* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MANTRA SHRIMANTICHA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665451
  • Edition : 6
  • Publishing Year : FEBRUARY 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :SHYAM BHURKE COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`MANTRA SHRIMANTICHA` WRITTEN BY SHYAM BHURKE `HOW TO BE RICH` THE BOOK PROVIDES KEY, `HOW TO BECOME RICH` MANOHAR, SCHOOL GOING STUDENT HAD STRONG DESIRE TO BE WEALTHIER. HOWEVER HIS FATHER PROF. BUDDHIVANT ADVISED HIM TO CONCENTRATE ON STUDIES AND SEE THAT HIS NAME APPEARS IN MERIT LIST OF TOP SUCCESSFUL STUDENT. CONTRARY TO THIS IDEOLOGY A FRIEND OF THE STUDENT`S FATHER MR. DHANESHWAR ADVISED HIM NOT TO USE ALL THE ENERGY FOR SCHOOL AND COLLAGE STUDIES. DO STUDY TO GET THROUGH THE EXAMINATION. SET PROMOTED TO NEXT STANDARD. AT THE SAME TIME LEARN ART OF EARNING MONEY. INVITED OF EARNING MONEY, ARE OF EARNING MONEY HAS BEEN MORE IMPORTANT. MANOHAR LEARNT THE ART. EACH RUPEE THAT HE EARNED USE TO EARN NEXT RUPEE. THIS HAS BEEN DESCRIBED IN THE BOOK. THE READER OF THIS BOOK WILL HAVE DESIRE TO BE RICH. HE WILL BE MARCH TOWARDS THE PATH OF WEALTH. HE WILL BE ENRICHED WITH THE KNOWLEDGE OF BECOMING RICH. EVEN, THORE WHO ARE EMPLOYEES WILL THINK OF BECOMING RICH. UNPLOYED YOUTH WILL ACQUIRE ENTEREPRENEURSHIP QUALITIES. THEY WILL KNOW THE STORIES OF RICH PERSONS AND FOWWOW THE SAME PATH. THERE WILL BE MORE AND MORE ENTEREPREUEURS.
या पुस्तकात दडलाय श्रीमंत होण्याचा मंत्र! प्रा.बुद्धिवंत म्हणतात, ``खूप अभ्यास कर. गुणवत्ता यादीत ये," तर त्यांचेच धनेश्वर सांगतात, " परीक्षेत उत्तीर्ण होण्याइतपत अभ्यास पुरेसा आहे. लवकरात लवकर पैसे कमविण्याची कला शिक. पैसे मिळविण्यापेक्षाही पैसे कमविण्याची कला प्राप्त होणे हे महत्वाचे." मनोहरनं ही कला कशी प्राप्त केली, येणारा प्रत्येक रुपया पुढील रुपया कमवायला कसा वापरला, हे इथं उलगडून दाखवलंय. हे पुस्तक वाचेल त्याला आपण श्रीमंत व्हावे असे वाटेल. तो गरिबीतजन्माला आला असेल तरीही श्रीमंतीचा मार्ग धरेल. जर हे पुस्तक श्रीमंतानेच वाचले तर आपण अधिक श्रीमंत होण्यासाठी कोणते मार्ग चोखाळायला हवेत, याचे त्याला ज्ञान होईल. जे नोकरीच्या चक्रात अडकले आहेत.त्यांनाही आहे या परिस्थितीतश्रीमंत कसे व्हावे, याचा मार्ग सापडेल. नोकरी ण मिळाल्यामुळे हताश झालेल्या युवकामध्ये उद्योजकता निर्माण होईल. यशस्वी उद्योजकांच्या कथा वाचताना त्याच्या अणूरेणूत चैतन्य सळसळेल. तो श्रीमंतीच्या वाटेकडे आकर्षित होईल. सर्वदूर उद्योजकांची मांदियाळी दिसू लागेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MANTRASHRIMANTICHA #MANTRASHRIMANTICHA #मंत्रश्रीमंतीचा #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #MARATHI #SHYAMBHURKE #श्यामभुर्के "
Customer Reviews
  • Rating Starनंदकिशोर कि. उमक

    ‘मंत्र श्रीमंतीचा’ हे पुस्तक खूपच आकर्षक झाले आहे. त्यातील अक्षरही खूपच सुंदर आहे. तसेच टाइपही स्पष्ट समजेल असाच आहे. आपणास असंख्य शुभेच्छा.

