* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AWAKENING THE ENTREPRENEUR WITHIN: HOW ORDINARY PEOPLE CAN CREATE EXTRAORDINARY COMPANIES
  • Availability : Available
  • Translators : SHEKAR JOSHI
  • ISBN : 9788184988833
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 252
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
AWAKENING THE ENTREPRENEUR WITHIN HOW ORDINARY PEOPLE CAN CREATE EXTRAORDINARY COMPANIES EVERY STARTUP IN THE WORLD-BEFORE IT WAS A STARTUP-BEGAN AS A DREAM IN THE MIND OF A VISIONARY WHO HAD THE AUDACITY TO TAKE THEIR MIND SOMEWHERE IT HAD NEVER BEEN BEFORE. BUT BOOKS ON ENTREPRENEURS AND ENTREPRENEURSHIP NEVER FULLY ADDRESS THIS SINGLE MOST IMPORTANT PART OF THE ENTIRE PROCESS: HOW TO DREAM, AND HOW TO TAKE THAT DREAM AND TURN IT INTO REALITY. NOW MICHAEL GERBER, RENOWNED AS THE MAN BEHIND E-MYTH, THE MAN WHO TAUGHT GENERATIONS OF ENTREPRENEURS TO TAKE THEIR EXISTING BUSINESSES TO THE NEXT LEVEL, SHOWS HOW ORDINARY PEOPLE CAN CREATE EXTRAORDINARY COMPANIES-WITHOUT ANY EXPERIENCE TO GUIDE THEM. FOR ANYONE WHOS EVER DREAMED OF MOVING BEYOND THEIR WORKADAY JOB TO CREATE THEIR OWN VISION-OR TRIED TO DO SO AND STRUGGLED-THIS BOOK, FROM THE FOREMOST ADVISOR TO ENTREPRENEURS WORLDWIDE-, WILL SHOW THEM HOW THEY TOO CAN AWAKEN THEIR INNER ENTREPRENEUR BY FOCUSING ON THE FOUR DIMENSIONS OF THE ENTRPRENEURIAL PERSONALITY: THE DREAMER THE THINKER THE PERFORMER THE LEADER IN AWAKENING THE ENTREPRENEUR WITHIN, GERBER SHOWS US HOW A SUCCESSFUL VENTURE- -AND VENTURER-MUST EMBRACE EACH OF THESE FOUR FACETS TO SUCCEED. THIS IS TRULY AN ESSENTIAL READ FOR ANYONE READY TO MAKE THEIR DREAMS A REALITY. ABOUT THE AUTHOR: MICHAEL E GERBER MICHAEL E. GERBER IS A SMALL BUSINESS GURU, BEST-SELLING AUTHOR (OVER 8 MILLION COPIES COMBINED SALES WORLDWIDE), THE CO-FOUNDER AND CHAIRMAN OF MICHAEL E. GERBER COMPANIES-A GROUP OF HIGHLY UNIQUE ENTERPRISE DEDICATED TO CREATING WORLD-CLASS START-UPS AND TO AWAKEN THE ENTREPRENEUR IN EVERY INDUSTRY AND ECONOMY-A COMPANY THAT TRANSFORMS THE WAY SMALL BUSINESS OWNERS GROW THEIR COMPANIES AND WHICH HAS EVOLVED INTO AN EMPIRE OVER ITS HISTORY OF NEARLY THREE DECADES. MICHAEL E. GERBERS PASSION AND GENIUS FOR UNDERSTANDING ENTREPRENEURS AND THE WORKINGS OF SMALL BUSINESS IS THE CRUZ OF HIS TREMENDOUS GLOBAL APPEAL AND SUCCESS.
