* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WE MUST FIRST UNDERSTAND THE NATURE OF THE RELATION BETWEEN SHAHU CHHATRAPATI, PRABODHANKAR AND KARMAVEER. FOR MAHARAJ, PRABODHANKAR WAS ONE OF HIS ESTEEMED ASSOCIATES IN HIS FIGHT AGAINST THE BRAHMANSHAHI, THE DOMINATION OF BRAHMANS. HE WAS THE SOLE FIGHTER IN THIS BATTLE. THEIR FRIENDSHIP AND LONG-LASTING RELATIONSHIP WAS BASED ON THE FIRM FOUNDATION OF MAHARAJ’S SINCERE SUPPORT AND ENCOURAGEMENT TO PRABODHANKAR. ALTHOUGH PRABODHANKAR LOOKED UPON MAHARAJ AS THE RESCUER OF THE NEGLECTED STRATA OF THE SOCIETY, HE WAS NEVER MAHARAJS DISCIPLE. IT WAS AN ENTIRELY DIFFERENT TALE WHEN IT CAME TO KARMAVEER BHAURAO PATIL. TO HIM, BOTH, MAHARAJ AND PRABODHANKAR WERE HIS MENTORS. PRABODHANKAR WAS A SENIOR ASSOCIATE, A GUIDE, FRIEND-PHILOSOPHER IN HIS MISSION OF SPREADING EDUCATION. HOWEVER, IN BHAURAOS MIND, HE ALWAYS REMAINED MORE OF A GURU. MAHARAJ TOO HAD A FONDNESS TOWARDS BHAURAO. HE WAS AWARE AND HEARTBROKEN ABOUT THE FACT THAT THIS YOUNG MAN WAS TREATED UNFAIRLY IN THE TAR INCIDENT. HIS EMOTIONS AND FONDNESS GREW DEEPER AFTER WITNESSING BHAURAOS ABILITY TO FORGET ALL THE ATROCITIES WHILE MOVING TOWARDS ACHIEVEMENT OF HIS MISSION SINCERELY. HE WAS EXTREMELY PROUD OF BHAURAO FOR FULFILING HIS DREAM OF SPREADING EDUCATION AMONG THE DOWNTRODDEN CLASSES DURING THE BRITISH REGIME.
शाहू महाराज, भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे या तीन समाजधुरीणांचं कार्य अधोरेखित करणारं, या तिघांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारं आणि या तिघांमधील संबंधांचं दर्शन घडविणारं पुस्तक म्हणजे राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे. यातील पहिल्या प्रकरणात या तिघांमधील संबंधांचं स्वरूप विशद केलं आहे. या तिघांच्या कार्याची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली आहे. शाहू महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील, तसेच शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या संबंधांचा सविस्तर वेध घेतला आहे. डांबर प्रकरणाचा ओझरता उल्लेख या प्रकरणात केला आहे. प्रबोधनकारांच्या मदतीसाठी शाहू महाराजांनी पाठवलेला चेक प्रबोधनकारांनी कसा बाणेदारपणे नाकारला याचीही हकिकत या प्रकरणात सांगितली आहे. अंबाबाईचा नायटा याचाही उल्लेख या प्रकरणात आढळतो. क्षात्रजगद्गुरू पदाचा वाद, सातारची राज्यक्रांती, शाहू महाराजांची आणि प्रबोधनकारांची शेवटची भेट, शाहू महाराजांची बदनामी केल्याचा प्रबोधनकारांवर केला गेलेला आरोप आणि त्यामुळे उठलेले वादळ, भाऊराव पाटील आणि प्रबोधनकारांचे संबंध, नोकरी सोडून भाऊरावांनी वसतिगृहे स्थापायचे ठरवले, त्यासाठी धनजीशहा कूपर या उद्योगपतीचा पैसा आणि स्वत:च्या व्यवस्थापकीय कौशल्यातून कारखान्याची निर्मिती, कारखान्याच्या उत्पन्नाचा ठरावीक भाग भाऊरावांना देण्यास कूपर राजी, पण प्रत्यक्षात वेळ आल्यावर कूपरने केलेला विश्वासघात, त्यामुळे भाऊरावांचे त्याला बंदुकीने ठार मारायला निघणे आणि प्रबोधनकारांनी त्यांना त्यापासून परावृत्त करणे, श्री शाहू बोर्डिंगची भाऊरावांनी केलेली स्थापना, वसतिगृहासाठी फंड जमवताना महात्मा गांधींशी ठाकऱ्यांची झालेली जुगलबंदी, १९२३च्या निवडणुकीत भाऊरावांनी कूपरला चारलेली धूळ, प्रबोधन मधून ठाकरे यांनी प्रकाशित केलेले भाऊरावांचे छोटेसे चरित्र इ. हकिकती या प्रकरणात आल्या आहेत. त्याचबरोबर ठाकरे आणि भाऊसाहेब यांच्या चरित्रांवर अधिक संशोधन होण्याची गरज व्यक्त केली आहे. मराठीत