* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KAHE KABIR DIWANA (6-10)
  • Availability : Available
  • Translators : BHARATI PANDE
  • ISBN : 9788177666786
  • Edition : 3
  • Publishing Year : JULY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 160
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :OSHO COMBO SET - 33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
YOGA IS NOT SUICIDE. YOGA IS A VERY ABSTRUSE PROCESS, IT IS AN ART ITSELF. THE MOMENT YOU START TAKING A SINGLE STEP AT A TIME, YOU YOURSELF WILL FIND THAT IT IS ALL THERE IN YOUR HEART. YOU WERE ACTUALLY BORN WITH IT. ONLY THING IS YOU YET HAVE TO MAKE IT EVIDENT, TO BRING IT TO REALITY. YOU ARE AN UNMANIFESTED SOUL, YOU NEED TO WORK ON REVEALING IT. THE MUSICAL INSTRUMENTS ARE READY, BUT THE FINGERS WILL TAKE SOME TIME TO GET READY. THEN THE `BINA` WILL START PLAYING. AS THE FINGERS GET TRAINED THEY WILL PRODUCE MORE VERSATILE MUSIC WITH MORE DEPTH. THERE WILL COME SUCH A WONDROUS MOMENT WHEN YOU WON`T EVEN NEED THE `BINA` OR YOUR FINGERS TO BRING IN THE CELESTIAL MUSIC. ALL THE FOUR DIRECTIONS WILL PLAY IT FOR YOU. THE MUSIC IS ALWAYS THERE IN THE UNIVERSE, YOU JUST HAVE TO PREPARE YOURSELF FOR IT, YOU NEED TO WORK ON YOUR CAPACITY. THAT CHIME IS KNOWN AS `AUM`.
‘‘योग ही काही आत्महत्या नाही. योग ही एक अतिशय गहन अशी प्रक्रिया आहे, एक कला आहे. आणि तुम्ही तर एकएक पाऊल चालत राहिलात तर सारं काही तुमच्या आतच लपलेलं आहे. तुम्ही सगळं घेऊनच आला आहात. फक्त ते प्रगट करायचं बाकी आहे. तुम्ही अप्रगट परमात्मा आहात फक्त थोडं प्रगट व्हायचं आहे. वाद्य तयार आहे, बोटं थोडी तयार करायची आहेत— मग वीणेचे स्वर निनादू लागतील. जसजशी बोटं तयार होऊ लागतील तसतसं अधिकाधिक सखोल संगीत निर्माण होईल. आणि मग एक क्षण असा येईल जेव्हा वीणेचीही गरज उरणार नाही, बोटांचीही गरज उरणार नाही— तेव्हा चारी दिशांना अस्तित्वात असलेलं परम संगीत ऐकू येऊ लागतं— फक्त तुमच्याजवळ ऐकण्याची क्षमता हवी आहे... त्या नादालाच आपण ‘ओंकार’ म्हणतो.``
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MAZE MAJAPASHI KAAHI NAAHI #OSHO #BHARATI PANDE #माझे माझ्यापाशी काही नाही #ओशो #भारती पांडे
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 20-08-2006

    खरे प्रेम म्हणजे काय?... ओशो कुठल्याही विषयाकडे अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. संत कबीर यांच्या दोह्यांवर ओशोंनी अनेक प्रवचनांमध्ये मार्मिक भाष्य केले आहे. त्यापैकी प्रेमविषयक दोह्यांवरचे विवचेन या पुस्तकात एकत्रित स्वरूपाचा बघायला मिळते. ‘प्रीी लागी तुम नाम की पल बिसरे नाही । नजर करो अब मिहर की मोहि मिल गुसाई’ या दोह्याच्या अनुषंगाने प्रथम: संत कबीर प्रेमाची संकल्पना पुढे मांडतात. प्रेम ही जीवनाची सार्थकतेची निशाणी, जीवनाची परम साधना, जीवनाच्या ऊर्जेचे सर्वोच्च शिखर, प्रेम मिळाले तर सर्व काही मिळाले. प्रेमापासून वंचति राहणे म्हणजे अवघे जीवनच व्यर्थ, कुचकामी, तुच्छ... प्रेम प्रत्येकजण करतो. परंतु ते चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या व्यक्तीवरही केले जाऊ शकते. प्रेम ही जीवनाची नैसर्गिक अभिव्यक्ती असते. ओशोंच्या मते तीन तर्हेचं प्रेम