुळातून वाचणं नक्कीच आनंददायी ठरेल. तुकोबांच्या व्यक्तीमत्त्वातील अशा अनेक पैलूंना साकार करण्यासाठी असे अनेक प्रसंग माझ्या कल्पना विश्वातून निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला आहे. यातूनच मग आवली सोबतचा त्यांचा संसार, त्या दोघांचं भावबंध, एक पती म्हणून, पिता म्हणून, मित्र म्हणून, संत म्हणून, समाजसेवक म्हणून तुकोबा कसे दिसले, वागले, बोलले असतील याला काल्पनीक आणि भावनिक रंग देऊन प्रसंग फुलवत गेले. हे करत असताना तुकोबांच्याच अभंगांनी मला प्रेरणा दिली. ते प्रसंग तसे घडले नसतील ही कदाचित पण ते कादंबरीत मांडताना तुकोबांचे अभंगच त्यांना (प्रसंगांना) प्रमाण ठरले हे तितकेच खरे. तुकोबांची ‘मऊ मेणाहूनि आम्ही विष्णूदास’ अशीच प्रतिमा आत्तापर्यंतच्या तुकोबांवरच्या बहुतेक सर्व साहित्यात उभी केलेली दिसते. (काही अपवाद वगळता) आणि ती योग्यच आहे. पण त्यांच्या ‘कठीण वज्रास भेदू ऐसे’ या शब्दांतला चांगुलपणातला कणखरपणा अभावानेच अशा साहित्यात आलेला दिसतो. तुकोबांच्या व्यक्तीमत्त्वातला हाच कणखरपणा या कादंबरीत मला दाखवायचा होता. त्यासाठी मग काही काल्पनिक प्रसंगाची गुंफण केली आणि तुकोबांच्या अभंगातले खरे तुकोबा उभे केले. ‘‘जो जे वांछिल तो ते लाहो।’’ या ज्ञानेश्वर माऊलीच्या विश्वकल्याणाच्या पसायदानानंतर हेचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा।। हे तुकोबांचं विश्वशांतीचं मागणं हा आपल्या मराठी भाषेचा ललामभूत जागतिक वारसा आहे. या कादंबरीतून तोच वारसा जपण्याचा मी प्रयत्न केला आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या वाचकांना माझा हा प्रयत्न आवडेल या विश्वासानं ‘हेचि दान देगा देवा’ हे मागणं रसिकांच्या चरणी ठेवते आहे. वाचकांना ‘माझा विसर न व्हावा’ ही विनंती.
पुणे नगर वाचन मंदिर तर्फे` संत वाङ्मय विषयक ग्रंथ पुरस्कार ` - कवी ह.स. गोखले पुरस्कार २०१७ .

No Records Found
No Records Found
Keywords
#SANTTUKARAMMAHARAJ#HINDVISAMRAJYA#VITHAI# #SANTTUKARAMMAHARAJ#HINDVISAMRAJYA#VITHAI# #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more