  • Rating StarSAPTAHIK SAKAL 23-07-2005

    शून्यातून यशाचा किनारा गाठण्यासाठी... इंग्रजीत ‘हाऊ टू डू इट’ पुस्तकांची नेहमीच चली असते. त्यातला दादा माणूस म्हणजे डेल कार्नेजी. त्याची ‘हाऊ टु विन् फ्रेंड्स अँड एनफ्ल्यूयन्स पीपल’ किंवा ‘हाऊ टू स्टॉप वरीइंग’ ही पुस्तके शेक्सपिअरच्या नाटकाइतकीच लोक्रिय आहेत. त्यातच पोहणे, क्रिकेट, बुद्धिबळ वगैरे शिकविणारी अनेक खेळ वा व्यवसायांची पुस्तकं सारखी प्रसिद्ध होत असतात. मराठीतही शेअर बाजार, संगणकापासून ‘मजेत जगावं कसं’ यांसारख्या पुस्तकांस कथा-कादंबऱ्यांपेक्षा अधिक मागणी आहे. आध्यात्मिक विषयावरच्या पुस्तकांचीही चलती आहे. श्याम भुर्के यांचं ‘मंत्र श्रीमंतीचा’ हे त्यातलंच एक पुस्तक. ते मूळचे कॉमर्सचे अभ्यासक; पण त्यांना साहित्य, कला, नाट्य यांचीही आवड आहे. त्यांनी त्यावर हजारभर जरी उभारण्यानं दिली. शेवटी प्रत्येकाला कुठं सांगणार, म्हणून आपल्या अनुभवांना त्यांनी चक्क कादंबरीचं स्वरूप दिलं आहे. अर्थात त्यात कादंबरीचे घटक नावालाच आहेत. धनेश्वर आणि मनोहर या दोन गुरू-शिष्य संबंधांवर आधारित दोन व्यक्तिरेखांच्या आधारे त्यांनी श्रीमंतीचं रहस्य सांगितलं आहे. अर्थात अशा पुस्तकाचं मर्यादित स्वरूप लक्षात घेऊनच हा श्रीमंत होण्याचा मंत्र प्रत्यक्षात आणायला हवा. शेवटी ‘पोहावे कसे’ वाचून काही पोहता येत नाही. त्यासाठी पाण्यातच उडी ठोकावी लागते. मनोहर बुद्धिवंत याचे वडील अत्यंत बुद्धिवंत, पीएच. डी., एका विद्यापीठात विषय विभागप्रमुख. त्यामानाने धनेश्वर सामान्य त्यात आज ते अमाप श्रीमंतीचे धनी. ही किमया कशी घडली? त्याचे कारण आजचे शिक्षण हे कारकुनी घडविणारे आहे. त्यासाठी नोकरीच्या ‘स्कूटर रेस’मध्ये न पडता व्यवसाय केला पाहिजे. त्यासाठी अनेक वाटा आहेत. शाळेत शिकत असतानाच फटाके विकणे, स्टेशनरी शॉप चालविणे यांतून मनोहर स्वत:ची कमाई करतो. त्यातूनच धनेश्वर एकेक रहस्ये उघड करीत जातात. यशस्वी व्हायचं असेल तर परिश्रमांना, कष्टांना पर्याय नाही, हा धनेश्वरांचा मुख्य मंत्र आहे. ‘खावी बहुतांची अंतरे’ हा दुसरा आणि दोन कारखाने चालवायचे हा तिसरा. त्यातला एक बर्फाचा नि दुसरा साखरेचा. म्हणजे डोकं थंड ठेवणं नि गोड बोलणं. यामुळेच ग्राहक राजा प्रसन्न होतो. मग गुंतवणुकीची विविध क्षेत्रं खुली होतात. त्यात बँका, मार्केटिंग, पर्यटन, ट्रेकिंग, चित्रकला वगैरे दिशा त्यांनी दाखविल्या आहेत. संगणक हा तर आज एक कल्पवृक्ष आहे. आणखी एक म्हणजे श्रीमंत स्वत: कधीच काम करीत नाहीत. ते फारसा कर भरत नाहीत. ते पंचतारांकित हॉटेलांत पाट्याग झोडत असतात. खरं काम