प्रबोधनकारांचे समग्र संशोधनात्मक चरित्र उपलब्ध नसल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे आणि भाऊरावांच्या कार्याचा महिमा सांगितला आहे. १६ मे १९२२च्या प्रबोधनच्या अंकात राजर्षी शाहूंना श्रद्धांजली वाहणारा अग्रलेख प्रबोधनकारांनी लिहिला होता. तो या पुस्तकात समाविष्ट केला गेला आहे. या अग्रलेखात त्यांनी शाहू महाराजांच्या जाण्याने झालेली हानी, विविध लोकांचा महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन, अनेक क्षेत्रांत महाराजांचा असलेला दांडगा वचक, त्यांनी पूर्णत्वाला नेलेली कामं आणि त्यांची अपूर्ण राहिलेली कामं, महाराजांची लोकप्रियता आणि त्यांचे विरोधक, ब्राह्मणेतरांची त्यांनी उभी केलेली चळवळ आणि एकूणच महाराजांचं लोकोत्तर व्यक्तिमत्त्व आणि त्यांचं अलौकिक कार्य यावर प्रबोधनकारांनी भाष्य केलं आहे. बॅ. पी. जी. पाटील हे कर्मवीर भाऊराव पाटलांचे शिष्य. त्यांनी शाहू महाराज आणि भाऊराव पाटील यांच्या गुरू-शिष्य संबंधावर लिहिलेला लेखही या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. या लेखातून भाऊरावांच्या जीवनप्रवासातील महत्त्वाच्या घटनांबद्दल पी. जी. पाटील यांनी लिहिलं आहे. भाऊराव पाटील शाहूराजांच्या संपर्कात कसे आले आणि भाऊरावांवर त्यांचा कसा प्रभाव पडला, हे या लेखात उद्धृत केलं आहे. डांबर प्रकरणामुळे भाऊरावांना नाहक सोसावा लागलेला तुरुंगवास आणि तुरुंगवासात त्यांचा झालेला छळ याचंही सविस्तर वर्णन या लेखात केलं आहे. शाहू महाराज आणि भाऊराव यांच्यातील संबंधांचं विलोभनीय दर्शन या लेखातून घडवलं आहे. एकूणच, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यातील संबंधांचं दर्शन घडविताना या त्रयीने केलेलं सामाजिक कार्य सहजतेने उद्धृत होतं. त्यांचं कार्य, त्यांच्यातील संबंध आणि त्यांची लोकोत्तर व्यक्तिमत्त्वं जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे.

No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#DR. JAYSINGRAO PAWAR# RAJASHRI SHAU KARMVIR BHAURAO PATIL & PRABODHANKAR THAKARE# SEARCHLIGHT# VIZALA# ALOIKIK# GURU-SHISHYA# P.G. PATIL# PARASPAR SAMBAND# KOUTUMIBK PARSHWABHUMI# SATYASHODHAK# DAMBAR PRAKARAN# BRAHMANETAR CHALWAL# AMBABAICHA NAYATA# KIRLOSAKR WADI# VASATIGRUH#राजर्षी शाहू महाराज# कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे# डॉ. जयसिंगराव पवार# सर्चलाईट विझला# अलौकिक# गुरू-शिष्य# बॅ. पी. जी. पाटील# परस्पर संबंध# कौटुंबिक पार्श्वभूमी# सत्यशोधक# डांबर प्रकरण# ब्राह्मणेतर चळवळ# अंबाबाईचा नायटा# कूपर इंजिनीअरिंग वक्र्स# किर्लोस्करवाडी# वसतिगृह
Customer Reviews
  • Rating StarSandeep Chavan

    राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या चरित्रात कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे या दोघा सत्यशोधकांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. या तिघांची कार्यक्षेत्रे भिन्न भिन्न असली‚ तरी त्यांची वाटचाल एकमेकांच्या कार्यास पूरक ठरली. हे तिघेही कमेकांशी आत्मीयतेच्या भावबंधांनी बांधलेले होते. त्यांच्यात अनेकदा वैचारिक मतभेद झाले‚ तरी ते एकमेकांच्या कार्याचे सामाजिक महत्त्व जाणत होते. म्हणूनच‚ आपसांतील वादाचे मुद्दे किंवा प्रसंग त्यांनी संबंध तुटेपर्यंत कधीच ताणले नाहीत. कारण‚ असे संबंध तुटण्यात त्यांच्या वैयक्तिक नुकसानीपेक्षा समाजाचीच हानी अधिक होणार होती‚ याची त्यांना पूर्ण जाण होती. (पुस्तकातून साभार) राजर्षी शाहूमहाराज, कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या परस्पर संबंधावर प्रकाश टाकणारे हे छोटेखानी पुस्तक आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more