असतं. १) शंभरापैकी ९९ लोक प्रेम करतात ते वस्तूंवर, संपत्तीवर, घरावर, हे सर्वांत खोटं प्रेम या प्रेमाचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रेमासाठी तुम्हाला तुमचं समर्पण करावं लागत नाही. तुमची कार, तुमचं घर, या वस्तूच तुमच्यासाठी समर्पित करून घेता; पण त्या वस्तूंच्या समर्पणाला काही अर्थ नाही. प्रेम करणाऱ्याला दुसऱ्याकडून शरणागतीची अपेक्षा असते. त्यामुळे व्यक्तीवर प्रेम करणे हा एक संघर्ष ठरतो. पुरुष स्त्रीवर प्रेम करतो तेव्हा स्त्रीला झुकवू पाहतो. २) वस्तूच्या प्रेमापेक्षा वरच्या स्तरावरचे प्रेम हे व्यक्तीवरचे प्रेम असते. जो व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्या जीवनात वस्तूबद्दल उपेक्षा असते. परमात्म्याबद्दल तटस्थता असते. व्यक्तीवर प्रेम करणाऱ्याला उच्च दर्जाच्या प्रेमाचा रस चाखता येतो. व्यक्तीवर प्रेम करणारा माणूस पण राहात नाही. त्याच्या जीवनात आनंद असतो, उत्साह असतो; पण व्यक्तीचे प्रेम हे कधी पूर्ण होऊ शकत नाही. व्यक्तीवर प्रेम करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात गुरू येण्याची दाट शक्यता असते. प्रेमामध्ये मिळणारे सुख ज्याला कळते तोच परमात्म्याच्या दिशेने जातो. ३) तिसऱ्या प्रकारचे प्रेम म्हणजे परममात्म्यावरील प्रेम. ते प्रेम पूर्ण प्रेम असते; कारण तेथे तुम्ही झुकता. तुम्हाला झुका असे सांगताना तेथे कोणी नसतो तरी तुम्ही झुकता. परमात्मा असा कोणी नसतोच. परमात्मा ही एक परम अनुपस्थिती आहे. म्हणून तुम्ही त्याला शोधले तरी तो कुठेच सापडत नाही. तो शून्यवत आहे. आकाशासारखा आहे. हिंदू, मुस्लीम, खिश्चन हे सर्व मनाचे खेळ आहेत. गुरुद्वारा, मंदिर, मस्जिद या सर्वांची निर्मिती ही मनाची करामत आहे. धर्माकडे आपण मनाच्या दृष्टीतून बघतो म्हणून धर्मसुद्धा वाटला गेला आहे. मन ही तुकडे करण्याची प्रक्रिया आहे. व्यक्तीच्या प्रेमाचा पलीकडे माणूस जातो तेव्हा परमात्म्याचे प्रेम जागृत होते. प्रीती लागी तुम नाम की - अशी नावाची प्रीती निर्माण होते... ही प्रीती गुरूमुळे निर्माण होते. गुरूची प्राप्ती झाली आता परमात्म्याची प्राप्ती होणारच. अब कबीर गुरू पाइया, मिला प्राण पियारा... जग म्हणजे मन... मनापासून मुक्त होणे म्हणजे जगापासून मुक्त होणे. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन हे सर्व मनाचे खेळ आहेत. गुरुद्वारा, मंदिर, मस्जिद या सर्वांचे निर्मिती ही मनाची करामत आहे. धर्माकडे आपण मनाच्या दृष्टीकोन बघतो म्हणून धर्मसुद्धा वाटला गेला आहे. मन ही तुकडे करण्याची प्रक्रिया आहे. मन हा भ्रम आहे. आपण मनाला माया म्हणतो. मायेचा अर्थ भ्रम. खरं आणि खोटं यांच्यामधली स्थिती. म्हणूनच मनाला खोटं म्हणता येत नाही... नाही म्हणता येत नाही. मन क्षणभंगूर आहे. बुडबुड्यासारखं ते सारखं तयार होत असतं. सारखं नष्ट होत असतं. मन ही स्वप्नसदृश अवस्था आहे. झोपेमध्ये स्वप्न नष्ट होते. जागेपणी विचार नष्ट होतो. अशी अवस्था म्हणजे जगापासून मुक्ती. मुक्ती हिमालयात जाऊन बैरागी होऊन मिळत नाही. घर म्हणजे जग नाही. कुटुंब-प्रपंच म्हणजे जग नाही. मनात जोपर्यंत अहंकार आहे. वासना आहे, विकार आहे तोपर्यंत जग आहे. मनाची विकृत अवस्था हा तुमच्या जगाचा मूलाधार आहे. जग सोडून पळू नका. विकाराचा त्याग करा. मनाचा संबंध जगाशी आहे. आत्म्याचा संबंध परमात्म्याशी आहे. मन असेल तर चारी बाजूंनी जग असेल. आत्मा झालात तर मन शिल्लक राहणार नाही. मन निर्मळ झाले तर कुठलेही स्वप्न उतर नाही. भ्रम