त्यांचे पगारी नोकर करतात. कर कमीत कमी भरावा म्हणून ते तज्ज्ञ सल्लागारांचा सल्ला घेतात. त्यांच्या सगळ्या बिलांचा अंतर्भावही ते कंपनी खर्चत करून उत्पन्न व कर कमी दाखवतात. पगारदार मात्र स्वत: कर भरतात. त्यांची ओढाताण होते. श्रीमंत कधीही पैशासाठी काम करीत नाहीत. पैसाच त्यांच्यासाठी काम करतो, हे सत्य आहे. चिकाटी, श्रम, आळसाचा अभाव हे तीन मंत्रही महत्त्वाचे. त्याच जोरावर पुढं सिंधी मारवाड्यांपुढं गेले. जेवतानाही गिऱ्हाईक आलं तर ते पाटावरून उठतील. दुपारी एक ते चार दुकानाला विश्रांती देणारा माणूस त्याला कायमच विश्रांती देतो, हे धनेश्वरांचं निरीक्षण आहे. अ‍ॅसेट्स हे नेहमीच अ‍ॅसेट्स कसे नसतात, हे त्यांनी एका स्वतंत्र प्रकरणात नफा-तोटा, ताळेबंद, बॅलन्सशीट यांच्या उदाहरणांनी स्पष्ट केलं आहे. श्रीमंत पैसा मिळविण्यासाठी संपत्ती खर्च करतात. गरीब फक्त खर्चच करतात. मध्यमवर्गीय जी संपत्ती समजून खरेदी करतात ती अखेर लायबिलिटी ठरते. ती कशी टाळावी, हेही लेखकानं सांगितलं आहे. व्यवसायाला चिंतन, मनन याप्रमाणेच वाचनाची ही गरज आहे. त्यासाठी शंतनुराव किर्लोस्कर, टाटा कुटुंबीय, कॅमलचे दांडेकर, कल्याणी पगडीचं आत्मकथन, सिपोरेक्सचे बाबूराव शिर्के, तसेच अनेक पाश्चात्त्य यशस्वी उद्योगपतींच्या पुस्तकांची लेखकाने यादी दिली आहे. अशा प्रकारे नोकरीच्या मागे लागता श्रीमंत कसं व्हावं, हे अनेक किस्से, विनोद, हकिगती व प्रसंगांच्या रूपानं सांगितलं आहे. त्यामुळे हे पुस्तक कुठेही कंटाळवाणं होत नाही. ...Read more

  • Rating Starप्रमोद पो. डोसा

    ‘मंत्र श्रीमंतीचा’ हे पुस्तक वाचले. आपण आपल्या पुस्तकात अनेक गोष्टींचे ज्ञान, व्यवहार कुशलता, श्रीमंत होण्यासाठी लागणारी तळमळ, कष्ट करण्याची तयारी अशा अनेक गोष्टीचा योग्य पद्धतीने मांडणी केली आहे. हे पुस्तक वाचून माझ्या मनात माझ्या व्यवहारात अनेक बद घडले आहेत. मी आपल्या पुस्तकाचा आधार घेण्याचे ठरवले आहे. आलेला रुपया मी पुढील रुपया कमवण्यासाठी वापरणार आहे. मला या पुस्तकाच्या रूपाने गुरू मिळाला आहे. मला खात्री आहे की आपले पुस्तक माझ्या जीवनात एक क्रांती घडवणार आहे. आपण पुस्तक लिहिल्यामुळे अनेक गरीब श्रीमंतीचा अभ्यास करणार आहे. या पुस्तकामुळे तुमचे कोटी कोटी आभार मानत आहे. ...Read more

  • Rating Starप्रवीण निलजकर

    दि. ४ जानेवारी २०११ रोजी शहरातील पुस्तक प्रदर्शनास गेलो असता तेथे आपले `मंत्र श्रीमंतीचा` हे पुस्तक खरेदी केले, मला आपल्या पुस्तकातील मनोगत आणि कथा आवडली. माझ्या मनात व्यवसाय करण्याची इच्छा होती ती आणखीन तीव्र झाली. आशा करतो की अशाच प्रकारची आपली मा्गदर्शक पुस्तके आपणाकडून मिळत राहतील. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