अवेकिंनग द आंत्रप्रिनर विदिन ‘भव्य स्वप्नाविना व्यवसाय म्हणजे उद्दिष्टहीन जीवन!’ मायकेल इ. जर्बर स्वप्न, दूरदृष्टी, उद्दिष्ट आणि मिशन्स हे चार शब्द आंतरराष्ट्रीय स्तरावरील लघुउद्योगांचे गुरू आणि सर्वाधिक खपांच्या ग्रंथांचे लेखक मायकेल इ. जर्बर यांच्या जीवनाचे सार आहे. उद्योग, व्यवसायांत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची किमया जर्बर यांनी १९७७ मध्ये ‘इ-मिथ वल्र्डवाईड’ या कंपनीची स्थापना केली तेव्हापासून साधली आहे. आता त्यांनी ड्रिमिंग रूमची र्निमिती केली आहे. इथे लघु उद्योजक एकत्र येतात आणि स्वप्नांना वास्तवात आणण्याचे मार्ग शोधतात. ‘अवेकिंनग द आंत्रप्रिनर विदिन’ या पुस्तकाद्वारे तुमचा उद्योग सफल आणि आर्थिकदृष्ट्या यशस्वी कसा करायचा याचा परिपाठच ते तुम्हाला देतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #LAGHUUDYOJAKANCHAMARGADARSHAK #AWAKENINGTHEENTREPRENEURWITHIN #लघुउद्योजकांचा मार्गदर्शक #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SHEKARJOSHI #MICHAELE.GERBER "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 3-1-2016

    ‘भव्य स्वप्नाविना व्यवसाय म्हणजे उद्दिष्टहीन जीवन!’ – मायकेल इ. जर्बर स्वप्न, दूरदृष्टी, उद्दीष्ट आणि मिशन्स हे चार शब्द आंतरराष्ट्रीय स्तरावरील लघुउद्योगांचे गुरू आणि सर्वाधिक खपांच्या ग्रंथांचे लेखक मायकेल इ. जर्बर यांच्या जीवनाचे सार आहे. उद्योग व्यवसायात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची किमया जर्बर यांना १९७७ मध्ये ‘ई-मिथ वर्ल्डवाईड’ या कंपनीची स्थापना केली तेव्हापासून साधली आहे. आता त्यांनी ड्रिमिंग रूमची निर्मिती केलीआहे. इथे लघु उद्योजक एकत्र येतात आणि स्वप्नांना वास्तवात आणण्याचे मार्ग शोधतात. ‘अवेकनिंग द आंत्रप्रिनर विदिन’ या पुस्तकाद्वारे तुमचा उद्योग सफल आणि आर्थिकदृष्ट्या यशस्वी कसा करायचा याचा परिपाठच ते तुम्हाला देतात. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    शैक्षणिक रजा घेऊन मी आणि माझी पत्नी मार्गी १९७६ मध्ये कॅलिफोर्नियात दाखल झालो. मॅसॅच्युसेट विद्यापीठात मला पूर्ण वेळ प्राध्यापक म्हणून नेमण्यात आलं होतं आणि मार्गीने आपली पीएच.डी तिथेच पूर्ण केली होती. कॅलिफोर्नियात फार तर वर्षभर राहायचं, असं आम्ही ठवलं होतं आणि आता त्या गोष्टीला ३० वर्षे पूर्ण होताहेत. या मधल्या काळात नेमकं काय झालं? या काळात आम्हाला उद्योजक होण्याची स्वप्नं पडू लागली होती, जगात काहीतरी बदल घडवून आणायचा, त्यासाठी आपल्या जवळच्या माणसांना चार गोष्टी शिकवायच्या, या उद्देशाने आम्ही आमची उद्योग प्रशिक्षण आणि विकास संस्था स्थापन करण्याचं ठरवलं. सुरुवातीच्या काळात ‘आंत्रप्रिनर’ या शब्दाचं स्पेलिंगही आम्हाला माहीत नव्हतं आणि आज आमच्या उद्योगाचा पसारा एवढा वाढला आहे की, आमच्या संस्थेच्या एस्कॉनडीडो, कॅलिफोर्निया, टोरँटो आणि लंडन येथे शाखा आहेत. त्याशिवाय इतर वीस देशांत आमची