* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: LADHA LOKPALCHA UDREK AAM ADMICHA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184985450
  • Edition : 1
  • Publishing Year : 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 208
  • Language : MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IT IS AS IF INDIA HAS BECOME A RICH COUNTRY OF POOR PEOPLE. IT WAS DURING THIS PERIOD THAT THE COUNTRY GOT A `LOKPAL` DUE TO THE FIERCE STRUGGLE OF AAM AADMI AND SOCIAL WORKERS. PEOPLE ARE NOW STRUGGLING AGAINST INJUSTICE, EVEN WITHOUT LEADERSHIP. THIS IS A PROMISING PICTURE FOR A LIVING, STRONG, VIBRANT DEMOCRACY. INFILTRATION IS CURRENTLY GOING ON IN ALL STRATA OF SOCIETY. WHY IS ALL THIS HAPPENING NOW? THIS IS AN ATTEMPT TO FIND THE ANSWER TO THIS QUESTION.
देशात आज ५५ कोटी मोबाईल फोन, तर चौदा कोटी इंटरनेट कनेक्शन्स आहेत. रस्त्यावर दर मिनिटाला वीस नव्या कोNया मोटरसायकल, तर तासाला दोनशे चकचकीत चारचाकी गाड्या दाखल होत आहेत. सुबत्तेची गंगा दुथडी भरून वाहत असताना दुसNया बाजूला जनता भ्रष्टाचार, अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरत आहे. ‘भारत हा जणू गरीब लोकांचा श्रीमंत देश बनला आहे.’ नेमक्या अशा काळातच आम आदमीच्या आणि समाजसेवकांच्या चिवट लढ्याने देशाला ‘लोकपाल’ मिळाला. अन्यायाविरोधात लोक आता कोणाचे नेतृत्व नसले, तरी संघर्ष करीत आहेत. जिवंत, सशक्त, सळसळत्या लोकशाहीसाठी हे आश्वासक चित्र आहे. समाजाच्या सर्व थरांत सध्या घुसळण सुरू आहे. हे सारे नेमके आताच का घडत आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा केलेला हा प्रयत्न....
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #LADHALOKPALCHAUDREKAAMADMICHA #LADHALOKPALCHAUDREKAAMADMICHA #लढालोकपालचाउद्रेकआमआदमीचा #POLITICS&GOVERNMENT #MARATHI #DHANANJAYBIJALE #धनंजयबिजले "
Customer Reviews
  • Rating StarDaily Sakal – 23-11-14

    देशात सध्या तरुणवर्गाची संख्या वाढतेय. २०२०मध्ये याच तरुणाईची संख्या ५५ कोटीच्या घरात जाईल. तरुण मंडळी अन्यायाच्या विरोधात पटकन सक्रिय होतात. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत लोकपाल कायद्यासाठी आंदोलन केलं आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंगयांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला लोकपाल कायदा करावा लागला. अण्णांच्या आंदोलनाचा जोरच इतका होता, की या कायद्याला संसदेत सर्वच पक्षांच्या सदस्यांनी पाठिंबा दिला. अण्णांच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून हा कायदा झाला. इतकच नाही तर दिल्लीत आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली सरकारही स्थापन झालं. अण्णांचं आंदोलन आणि केजरीवाल यांच्या सरकारची स्थापना या घटनाक्रमाची सविस्तर नोंद हे पुस्तक घेतं. पत्रकार धनंजय बिजले यांनी या आंदोलनामागचे प्रवाह आणि त्यातील सहभागी मंडळींच्या कार्याची नेमकी माहिती दिली आहे. अण्णांच्या या आंदोलनापूर्वींच्या राज्यातील विविध प्रश्नांसंबधीच्या आंदोलनांचीही माहितीही या पुस्तकात त्यांनी दिली आहे. अकरा प्रकरणांमध्ये या आंदोलनाची माहिती देतानाच बिजले यांनी केजरीवाल यांचीही सविस्तर माहिती दिली आहे. सरकारी सेवेत प्रवेश केल्यावर त्यांना आलेले विचित्र अनुभव आणि मग त्यांनी जनआंदोलनात घेतलेला पुढाकार हे सगळं या पुस्तकामुळं नीटपणानं समजून घेता येतं. लोकपालच्या प्रश्नावरून देशात एक आंदोलन अत्यंत कमी वेळात कसं उभं राहिलं आणि त्याची व्याप्ती कशी पसरली, याचा सगळा प्रवास या पुस्तकातून समजून घेता येतो. आज केजरीवाल सत्तेच्या परिघातून बाहेर फेकले गेले आहेत; पण त्या मंतरलेल्या दिवसाच्या काळातील सा-या घटना या पुस्तकामुळं ताज्या होतात. केजरीवाल आणि अण्णांच्या आंदोलनाचा परिणाम आणि त्या काळात नेमकं काय घडल, हे समजून घ्यायचं असेल, तर हे पुस्तक उपयोगी ठरतं. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more