साधना साप्ताहिक ३ ऑगस्ट २०२४ ... अशोक राणे

सुनंदा अमरापूरकर यांनी त्यांचं `खुलभर दुधाची कहाणी` हे आत्मकथन पाठवलं तेव्हा `आता हे वाचायचं केव्हा` असा प्रश्न सर्वप्रथम मनाशी आला. देणेकरी दाराशी ठाण मांडून बसावेत तशी अनेक पुस्तकं, कोणी कोणी पाठवलेल्या त्यांच्या फिल्म्स आणि माझे सतराशे साठ व्याप सोर असताना कसा वेळ काढायचा? माझं सबंध आयुष्य सिनेमा, तो आकाराला आणणारे दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ, त्यांच्या निर्मितीमागच्या प्रेरणा आणि त्यांच्यातला माणूस याचा शोध घेण्यात गेलं. एका गोष्टीचं कुतूहल होतं आणि ते म्हणजे या सर्वांच्या पलीकडे असलेलं, परंतु क्वचितच कळलेलं असं त्यांच्या कुटुंबातल्याच व्यक्तीने वर्णिलेलं अमरापूरकरांचं चरित्र ! सगळी व्यवधानं बाजूला ठेवून सुनंदा अमरापूरकरांचं आत्मकथन वाचायला हे कुतूहल पुरलं. मनोगतातलं पहिलंच वाक्य आहे... `मी या आठवणी का लिहिल्या ?` ...आणि मला चट्‌कन थोर अभिजात अभिनेत्री इंग्रीड बर्गमन हिचं `माय स्टोरी` आठवलं. तिनेही अशीच सुरुवात केलीय. तिची मुलं म्हणाली, `तुझ्या आयुष्याविषयी कुणी तरी तिखटमीठ लावून काहीबाही लिहील, त्याआधी तूच सारं खरं मोकळेपणानं सांगून टाक. तिने जाडजूड ग्रंथात अभिनेत्री म्हणून तिचा सारा प्रवास कसलाही आडपडदा न ठेवता सविस्तर सांगितला. सुनंदाताईंचं पुस्तक आणि त्यातलं हे पहिलं वाक्य वाचताना मला हे का आठवावं? त्यांची पहिली ओळख म्हणजे नाट्य-चित्रसृष्टीतला एक मोठा अभिनेता, दिग्दर्शक सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी आणि अलीकडचा परिचय म्हणजे एक उत्तम अनुवादकर्त्या. तर आता त्या आपल्या प्रसिद्ध नवऱ्याविषयी काय आणि कसं सांगतात, त्याचबरोबर त्यांचं वैवाहिक सहजीवन, एकूणच त्यांचं कौटुंबिक जीवन कसं उलगडून दाखवतात याचं कुतूहल होतं. मुख्य म्हणजे त्यांची मध्यमवर्गीय पार्श्वभूमी आणि सदाशिव अमरापूरकरांना मुंबईत स्थैर्य लाभेपर्यंत नगरसारख्या छोटया शहरातला त्यांचा वावर यातून पुढला सारा अचंबित करणारा प्रवास त्या का मांडतात याचीही उत्सुकता मनात होतीच, अमरापूरकर कुटुंबाचा प्रवास हा केवळ नगर ते मुंबई नव्हता. एखाद्या नवख्या नटाने रंगमंचाच्या अंधाऱ्या अवकाशात प्रवेश करावा आणि अचानक त्याच्यावर सर्व अंगांनी प्रखर प्रकाशझोत यावा, त्याचे डोळे इतके दिपून जावेत की त्याला ते नीट उघडून सभोवताल पाहता येऊ नये असाच काहीसा अनुभव या कुटुंबाने घेतला आहे. प्रायोगिक वे व्यावसायिक