भागीदारी आहे. आज आमच्या संस्थेत ३०० जण काम करत आहेत. यशस्वितेच्या सर्व परिमाणांचा विचार केला, तर आम्ही यशस्वी झालो, असं म्हणता येईल. पण मित्रांनो, इथंपर्यंत पोहोचणं तरी साधंसुधं काम होतं काय? १९८० पर्यंत आम्हाला खर्चाची तोंडमिळवणी करणंच कठीण जात होतं. तुमची संस्था तोट्यात चालली आहे आणि त्याची तुम्हाला कल्पनाही नाही, असं आमच्या अकौंटसने वारंवार सांगून पाहिलं. संस्थेची परिस्थिती सुधारावी यासाठी आम्ही तीन वेळा बाहेरचे चांगले अनुभवी व्यवस्थापक रुजू करून घेतले, पण अपेक्षित यश देण्यात ते असमर्थ ठरले आणि आमचा संस्थेच्या गाडा आम्हीच ओढायला पाहिजे. या निर्णयप्रत आम्ही आलो. त्यावेळी मायकेल जर्बर जर आम्हाला भेटला, तर चित्र काही वेगळंच असतं. ‘छोट्या उद्योगांचा गुरु’ म्हणून संपूर्ण जगात मायकेल जर्बरची ओळख आहे. एखाद्याला हे अतिशयोक्तीपूर्ण वाटेल, पण मी खात्रीपूर्वक सांगतो की, मायकेलचं काम खरोखरच त्या तोडीचं आहे. मायकेलच्या उदंड लोकप्रियता लाभलेल्या ‘इ-मिथ’ पुस्तकांच्या आधाराने जगातील हजारो उद्योजकांनी यशाची नवनवी शिखरं पादाक्रांत केली आहेत. ‘अवेकनिंग द आंत्रप्रिनर विदिन’ या पुस्तकाचे तुमची नाडी अचूकपणे हेरली आहे. त्याच्या ‘ड्रिमिंग रुम’मध्ये प्रवेश करून आतापर्यंत जे तुम्हाला कल्पनातीत वाटत होतं, ते शक्य आहे, हे तो सिद्ध करतो. या पुस्तकातील प्रत्येक शब्द माझ्या मनात झिरपत नाही. तोपर्यंत ते बाजूला ठेवायचं नाही, असं मी ठरवलं होतं. हे पुस्तक तुमच्यातील सुप्त उद्योजक जागा करीलच; पण तुमचं आयुष्यही बदलून टाकील. यशस्वी उद्योजक बनण्याच्या स्वप्नांचा पाठपुरावा मायकेल तुमचा वाटाडया आहे. त्यामुळे तुम्हाला कशाचीही चिंता करण्याचं कारण नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
साधना साप्ताहिक ३ ऑगस्ट २०२४ ... अशोक राणे

सुनंदा अमरापूरकर यांनी त्यांचं `खुलभर दुधाची कहाणी` हे आत्मकथन पाठवलं तेव्हा `आता हे वाचायचं केव्हा` असा प्रश्न सर्वप्रथम मनाशी आला. देणेकरी दाराशी ठाण मांडून बसावेत तशी अनेक पुस्तकं, कोणी कोणी पाठवलेल्या त्यांच्या फिल्म्स आणि माझे सतराशे साठ व्याप सोर असताना कसा वेळ काढायचा? माझं सबंध आयुष्य सिनेमा, तो आकाराला आणणारे दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ, त्यांच्या निर्मितीमागच्या प्रेरणा आणि त्यांच्यातला माणूस याचा शोध घेण्यात गेलं. एका गोष्टीचं कुतूहल होतं आणि ते म्हणजे या सर्वांच्या पलीकडे असलेलं, परंतु क्वचितच कळलेलं असं त्यांच्या कुटुंबातल्याच व्यक्तीने वर्णिलेलं अमरापूरकरांचं चरित्र ! सगळी व्यवधानं बाजूला ठेवून सुनंदा अमरापूरकरांचं आत्मकथन वाचायला हे कुतूहल पुरलं. मनोगतातलं पहिलंच वाक्य आहे... `मी या आठवणी का लिहिल्या ?` ...