* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789392482144
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2022
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 148
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN THIS EXCITING STORY COLLECTION MR.G.B.DESHMUKH TAKES US ON THE THRILLING JOURNEY OF THE FOREST IN MELGHAT. THOUGH MELGHAT FOREST IS KNOWN FOR THE EXISTENCE OF THE GREAT INDIAN TIGER, IT IS NOT EASY TO CATCH HIM IN A JUNGLE TOUR. EVEN FOREST OFFICERS TRAVEL MANY MILES, DAY & NIGHT TO HAVE A GLANCE OF THE TIGER. FOREST OFFICER RAVINDRA WANKHEDE SHARES & MR.DESHMUKH PENS IT DOWN SUCH NUMEROUS & HILARIOUS EXPERIENCES DURING HIS POSTING IN MELGHAT IN THIS UNPUTDOWNABLE BOOK.
कोरकु भाषेत ‘कुला’ म्हणजे वाघोबा. मेळघाटच्या जंगलातला हा कुलामामा जेवढा काळजात धडकी भरवणारा, तितकीच त्याच्याबद्दलची उत्सुकताही अधिक. रानवाटा तुडवत कुलामामाचं दर्शन घेताना इथं वनअधिकाऱ्यांनाही जद्दोजहद करावी लागते...पण त्यातूनच काही खुसखुशीत प्रसंग, पेचप्रसंग निर्माण होतात. असेच हे ‘कुलामामाच्या देशातले’ रंगतदात प्रसंग. वनाधिकारी रवींद्र वानखडे यांच्या सुरस जंगलकथा आणि जी.बी. देशमुख यांच्या खुमासदार लेखनशैलीचा हा अद्भुत मिलाफ.

No Records Found
No Records Found
Keywords
#KULAMAMACHYADESHAT #G.B.DESHMUKH #MELGHATFOREST #THEGREATINDIANTIGER #RAVINDRAWANKHEDE #MARATHISTORIES #MEHTAPUBLISHINGHOUSE #SHORTSTORIES #कुलामामाच्यादेशात #जीबीदेशमुख #रविंद्रवानखेडे #मराठीविनोदीकथा #भारतीयवाघ #मेळघाट #जंगलकथा #मराठीपुस्तके #मेहतापब्लिसिंगहाऊस
Customer Reviews
  • Rating Starअशोक वासुदेव बक्षी सातारा

    आजच आपले ज्येष्ठ वनाधिकारी श्री रवींद्र वानखडे यांच्या अनुभवावर आधारित ` कुलामामाच्या देशात` हे पुस्तक वाचले वाचून आनंद झाला. सेंट्रल एक्साईज चा खाजगी नोकरीत काम करताना माझा २५ वर्षे संबंध आला. या काळात अनेक अधिकाऱ्यांशी अगदी शिपायापासून ते अपीलेट मिशनर पर्यंत अनेक लोक पाहिले. पण आपल्या सारखा रसिक लेखक एकही पाहण्यात आला नाही. आपण अशा रुक्ष खात्यात काम करूनसुद्धा आपली रसिकता जोपासली आणि तिचा आनंद वाचकांना आपण विविध पुस्तकांद्वारे आणि दैनिकातील लेखांद्वारे दिलात या बद्दल आपले अभिनंदन आणि आभार. २०११ साली मी कुपोषणासाठी काम करणाऱ्या एका NGO ने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरासाठी १० दिवस मेळघाटात राहिलो होतो. त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. मेळघाट, तिथले प्राणी, तिथली माणसे आपण अगदी आपल्या लेखणीतून जिवंत केली आहेत. पुस्तक वाचल्यावर कुलामामाबद्दल आम्हाला प्रेम वाटू लागले. पुस्तकातली रेखाटने खूपच सुंदर आहेत आणि ती लेखाच्या परिणामकारकतेत भरच घालतात. पुस्तक वाचताना जणू काही श्री वानखडे साहेब आमच्याशी गप्पा मारताहेत असेच वाटत होते. वानखडेसाहेब आपल्या लेखणीतून आमच्याशी बोलले असेच श्री वानखडे साहेबाना आपण बोलते करून हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल आपल्याला धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. श्री वानखडे साहेबाना सुद्धा आमचे धन्यवाद सांगा. असेच लिहीत राहा आणि वाचकांना आनंद देत राहा. ...Read more