रंगभूमी हे स्थित्यंतर तसं फार तर कनिष्ठ ते उच्च मध्यमवर्गीय याच काहीशा परिचित अवकाशातलं; परंतु हिंदी सिनेमातली प्रसिद्धी तर भिरभिरावून टाकणारी. ते अंगावर घेत, वागवत या कुटुंबाने कशी वाटचाल केली हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. एवढी प्रचंड प्रसिद्धी आणि वलय लाभूनही अमरापूरकर कधी फिल्मी झाले नाहीत हे वाटतं तितके सोपे नाही. `खुलभर दुधाची कहाणी यातून ते उलगडणार होते... वाचायला सुरुवात केल्यावर ते खूप तपशीलवार आणि पसरटही वाटलं. पण वाचत गेलो तसतसं लक्षात आलं की, सुनंदाताईंनी चितारलेला परिसर तप‌शिलातल्या काही फरकाने आपलाही आहे. आपणच प्रत्यक्ष जगलेले, पाहिलेल वाचतो आहोत. साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या आमच्या शाळकरी वयापासून वाचलेल्या साहित्यातून हेच सर्व पाहत आलोय. आपल्या मुलांच्या आणि नातवंडाच्या पिढीला तर हा काळ अवकाश सर्वस्वी अपरिचित. हे त्यांच्यासाठीही आहे. आजच्या नव्या पिढीला 2000 चा चित्रपट जुना वाटतो, तेव्हा त्याआधीच्या त्यांच्या आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या सिनेमाशी आपण जसा त्यांचा परिचय करून देतो तसंच आहे हे. शिवाय या कथनाच्या नायिकेने पुढे अपरिहार्य असं जे वळण गाठलं आहे, त्यासाठी हे आवश्यकच आहे. संथ लयीत सुरू झालेलं आणि काहीसं रेंगाळल्यासारखं वाटणारं गाणं उत्तरोत्तर हलक्याशा द्रुत लयीत समेवर यावं असं हे आत्मकथन आहे. तरीही पूर्वार्धावर थोडे अधिक संपादकीय संस्कार झाले असते, तर आवश्यक असणाऱ्या संथ लयीला रेंगाळावं लागलं नसतं. `प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते` या प्रसिद्ध उक्तीच्या पलीकडे इथे काहीतरी आहे. ही नायिका इथे केवळ एवढ्याच भूमिकेत नाही. ही भूमिका पार पाडताना तिने सर्व प्रकारे गांगरवून टाकणाऱ्या परिस्थितीतही स्वतःला जपलं, स्वतःमधल्या गुणांना जमेल तसं आणि तेवढं खतपाणी घालत जोपासलं आणि आपली म्हणून एक ओळख निर्माण केली. ज्या संपूर्णतः अकल्पित, अनपेक्षित जबाबदाऱ्या येऊन पडल्या, त्या लीलया पार पाडत तिने आपलं व्यक्तिमत्त्व जपलं. `मीच एकटीने सारं पहायचं` असा सतत तक्रारखोर धोशा लावत एखादी कर्कशा झाली असती; परंतु सुनंदाताईंचं तसं झालं नाही. म्हणून पुस्तक वाचून झाल्यावर फोनवर मी त्यांना एवढंच म्हणालो, `माउली, कुठून गं इतकी ऊर्जा आणलीस?