आणि मला चट्‌कन थोर अभिजात अभिनेत्री इंग्रीड बर्गमन हिचं `माय स्टोरी` आठवलं. तिनेही अशीच सुरुवात केलीय. तिची मुलं म्हणाली, `तुझ्या आयुष्याविषयी कुणी तरी तिखटमीठ लावून काहीबाही लिहील, त्याआधी तूच सारं खरं मोकळेपणानं सांगून टाक. तिने जाडजूड ग्रंथात अभिनेत्री म्हणून तिचा सारा प्रवास कसलाही आडपडदा न ठेवता सविस्तर सांगितला. सुनंदाताईंचं पुस्तक आणि त्यातलं हे पहिलं वाक्य वाचताना मला हे का आठवावं? त्यांची पहिली ओळख म्हणजे नाट्य-चित्रसृष्टीतला एक मोठा अभिनेता, दिग्दर्शक सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी आणि अलीकडचा परिचय म्हणजे एक उत्तम अनुवादकर्त्या. तर आता त्या आपल्या प्रसिद्ध नवऱ्याविषयी काय आणि कसं सांगतात, त्याचबरोबर त्यांचं वैवाहिक सहजीवन, एकूणच त्यांचं कौटुंबिक जीवन कसं उलगडून दाखवतात याचं कुतूहल होतं. मुख्य म्हणजे त्यांची मध्यमवर्गीय पार्श्वभूमी आणि सदाशिव अमरापूरकरांना मुंबईत स्थैर्य लाभेपर्यंत नगरसारख्या छोटया शहरातला त्यांचा वावर यातून पुढला सारा अचंबित करणारा प्रवास त्या का मांडतात याचीही उत्सुकता मनात होतीच, अमरापूरकर कुटुंबाचा प्रवास हा केवळ नगर ते मुंबई नव्हता. एखाद्या नवख्या नटाने रंगमंचाच्या अंधाऱ्या अवकाशात प्रवेश करावा आणि अचानक त्याच्यावर सर्व अंगांनी प्रखर प्रकाशझोत यावा, त्याचे डोळे इतके दिपून जावेत की त्याला ते नीट उघडून सभोवताल पाहता येऊ नये असाच काहीसा अनुभव या कुटुंबाने घेतला आहे. प्रायोगिक वे व्यावसायिक रंगभूमी हे स्थित्यंतर तसं फार तर कनिष्ठ ते उच्च मध्यमवर्गीय याच काहीशा परिचित अवकाशातलं; परंतु हिंदी सिनेमातली प्रसिद्धी तर भिरभिरावून टाकणारी. ते अंगावर घेत, वागवत या कुटुंबाने कशी वाटचाल केली हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. एवढी प्रचंड प्रसिद्धी आणि वलय लाभूनही अमरापूरकर कधी फिल्मी झाले नाहीत हे वाटतं तितके सोपे नाही. `खुलभर दुधाची कहाणी यातून ते उलगडणार होते... वाचायला सुरुवात केल्यावर ते खूप तपशीलवार आणि पसरटही वाटलं. पण वाचत गेलो तसतसं लक्षात आलं की, सुनंदाताईंनी चितारलेला परिसर तप‌शिलातल्या काही फरकाने आपलाही आहे. आपणच प्रत्यक्ष जगलेले, पाहिलेल वाचतो आहोत. साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या आमच्या शाळकरी वयापासून वाचलेल्या साहित्यातून हेच सर्व पाहत आलोय. आपल्या मुलांच्या आणि नातवंडाच्या पिढीला तर हा काळ अवकाश सर्वस्वी अपरिचित. हे त्यांच्यासाठीही आहे. आजच्या नव्या पिढीला 2000 चा चित्रपट जुना वाटतो, तेव्हा त्याआधीच्या त्यांच्या आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या सिनेमाशी आपण जसा त्यांचा परिचय करून देतो तसंच आहे हे. शिवाय या कथनाच्या नायिकेने पुढे अपरिहार्य असं जे वळण गाठलं आहे, त्यासाठी हे आवश्यकच आहे. संथ लयीत सुरू झालेलं आणि काहीसं रेंगाळल्यासारखं वाटणारं गाणं उत्तरोत्तर हलक्याशा द्रुत लयीत समेवर यावं असं हे आत्मकथन आहे. तरीही पूर्वार्धावर थोडे अधिक संपादकीय संस्कार झाले असते, तर आवश्यक असणाऱ्या संथ लयीला रेंगाळावं लागलं नसतं. `प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते` या प्रसिद्ध उक्तीच्या पलीकडे इथे काहीतरी आहे. ही नायिका इथे केवळ एवढ्याच भूमिकेत नाही. ही भूमिका पार पाडताना तिने सर्व प्रकारे गांगरवून टाकणाऱ्या परिस्थितीतही स्वतःला जपलं, स्वतःमधल्या गुणांना जमेल तसं आणि तेवढं खतपाणी घालत जोपासलं आणि आपली म्हणून एक ओळख निर्माण केली. ज्या संपूर्णतः अकल्पित, अनपेक्षित जबाबदाऱ्या येऊन पडल्या, त्या लीलया पार पाडत तिने आपलं व्यक्तिमत्त्व जपलं. `मीच एकटीने सारं पहायचं` असा सतत तक्रारखोर धोशा लावत एखादी कर्कशा झाली असती; परंतु सुनंदाताईंचं तसं झालं नाही. म्हणून पुस्तक वाचून झाल्यावर फोनवर मी त्यांना एवढंच म्हणालो, `माउली, कुठून गं इतकी ऊर्जा आणलीस?` 1950 चं दशक, त्याआधीचा आणि नंतरचाही काळ तसा गरिबीचा आहे. समाजाच्या सर्व थरांत अभावग्रस्तता आहे. कसला अभाव आहे याचीही त्या काळ अवकाशाला जाण नाही. आहे ते गोड मानून घेत जगण्याचा हा काळ. या सामाजिक स्तराखाली असाहाय्यपणे जगणारा एक वर्ग आहे. त्याचीही वास्तपुस्त करण्याची गरज या वातावरणात आहे. परंतु सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे संस्कारक्षम घडण्याची, घडविण्याची, अभावग्रस्तता तिथे महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या या नायिकेला हे पर्यावरण लाभलं आहे. त्यांचे वडील मुलं लहान असतानाच गेले. नंतर घरही गेलं आणि मुलांना घेऊन आईला देवळात राहावं लागलं. आहे त्या परिस्थितीतून वाट काढावी या धारणेत सभोवतालच्या सुसंस्कृत वातावरणाचाही मोठा आधार होता. ते सारं मुळातून वाचण्यासारखं आहे. यात गरिबीतले दिवस, हलाखी, अभावग्रस्तता यांपेक्षा हे संस्कार सर्वांत महत्त्वाचे आहेत हे सहजपणे अधोरेखित केलेले आहे. वर ज्या ऊर्जेचा उल्लेख केलाय ती इथूनच सुनंदाताईंना मिळाली आणि म्हणूनच यशस्वी नवन्याच्या पाठीशी उभ्या राहताना त्या स्वतः सर्वप्रकारे यशस्वी ठरल्या आहेत. त्यांच्या आणि अमरापूरकरांच्या कथेला कुठून कुठे नेऊन ठेवणारं वळण शाळा-कॉलेजच्या वयातच आलं. नाटक ! अमरापूरकर म्हणजे नाटक आणि नाटक म्हणजे अमरापूरकर असं हे रसायन होतं. सुनंदाताईही नगरच्या त्या छोट्या नाट्यअवकाशात मनापासून वावरत होत्या. सोबत, साथ होती अमरापूरकरांची. परंतु हा माणूस स्वतःमधल्या रंगकर्मीत इतका खोलवर बुडालेला होता की, जिच्या तो प्रेमात पडलाय; तिलाही नाटकाची आवड आहे; नोंद घेण्याजोगे कलागुण आहेत, तिच्यातला कलावंत घडविण्यात मात्र त्याने रस दाखविला नाही. इतकंच नाही तर पुढे मुंबईत यश मिळविल्यानंतर, बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाल्यानंतरही सुनंदाताईंनी `यशस्वी पुरुषामागे...` ची सर्व प्रकारची भूमिका यशस्वीपणे पार पाडल्यानंतर जेव्हा ऑफिसच्या नाटकात काम करायचं ठरवलं, तेव्हा यांनी त्यास ठाम नकार दिला. इथे पुस्तकातला एक प्रसंग आठवतो. नगरमध्ये नाटकाची तालीम चालली होती. अमरापूरकर खूप सिगरेट्स ओढतात म्हणून पाकीट लपवून ठेवण्यात आलं होतं. पण जसजशी तलफ अनावर होत गेली, तसतसे ते अस्वस्थ होत गेले. नाटकावरून त्यांचं लक्ष उडत चाललं होत. तेव्हा सुनंदाताईनी आपल्या पर्समध्ये लपवून ठेवलेल्या पाकिटातून दोन सिगरेट्स आणून दिल्या. हीच लग्ना आधीची प्रेयसी नंतर पत्नी, गृहिणीच्या भूमिकेतही त्याला असंच सांभाळते. अमरापूरकरांची नाट्यवेडापायी अडलेली त्यांची पदवी या पद‌वीधारक मुलीशी लग्न ठरल्यानंतर ते पूर्ण करतात. इथे लग्न पार पडतं आणि हे भाऊ म्हणतात, `मला पुण्यात राहून एम.