* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"DR. JAISINGRAO PAWAR IS ONE OF THE MOST AUTHORITATIVE SENIOR HISTORIAN. THE MAIN SUBJECTS OF HIS INTEREST ARE BASICALLY FROM THE MARATHA DYNASTY. THEY INCLUDE CHHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ, CHHTRAPATI RAJARAM MAHARAJ AND MAHARANI TARABAI. IN ADDITION TO THIS TRIPLET, DR. PAWAR HAS MASTERY OVER ANOTHER INFLUENTIAL TRI-STAR; MAHATMA PHULE, RAJARSHEE SHAHU AND DR. AMBEDKAR. SINCE LAST FOUR DECADES DR. PAWAR HAS DEDICATED HIS TIME AND EFFORTS IN PURSUING HISTORY. MORE THAN THIRTY OF HIS BOOKS AND FORTY RESEARCH PAPERS HAVE BEEN PUBLISHED. HE HAS COMPILED THREE VOLUMES OF ‘RAJARSHEE SHAHU SMARAK GRANTH’ WHICH IS A MILESTONE. THE ‘MAHARASHTRA ITIHAS PRABODHINI’ ESTABLISHED BY HIM IN KOLHAPUR IS THE LEADING HISTORY INSTITUTION PROVIDING AID FOR STUDIES RELATED TO HISTORY AND SOCIAL REFORMATION. HIS EXTENSIVE WORK HAS CREATED INTEREST REGARDING HISTORY IN THE MINDS OF COMMON PEOPLE. HIS SAID BOOK IS A COLLECTION OF MANY ARTICLES; EACH REVEALING NEW DIMENSIONS OF THE GREAT SOCIAL REFORMER THAT RAJARSHEE SHAHU MAHARAJ WAS. "
राजर्षी शाहू छत्रपतींच्या जीवनकार्यावरील हा लेखसंग्रह आहे. गेल्या दहा-बारा वर्षांत पाक्षिक लोकराज्य, साप्ताहिक सकाळ, दै. पुढारी, दै. सकाळ इत्यादी विविध नियतकालिकांच्या खास अंकांतून प्रसंगविशेषी प्रसिद्ध झालेले लेख आहेत. याशिवाय दोन लेख कोल्हापूरच्या भाई माधवराव बागल विद्यापीठाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात सादर केलेले ‘शोधनिबंध’ आहेत. ‘ब्राह्मण ब्युरॉक्रसी’ व ‘क्षात्रजगद्गुरू’ या विषयांवरील लेख २००१ मध्ये आम्ही प्रकाशित केलेल्या ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ’या ग्रंथातून घेतले आहेत. अखिल भारतीयांचा उद्धार करण्याचे व्रत घेतलेल्या या थोर पुरुषाचा तत्कालीन वरिष्ठ वर्णीयांच्या इंग्रजांविरुद्ध चालविलेल्या स्वराज्याच्या हक्काच्या चळवळीसंबंधीचा दृष्टिकोन काय होता, हे त्यावरून समजून येते. राजर्षी शाहू छत्रपतींचा लढा अशा दुसऱ्याला स्वातंत्र्याचे हक्क नाकारणा ऱ्या वर्णवर्चस्ववाद्यांविरुद्ध होता. इंग्रजांकडून राजकीय स्वातंत्र्याचे हक्क मागणारे लोक आपल्याच देशातील आपल्याच बांधवांना सामाजिक स्वातंत्र्याचे, सामाजिक न्यायाचे हक्क नाकारत होते. इतिहासाचे विकृतीकरण करणा ऱ्याना सत्येतिहासाचे सादरीकरण करूनच उत्तर देणे, हा सुसंस्कृत समाजाचा राजमार्ग मानला जातो. प्रस्तुत संग्रहातील कोल्हापूर गॅझेटिअरवरील लेख या मार्गावरील लेखकाच्या मतानुसार केलेली वाटचालच आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
"#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#RAJARSHI SHAHU MAHARAJ EK MAGOVA#DR. JAYSINGRAO PAWAR #राजर्षी शाहू छत्रपती : एक मागोवा# डॉ. जयसिंगराव पवार# राजर्षी शाहू छत्रपती महाराज# एक दृष्टिक्षेप# राजर्षी शाहू छत्रपतींचा अभूतपूर्व जाहीरनामा मागासवर्गीयांचा मुक्तिदाता# लोकराजा शाहू छत्रपती# राजर्षी शाहू छत्रपती आणि ब्राह्मण ब्युरॉक्रसी# राजर्षी शाहू छत्रपती : आर्यसमाजी की सत्यशोधकी? # राजर्षी शाहू छत्रपती आणि क्षात्रजगद्गुरू# राजर्षी शाहू छत्रपती आणि स्वराज्य चळवळ# राजर्षी शाहू छत्रपती आणि स्त्रीमुक्तीचे कायदे# राजर्षी शाहू छत्रपतींची वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरी# राजर्षी शाहू छत्रपती आणि कोल्हापूर गॅझेटिअर# संदर्भग्रंथ सूची #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more