` 1950 चं दशक, त्याआधीचा आणि नंतरचाही काळ तसा गरिबीचा आहे. समाजाच्या सर्व थरांत अभावग्रस्तता आहे. कसला अभाव आहे याचीही त्या काळ अवकाशाला जाण नाही. आहे ते गोड मानून घेत जगण्याचा हा काळ. या सामाजिक स्तराखाली असाहाय्यपणे जगणारा एक वर्ग आहे. त्याचीही वास्तपुस्त करण्याची गरज या वातावरणात आहे. परंतु सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे संस्कारक्षम घडण्याची, घडविण्याची, अभावग्रस्तता तिथे महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या या नायिकेला हे पर्यावरण लाभलं आहे. त्यांचे वडील मुलं लहान असतानाच गेले. नंतर घरही गेलं आणि मुलांना घेऊन आईला देवळात राहावं लागलं. आहे त्या परिस्थितीतून वाट काढावी या धारणेत सभोवतालच्या सुसंस्कृत वातावरणाचाही मोठा आधार होता. ते सारं मुळातून वाचण्यासारखं आहे. यात गरिबीतले दिवस, हलाखी, अभावग्रस्तता यांपेक्षा हे संस्कार सर्वांत महत्त्वाचे आहेत हे सहजपणे अधोरेखित केलेले आहे. वर ज्या ऊर्जेचा उल्लेख केलाय ती इथूनच सुनंदाताईंना मिळाली आणि म्हणूनच यशस्वी नवन्याच्या पाठीशी उभ्या राहताना त्या स्वतः सर्वप्रकारे यशस्वी ठरल्या आहेत. त्यांच्या आणि अमरापूरकरांच्या कथेला कुठून कुठे नेऊन ठेवणारं वळण शाळा-कॉलेजच्या वयातच आलं. नाटक ! अमरापूरकर म्हणजे नाटक आणि नाटक म्हणजे अमरापूरकर असं हे रसायन होतं. सुनंदाताईही नगरच्या त्या छोट्या नाट्यअवकाशात मनापासून वावरत होत्या. सोबत, साथ होती अमरापूरकरांची. परंतु हा माणूस स्वतःमधल्या रंगकर्मीत इतका खोलवर बुडालेला होता की, जिच्या तो प्रेमात पडलाय; तिलाही नाटकाची आवड आहे; नोंद घेण्याजोगे कलागुण आहेत, तिच्यातला कलावंत घडविण्यात मात्र त्याने रस दाखविला नाही. इतकंच नाही तर पुढे मुंबईत यश मिळविल्यानंतर, बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाल्यानंतरही सुनंदाताईंनी `यशस्वी पुरुषामागे...` ची सर्व प्रकारची भूमिका यशस्वीपणे पार पाडल्यानंतर जेव्हा ऑफिसच्या नाटकात काम करायचं ठरवलं, तेव्हा यांनी त्यास ठाम नकार दिला. इथे पुस्तकातला एक प्रसंग आठवतो. नगरमध्ये नाटकाची तालीम चालली होती. अमरापूरकर खूप सिगरेट्स ओढतात म्हणून पाकीट लपवून ठेवण्यात आलं होतं. पण जसजशी तलफ अनावर होत गेली, तसतसे ते अस्वस्थ होत गेले. नाटकावरून त्यांचं लक्ष उडत चाललं होत. तेव्हा सुनंदाताईनी आपल्या पर्समध्ये लपवून ठेवलेल्या पाकिटातून दोन सिगरेट्स आणून दिल्या. हीच लग्ना आधीची प्रेयसी नंतर पत्नी, गृहिणीच्या भूमिकेतही त्याला असंच सांभाळते. अमरापूरकरांची नाट्यवेडापायी अडलेली त्यांची पदवी या पद‌वीधारक मुलीशी लग्न ठरल्यानंतर ते पूर्ण करतात. इथे लग्न पार पडतं आणि हे भाऊ म्हणतात, `मला पुण्यात राहून एम.