नाही. विकार नाही. जब निर्मल करिजाना तब निर्मल माहि समाना... जग पापपुण्य भ्रमजारि, तब भयो प्रकाश मुरारी.. जगानं तुमच्याशी कसं वागावं असं तुम्हाला वाटतं, तसंच तुम्ही जगाशी वागा. परमात्मा म्हणजे अस्तित्व. परमात्मा ही व्यक्ती नाही. परमात्म्याला नाव, गाव, पत्ता काही नाही. सर्वांच्या आत लपून असलेला मूळ गुण तो असण्याचा गुण हाच परमात्मा तुम्ही नष्ट झालं की मृत्यूच्या क्षणीही अमृताचा वर्षाव होत राहिल. भारती पांडे यांनी ओशोच्या या पुस्तकाचा सुरेख अनुवाद केला आहे. -सौ. वैजयंती कुलकर्णी ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 12-11-2006

    ओशोंच्या मुखातून कबीरवाणी!... ‘ओशो’ नाव घेतलं की भारतीय मनासमोर धर्माच्या विरोधात बंड करून उठलेली आणि स्वैराचाराला प्रोत्साहन देणारी व्यक्ती डोळ्यासमोर येते. अशी सर्रास धारणा असलेल्या व्यक्तींनी एकतर ओशोंचं साहित्य वाचलेलं नसतं किंवा त्याबद्दल ते वालेल्यांकडून काही ऐकलेलंही नसतं. एक गॉसिप म्हणून ओशो बऱ्याचवेळा चघळले जातात. पण वस्तुस्थिती तर अशी आहे की, फ्रेडरिक नित्शे फ्रॉइड, रामकृष्ण, राजकारण, समाजकारण अशा सर्व विषयांवर अधिकारवाणीने मार्गदर्शन ओशोंनी केलंय. त्यांच्यावर धर्माच्या विपरित शिकवण केल्याचा आरोप केला जातो. तर त्यांच्याच भाषेत सांगायचं तर ‘मी धार्मिकता शिकवतो, धर्म नाही’ त्यामुळे अनेक संतांचे दाखले, त्यांचे विचार ओशो आपली धार्मिकता विषद करण्यासाठी मांडतात. दोह्यांमुळे आपल्याला माहिती असलेल्या कबीरांवर त्यांनी दिलेली व्याख्याने ‘मृत्यू अमृताचे द्वार’, ‘माझे माझ्यापाशी काही नाही’ आणि ‘भक्तीत भिजला कबीर’ या पुस्तकात संग्रहित करण्यात आली आहेत. ओशोंचा मुख्य विषय नेहमीप्रमाणेच परमेश्वर आणि मानव असा आहे. त्या ईश्वराला शोधण्यासाठी बाहेर नाही तर आत बघायला पाहिजे, हा उपदेश सर्वमान्य असला तरी सर्वसामान्यांच्या काही तो गळी उतरत नाही. पण कबिराच्या दोह्यांमध्ये नीट डोकावून बघितलं तर लक्षात येतं, परमेश्वर कसा आहे; तर तो जिथे हवा तिथे तसा आहे. आणि हे असं का आहे, हे ओशो मग अत्यंत रंजक अशा भाषेत पानापानात समजावत राहतात. या आशेने की, कधीतरी आपल्या मनातला अंधकार दूर होईल आणि या प्रचंड विश्वातल्या आपल्या आणि ईश्वराच्या बाबतीतल्या सत्य स्वरुपाचं आपल्याला ज्ञान होईल. साधारणपणे कुठलाही धार्मिक विषय हा रुक्ष असतो. एकदम कपाळावर भरपूर आठ्या घालून विश्वाचं ओझं आपल्याच डोक्यावर असल्यासारखी भावमुद्रा बुवांना आणि भक्तांना म्हणजे आपल्याला वागवावीच लागते. पण ओशोंच्या धार्मिकतेत मात्र निखळ विनोदाला स्थान आहे, समाजाच्या सबलीकरणाला स्थान आहे, शांततेला स्थान आहे, नृत्याला स्थान आहे. संगीताला स्थान आहे, थोडक्यात म्हणजे जीवनाला स्थान आहे. आणि जीवन आहे तर मृत्यूही आहे. या वास्तवाची जाणीव ज्यादिवशी खऱ्या अर्थी आपल्याला होते, त्यावेळी जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनही बदलतो. मृत्यू आहे म्हणून जीवनाला काही अर्थ आहे. हे पटतं. मग कबीराचं ‘सारे जग ज्या मृत्यूला घाबरते त्याच मृत्यूने माझे मन आनंदित होते’ हे वचन आपल्याला आतल्या प्रवासाला जायला उद्युक्त करतं. लोकांनी आतल्या प्रवासाला सुरुवात करावी या उद्देशाने, धार्मिक बनावं या हेतूने असे हे कबीर आपल्याला ओशो या तीन पुस्तकांतून समजावून देतात. त्यामुळे अक्षरश: प्रत्येक व्यक्तीने ही पुस्तकं वाचणं ‘मस्ट’च आहे. -योगेश मेहेंदळे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more