ए. करायच आहे. ही बाई हो ला हो करते. नववधू म्हणून तक्रार करत नाही. शिक्षण पूर्ण करून नोकरी करणारी ही मुलगी नोकरीधंदा न करणाऱ्या मुलाशी लग्न करते. तो काळ आणि लहान गाव हे लक्षात घेतलं, तर कदाचित कल्पना येईल की किती अवघड होतं ते. यांचं भांडवल काय तर पिढीजात वाडा आणि व्यवसाय. बरं त्या व्यवसायात तरी सहभाग तर तोही नाही. दिवसरात्र एकच ध्यास. एकच नाद... नाटक पुढे मिळणारे अमाप यश आणि वैभव यांची काही अंशी तरी शक्यता आणवली असेल, तर तसंही काही नव्हतं. आपलं मानलं आणि निभावलं. असेल तर एक विचार मनाशी असेल आधार द्यायला, याची कलानिष्ठा सोळा आपणे सच ! तिथे अन्य गोष्टीला थारा नाही. ते मात्र खरंच होतं. अमरापूरकरांमधला अस्वस्थ रंगकर्मी त्यांना कायमचा मुंबईत घेऊन आला आणि मग सर्वाच्या वाट्याला येतो तसा स्ट्रगल करत ते आधी व्यावसायिक रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक म्हणून यशस्वी होता होता अनपेक्षितपणे सिनेमात जाऊन पोहोचले आणि `अर्धसत्य` नंतर रेस्ट इज द हिस्टरी असा पुढला प्रवास घडला. या आत्मकथनात तो तपशीलवार वाचायला मिळेलच. परंतु त्यात महत्त्वाचं आहे ते भाड्याच्या घरात पितळी स्टोव्ह आणून मुंबईतल्या संसाराला केलेली सुरुवात ते नंतर ऑडीसारख्या महागड्या परदेशी गाड्यांपर्यंत झालेला प्रवास... आणि त्याहीपेक्षा हे घबाड सहजपणे घेणं, हाताळणं, स्वतः सुनंदाताईंनी, अमरापूरकरांनी आणि त्यांच्या तीन मुलींनीही. एकीकडे हे वैभव आणि दुसरीकडे मध्यमवर्गीय साध्या राहणीचे संस्कार ! दस्तुरखुद्द अमरापूरकर तसेच होते, परंतु त्यांच्या प्रचंड बिझी शेड्यूलमध्ये घरच्या आघाडीवर निगुतीने सांभाळलं, निभावून नेलं ते सुनंदाताईंनी. बरं हे करता करता आपली नोकरीही सांभाळली. मुलींची शाळा- कॉलेज, त्यांची जडणघडण, इतर साऱ्या सांसारिक बाबी, अमरापूरकरांच्या वाढत्या उत्पन्नाचं व्यवस्थापन, त्यासाठी नेमावयाचा चार्टर्ड अकाउंटंट वगैरे. आणि हे सारं करताना जे जग कालपरवापर्यंत आपल्यापासून दूर होतं तिथे सहज शिरकाव करण्याची, तिथल्या स्टार मंडळींमध्ये बावरण्याची संधी असताना ते स्वतःहून दूर ठेवणं, आपल्या मुलींनाही त्याचं आकर्षण वाटणार नाही याची काळजी घेणं हे अवघड काम या माउलीने सहज केलंय. अशीच कमाल त्यांनी केली ती त्यांच्या आई, सासू- सासरे आणि अमरापूरकरांच्या घरातच असलेल्या आत्याबाई ताई यांच्या व्यक्तिरेखा, त्यांच्याशी असलेलं नातं आणि रोजचा संबंध यांविषयी लिहिताना. त्यातून त्या वेळचा काळ अवकाश आणि बदलता कौटुंबिक सामाजिक - पोतही सहजपणे दिसून येतो. सासरे म्हणजे घरातला अखेरचा शब्द हे मनाशी कायम मानलेलं. स्वीकारलेलं. परंतु एक वेळ अशी