ए. करायच आहे. ही बाई हो ला हो करते. नववधू म्हणून तक्रार करत नाही. शिक्षण पूर्ण करून नोकरी करणारी ही मुलगी नोकरीधंदा न करणाऱ्या मुलाशी लग्न करते. तो काळ आणि लहान गाव हे लक्षात घेतलं, तर कदाचित कल्पना येईल की किती अवघड होतं ते. यांचं भांडवल काय तर पिढीजात वाडा आणि व्यवसाय. बरं त्या व्यवसायात तरी सहभाग तर तोही नाही. दिवसरात्र एकच ध्यास. एकच नाद... नाटक पुढे मिळणारे अमाप यश आणि वैभव यांची काही अंशी तरी शक्यता आणवली असेल, तर तसंही काही नव्हतं. आपलं मानलं आणि निभावलं. असेल तर एक विचार मनाशी असेल आधार द्यायला, याची कलानिष्ठा सोळा आपणे सच ! तिथे अन्य गोष्टीला थारा नाही. ते मात्र खरंच होतं. अमरापूरकरांमधला अस्वस्थ रंगकर्मी त्यांना कायमचा मुंबईत घेऊन आला आणि मग सर्वाच्या वाट्याला येतो तसा स्ट्रगल करत ते आधी व्यावसायिक रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक म्हणून यशस्वी होता होता अनपेक्षितपणे सिनेमात जाऊन पोहोचले आणि `अर्धसत्य` नंतर रेस्ट इज द हिस्टरी असा पुढला प्रवास घडला. या आत्मकथनात तो तपशीलवार वाचायला मिळेलच. परंतु त्यात महत्त्वाचं आहे ते भाड्याच्या घरात पितळी स्टोव्ह आणून मुंबईतल्या संसाराला केलेली सुरुवात ते नंतर ऑडीसारख्या महागड्या परदेशी गाड्यांपर्यंत झालेला प्रवास... आणि त्याहीपेक्षा हे घबाड सहजपणे घेणं, हाताळणं, स्वतः सुनंदाताईंनी, अमरापूरकरांनी आणि त्यांच्या तीन मुलींनीही. एकीकडे हे वैभव आणि दुसरीकडे मध्यमवर्गीय साध्या राहणीचे संस्कार ! दस्तुरखुद्द अमरापूरकर तसेच होते, परंतु त्यांच्या प्रचंड बिझी शेड्यूलमध्ये घरच्या आघाडीवर निगुतीने सांभाळलं, निभावून नेलं ते सुनंदाताईंनी. बरं हे करता करता आपली नोकरीही सांभाळली. मुलींची शाळा- कॉलेज, त्यांची जडणघडण, इतर साऱ्या सांसारिक बाबी, अमरापूरकरांच्या वाढत्या उत्पन्नाचं व्यवस्थापन, त्यासाठी नेमावयाचा चार्टर्ड अकाउंटंट वगैरे. आणि हे सारं करताना जे जग कालपरवापर्यंत आपल्यापासून दूर होतं तिथे सहज शिरकाव करण्याची, तिथल्या स्टार मंडळींमध्ये बावरण्याची संधी असताना ते स्वतःहून दूर ठेवणं, आपल्या मुलींनाही त्याचं आकर्षण वाटणार नाही याची काळजी घेणं हे अवघड काम या माउलीने सहज केलंय. अशीच कमाल त्यांनी केली ती त्यांच्या आई, सासू- सासरे आणि अमरापूरकरांच्या घरातच असलेल्या आत्याबाई ताई यांच्या व्यक्तिरेखा, त्यांच्याशी असलेलं नातं आणि रोजचा संबंध यांविषयी लिहिताना. त्यातून त्या वेळचा काळ अवकाश आणि बदलता कौटुंबिक सामाजिक - पोतही सहजपणे दिसून येतो. सासरे म्हणजे घरातला अखेरचा शब्द हे मनाशी कायम मानलेलं. स्वीकारलेलं. परंतु एक वेळ अशी येते की, मागल्या पिढीतलं कुणी दुखावलं तरी त्याची क्षिती न बाळगता, नव्या