  • Rating Starमिहीर गोगटे, पुणे

    गेल्या आठवड्यात जर्मनीला आलो. येताना `कुलामामांना...` बरोबर घेऊन आलो. आत्ताच पुस्तक वाचून झालं. प्रस्तावने पासूनच लिखाणशैली भावली आणि गोष्टींची अनोखी मजा आली. वनसेवक / वनरक्षक व त्यांचे कार्य अतीमोलाचे असून सामन्यांना त्याची काहीच जाणीव नाही ही खरी ुखःद गोष्ट आहे. वानखेडे साहेब व त्यांनी कौतुकाने उल्लेख केलेल्या त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या कर्तव्या पलीकडील वन आणि वन्यजीव प्रेमापोटी व जागरूक जबाबदारीनं केलेली व करत असलेल्या कार्यास मनापासून सलाम. सर्वच गोष्टी जरी रोचक असल्यातरी वानखेडे साहेबांची संवेदनशीलता `बानाढाप`, `हिरुबाई..` आणि `महाकाय आकांत`नी हलवून टाकलं. पुस्तक खूप आवडलं. अजून खूप लोकांपर्यंत पोचवायला हवं. ...Read more

  • Rating Starश्री. दीपक पांडे

    `कुलामामाच्या देशात ....` उत्कंठावर्धक व्याघ्रकथा श्री. रवींद्र वानखडे यांनी स्व- अनुभवावरून सांगितलेल्या वाघांसंबंधीच्या चित्तथरारक अनुभवकथांचे हे संकलन श्री. जी. बी. देशमुख यांच्या समर्थ लेखणीतून आपल्याला जंगलसफारी घडवून आणते व आजपर्यंत वाघ न पाहिेल्यांना `आपणसुद्धा व्याघ्र दर्शन करावे` हे कुतूहल मनात उत्पन्न करते. लेखक स्वतः अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचे अभ्यासक असल्यामुळे अमिताभ यांच्या चित्रपटातील डायलॉग्जचा विशेष उल्लेख पुस्तकात दिसून येतो. यातील मला सर्वात जास्त आवडलेल्या दोन कथा म्हणजे `आज्ञाधारक बच्चू` आणि `खुश रहना मेरे यार... `आज्ञाधारक बच्चू` या कथेत एका प्रसंगात वाघिणीचं पिल्लू एकाच जागेवर उभं राहतं. आज्ञाधारकपणा मनाला भावतो व त्यातून मानवप्राण्याने सुद्धा बोध घ्यावा अशी ही कथा आहे. प्रत्येक कथेत मानवाने प्राण्यांकडून शिकण्यासारखे काहीतरी आहेच. `खुश रहना मेरे यार....` या कथेतील हत्तीच्या हातून चुकून झालेल्या आपल्या सवंगड्याची (माहुताची) हत्या त्याला अस्वस्थ करते आणि थोड्याच कालावधीत त्याचा सुद्धा करुण अं होतो. हे त्यांच्यातील मैत्रीचे अतूट नाते वाचकाला डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. `कुलामामाच्या देशात` या पुस्तकातील कथेच्या दीर्घकथा करण्याच्या मोहात न अडकता मोजक्या शब्दांत मांडणी करून ह्या लघुकथा आपल्याला खिळवून धरतात. कमीत कमी शब्दांत लेखांची मांडणी ही जी. बी. देशमुख यांची हातोटी सर्व पुस्तकांतून दिसून येते. अ- अमिताभचामध्ये सुद्धा त्यांनी हे कौशल्य दाखवले आहे. श्री. रवींद्र वानखेडे यांनी त्यांची चित्तथरारक, साहसी अनुभवांची पोतडी सामान्य वाचकांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आणि लेखकांचे विशेष आभार ! -- ...Read more

  • Rating StarMs.Pratiksha Kale, Asstt. Conservator of Forest .

    I would appreciate the way of writing where wildlife and humanlife are metaphorically connected throughout the book. It is equally good in making reader friendly by quoting ongoing issues,like movies. It`s a very nice book. Keen observation and inquisitiveness about wildlife and it`s behaviour; minute details of tribal culture are noteworthy. Happy to read and learn things. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more