* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MARATHITIL BARAMAS KAVYE
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983494
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 104
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘ENJOY THE UNIQUENESS OF ALL THE TWELVE MONTHS FROM THE ASPECT OF ANGUISH THE POEMS RELATED TO THE TWELVE MONTHS OF A YEAR ARE KNOWN ARE ‘BARAMAS’. MOST OF THE NORTHERN STATES LIKE PUNJAB, RAJASTHAN, GUJARAT, BENGAL, BHOJPUR ETC. ARE WELL VERSED IN THESE BARAMAS OR TWELVE-MONTHS POETRY, BUT NOT MAHARASHTRA. THERE ARE A VERY FEW EXCEPTIONS LIKE THAT OF THE GREAT POET, G.D.MADGULKAR, WHOM WE ALL KNOWN AS ‘GADIMA’. MANY OF HIS POEMS INVOKE SUCH FEELINGS IN OUR MINDS WHICH US LONG FOR OUR BELOVED ONES. WHEREAS THE NORTHERN STATES HAVE AMPLE LITERATURE EXPRESSING THE STATE OF MIND OF A WIFE WHOSE HUSBAND IS FAR AWAY FROM HER FOR MONTHS AND YEARS TOGETHER. THE ‘TWELVE-MONTH POEMS’ ARE EXCLUSIVE AND UNIQUE FORM OF LOCAL LANGUAGE. THOUGH IT IS TRUE THAT THEY EXPRESS THE FEELINGS OF THE LONER, THE WIFE, THEY ARE OFTEN SUNG IN GROUPS WHERE ALL THE FEMALES SHARE THEIR LONELINESS. MOST OF THE STATES HAVE TAKEN A NOTE OF THIS LITERARY FORM AND HAVE GONE FORWARD IN CRITICIZING, STUDYING THEM IN DEPTHS. IN MARATHI, THERE WERE HARDLY ANY POEMS WRITTEN IN THIS FORM. SO IT WAS A HERCULEAN TASK TO EXPLORE THEM RIGHT FROM DHULIA TO TANJAWUR, (DISTRICTS OF INDIA SET APART PHYSICALLY). VERY FEW SUCH POEMS COULD BE FOUND WHICH WOULD FULFILL THE PURPOSE. THESE ALL NEWLY FOUND ‘BARAMAS POEMS’ ARE INCLUDED HEREIN. THIS LITERARY FORM WHICH IS HARDLY UNKNOWN HAS THUS FOUND A NEW PATH IN OUR SOCIETY. WE ARE SURE THAT IT WILL BE WELCOMED BY ALL THE ART LOVERS.
‘‘दिवसामागून दिवस चालले ऋतुमागुनी ऋतू जिवलगा कधी रे येशील तू’’ अशी कविवर्य ग.दि. माडगूळकर यांच्यासारखी रसिक हृदयात विरह वेदनेची कळ उमटविणारी दीर्घ विरह गीते मराठीत फारशी लिहिली गेली नाहीत. स्वतंत्र निसर्ग कविताही प्राचीन कवींनी लिहिलेली दिसत नाहीत. तथापि उत्तर भारतातील पंजाबी, राजस्थानी, गुजराती, बंगाली, भोजपुरी, इत्यादी भाषांतून पती जवळ नसल्याने विरहाने ग्रासलेल्या नायिकेच्या भावना व्यक्त करणारी पदे विपुल प्रमाणात लिहिली गेली आहेत. त्यांना ‘बारामास काव्ये’ असे म्हणतात. हा लोकभाषेतील एक प्रकार आहे. आणि काही ठिकाणी तो समूहरूपातही गायिला जातो. त्या-त्या भाषेत या काव्यांवर अभ्यासपूर्ण समीक्षा ग्रंथ लिहिले गेले आहेत. त्या दृष्टीने मराठीतील अशा विरहगीतांचा शोध धुळ्यापासून तंजावरपर्यंतच्या ग्रंथसंग्रहांतून घेतला असता फार थोडी काव्ये उपलब्ध झाली. तीच प्रस्तुत संग्रहात समाविष्ट केली आहेत. रसिकांपुढे हा अल्पज्ञात काव्यप्रकार ठेवला आहे. हा अभिनव काव्यप्रकार मराठी वाचकांना आवडेल, अशी अपेक्षा आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MARATHITILBARAMASKAVYE #MARATHITILBARAMASKAVYE #मराठीतीलबारामासकाव्ये #REFERENCEANDGENERAL #MARATHI #VASANTJOSHI "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more