पिढीला आपली वाट काढावी लागते. कारण तिच्या काळ - अवकाशाचा तो रेटा आहे. तो मागल्या पिढीला कळणे शक्य नाही. स्वतःचा विचार करण्याची ही प्रेरणा खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरते. आणखी एक नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, स्वतंत्रपणे स्वतःचं आयुष्य घडवणारी तरुण मुलगी कट्टर पुरुषसत्ताक सासरी जाते, तेव्हा तो विरोधाभास पेलणं किती अवघड असतं याचंही उदाहरण इथे प्रस्तुत होतं. या दरम्यान वेगळा विचार करणारा, सर्वांना समजून घेणारा संवेदनशील नवराही मधूनच नवरेपणा गाजवतो, पण अशा वेळी `आम्ही यांच्यासाठी एवढं करतो ,पण आमच्याबद्दल काही वाटत नाही` असा तक्रारखोर विचार दूर सारत आपलं काम करत राहणं यासाठी साधनाच लागली असेल. `स्वतःची समजूत घातली यापेक्षा `परिस्थिती नीट समजून घेतली` हा मा हा मार्ग पत्करला की सोपं होतं. मन शांत होतं. कडवटपणा तर कणभर राहात नाही. सर्जनशीलता आणि मनाचा प्रसन्नपणा ताजा टवटवीत राहतो. आणि मग आपल्याला जे करावंस वाटते ते करता येतं. त्याचं व्यवस्थापन सुचतं, जस सुनंदाताईंना त्यांच्या अनुवादाच्या कामाच्या नियोजनात सुचलं. घर आणि एकूणच कुटुंबाचे सर्व करताना त्यांना त्यांच्या लेखनासाठी वेळच काढता येईना, तेव्हा पहाटे लवकर उठून त्यांनी निवांत दोन तास काढले आणि आपलं काम केलं. एवढंच नव्हे तर कॉलेज, अभ्यास हे चाळीसेक वर्षे मागे पडल्यानंतर पुन्हा त्या मुंबई विद्यापीठात हजर झाल्या आणि मायथोलॉजीवरच्या एक वर्षाच्या घनघोर अभ्यासक्रमात स्वतःला झोकून दिलं आणि त्यात उत्तम गुण मिळवून पासही झाल्या. वयाच्या या टप्प्यावर घरगुती जबाबदाऱ्यांत, लेकींच्या बाळंतपणाचीही एकीचं तिकडे अमेरिकेत भर पडली. आरंभी मी म्हटले तस `कुठून आणते ही ऊर्जा ही माउली...!` असं करता करता आता कुठे स्वतः साठी वेळ मिळतोय असं वाटेवाटेपर्यंत अमरापूरकरांचं शेवट गाठणारं आजारपण सुरू होतं. आता पुन्हा नव्याने सारं नियोजन, आता दिवसाचा प्रत्येक क्षण त्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत राहण्यासाठी. अमरापूरकरांची कामं कमी होत चालली होती. जिथून आयुष्याची सुरुवात केली, तिथे जाऊन तिथल्या घरात दोघांनी पुढली वर्ष काढायची असं ठरवता ठरवता तोच सारा वेळ मुंबईत हॉस्पिटलमध्ये काढावा लागला. नगरला पोहोचला तो अमरापूरकरांचा निष्प्राण देह... `खुलभर दुधाची कहाणी` ही एका समजदार आणि कर्तृत्ववान स्त्रीची कहाणी आहे. त्या कहाणीतून मला जाणवलेलं तिचं व्यक्तिमत्त्व अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. सुनंदा अमरापूरकर यांना सलाम! ...Read more