येते की, मागल्या पिढीतलं कुणी दुखावलं तरी त्याची क्षिती न बाळगता, नव्या पिढीला आपली वाट काढावी लागते. कारण तिच्या काळ - अवकाशाचा तो रेटा आहे. तो मागल्या पिढीला कळणे शक्य नाही. स्वतःचा विचार करण्याची ही प्रेरणा खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरते. आणखी एक नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, स्वतंत्रपणे स्वतःचं आयुष्य घडवणारी तरुण मुलगी कट्टर पुरुषसत्ताक सासरी जाते, तेव्हा तो विरोधाभास पेलणं किती अवघड असतं याचंही उदाहरण इथे प्रस्तुत होतं. या दरम्यान वेगळा विचार करणारा, सर्वांना समजून घेणारा संवेदनशील नवराही मधूनच नवरेपणा गाजवतो, पण अशा वेळी `आम्ही यांच्यासाठी एवढं करतो ,पण आमच्याबद्दल काही वाटत नाही` असा तक्रारखोर विचार दूर सारत आपलं काम करत राहणं यासाठी साधनाच लागली असेल. `स्वतःची समजूत घातली यापेक्षा `परिस्थिती नीट समजून घेतली` हा मा हा मार्ग पत्करला की सोपं होतं. मन शांत होतं. कडवटपणा तर कणभर राहात नाही. सर्जनशीलता आणि मनाचा प्रसन्नपणा ताजा टवटवीत राहतो. आणि मग आपल्याला जे करावंस वाटते ते करता येतं. त्याचं व्यवस्थापन सुचतं, जस सुनंदाताईंना त्यांच्या अनुवादाच्या कामाच्या नियोजनात सुचलं. घर आणि एकूणच कुटुंबाचे सर्व करताना त्यांना त्यांच्या लेखनासाठी वेळच काढता येईना, तेव्हा पहाटे लवकर उठून त्यांनी निवांत दोन तास काढले आणि आपलं काम केलं. एवढंच नव्हे तर कॉलेज, अभ्यास हे चाळीसेक वर्षे मागे पडल्यानंतर पुन्हा त्या मुंबई विद्यापीठात हजर झाल्या आणि मायथोलॉजीवरच्या एक वर्षाच्या घनघोर अभ्यासक्रमात स्वतःला झोकून दिलं आणि त्यात उत्तम गुण मिळवून पासही झाल्या. वयाच्या या टप्प्यावर घरगुती जबाबदाऱ्यांत, लेकींच्या बाळंतपणाचीही एकीचं तिकडे अमेरिकेत भर पडली. आरंभी मी म्हटले तस `कुठून आणते ही ऊर्जा ही माउली...!` असं करता करता आता कुठे स्वतः साठी वेळ मिळतोय असं वाटेवाटेपर्यंत अमरापूरकरांचं शेवट गाठणारं आजारपण सुरू होतं. आता पुन्हा नव्याने सारं नियोजन, आता दिवसाचा प्रत्येक क्षण त्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत राहण्यासाठी. अमरापूरकरांची कामं कमी होत चालली होती. जिथून आयुष्याची सुरुवात केली, तिथे जाऊन तिथल्या घरात दोघांनी पुढली वर्ष काढायची असं ठरवता ठरवता तोच सारा वेळ मुंबईत हॉस्पिटलमध्ये काढावा लागला. नगरला पोहोचला तो अमरापूरकरांचा निष्प्राण देह... `खुलभर दुधाची कहाणी` ही एका समजदार आणि कर्तृत्ववान स्त्रीची कहाणी आहे. त्या कहाणीतून मला जाणवलेलं तिचं व्यक्तिमत्त्व अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. सुनंदा अमरापूरकर यांना सलाम! ...Read more

JAMILCHYA SAHASKATHA
JAMILCHYA SAHASKATHA by MOHAMMED UMAR Rating Star
Pradnya Aher

Very interesting story especially for children and youngsters too. Translated well. If you take your children back to books from mobile. These kinds of books are must read