* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SOME PEOPLE, WHO ARE GENERALLY AROUND US, APPEAR TO BE ALIENS. IN REALITY, THEY ARE NOT STRANGERS. THEY ARE OUR VERY OWN PEOPLE. OUT OF THE BLUE, IN A FLASH, WE COME TO UNDERSTAND THEM AND THEN WE ARE LEFT DUMBSTRUCK. THEN WE REALISE THAT EACH PERSON IS LIKE A SEPARATE NOVEL, IN THEIR NOVELTY.
भूक माणसाला किती लाचार बनवते! आम्ही सगळ्या बहिणी दोन वेळचं पोटाला काही मिळावं म्हणून वणवण करत होतो. वय लहान, आणि भूक मोठी. जेवणाच्या वेळेला कुणाच्या तरी दारात जाऊन उभं राहायचं. नाइलाज म्हणून त्या घरातली बाई आत बोलवायची आणि मग तिच्या रागासकट, तिच्या जिव्हारी लागणार्‍या शब्दांसकट जे पानात पडेल ते गिळायचं. त्या घरातल्या पुरुषाची नजर अंगावरून फिरत राहायची. किळस यायची- जणू ती नजर नग्न करत आहे. पण निर्लज्ज व्हायचं; कारण पोटात भुकेचा वणवा पेटलेला असायचा. आणि तोच वणवा त्या पुरुषाच्या नजरेत पेटलेला असायचा. दोन्ही भुका शारीरिक.....एक भूक वणवा शमवणारी आणि एक भूक वणवा अजून चेतवणारी...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#SHESH,#SWATI CHANDORKAR # #शेष#स्वाती चांदोरकर #
Customer Reviews
  • Rating Star लोकप्रभा ६/१२/२०१९

    नियतीची गोष्ट... गोष्टीतील चढ-उतार, वेडीवाकडी वळणं, व्यक्तिरेखांचं येणं जाणं, या गोष्टी खऱ्या आयुष्यात घडताना बरेचदा वेदनादायीच ठरतात. काही माणसांना मात्र हे असं कथेतलं जगण्याचा शापच मिळालेला असतो. या शापाचीच कथा आहे, शेष. स्वाती चांदोरकर यांनी सहाबहिणी, त्याचं उन्मळून पडलेलं घर, नात्याची ताटातूट आणि आयुष्याचा एक अध्याय याची गोष्ट ‘शेष’ मध्ये गुंफली आहे. कानडीच्या हेलात गोवलेलं मराठी ती आणखीच जिवंत करतं . हि गोष्ट आयुष्याची काळी बाजू दाखवणारी आहे. पालकांपैकी एक वासनेच्या आहारी गेलेला, लोभी, अहंकारी, सत्तालोलुप असेल तर फक्त ते कुटुंबच नव्हे तर आसपासच्या साऱ्याच भवतालाची कशी होरपळ होते, हे ‘शेष’ आपल्याला दाखवते. गावोगावचे सावकार नाही तर मग पाटील यांचा दरारा आणि त्यांच्या धाकाच्या, भीतीच्या गावावरच्या सत्तेच्या गोष्टी आपण अनेक नाटक- सिनेमांतून पाहिलेल्या असतात. तो विशिष्ट खलनायक संपल्यावर किंवा मेल्यावर सिनेमा संपतो पण ‘शेष’ मधल्या मुलींचं जगणं, त्यांची फरफट खरं तर तिथूनच सुरु होते. गावातले मातब्बर सावकार असलेल्या वडिलांची दहशत, त्यांची सत्ता जेव्हा उलथून पडते तेव्हा या सहा जणींची जी अवस्था होते ती ‘शेष’ मध्ये समोर येते. प्रत्येकीला आपल्या नशिबाचे भोग वेगवेगळ्या पद्धतीने भोगावे लागतातच. कुठेकुठे आपल्या बापाच्या करंट्या कर्तुत्वाची देणीही फेडावी लागतात. या प्रत्येकीच्या आयुष्याने नकोनकोशी वळणं, प्रत्येकीच्या आयुष्याची नकोनकोशी शोकांतिका कथेतून उलगडत जाते. आज या सगळ्या जणी काहीएक ठरवून एकत्र आलेल्या आहेत. सख्ख्या बहिणी पण घरच तुटल्यामुळे हळूहळू यांच्यातले बंधही तुटत गेलेले. त्यातच परिस्थितीने प्रत्येकीला एकेका संकटाच्या, शोकांतिकेच्या बेटावर आणून उभं केलेलं. कुणाला पुढे कुणीच उरलेलं नाही तर कुणाच्या मुलाबाळांपर्यंत त्यांच्या आयुष्यातलं दू;ख पोहोचलेलं. पुलाखालून बरंच पाणी निघून गेल्यानंतर या सगळ्या जणी माहेरच्या गावात आल्या आहेत. त्यांच्याकडे अर्थातच लहानपणीच्या गोड आठवणी अगदी तुरळक आहेत. त्यांनाही इतरांवरच्या अन्यायाची काळी किनार आहे. त्यांची सालस, सोज्वळ आई हा एकमेव धागा त्यांना पुन्हा जवळ आणतो. आता त्यांच्यामध्ये नसलेल्या आईची मनात असलेली ओढ त्यांना एकत्र आणतो. एका पिढीने केलेल्या अन्याय, अत्याचाऱ्यांचा हिशेब पुढच्या पिढीला द्यावा लागतोच, त्याचं उदाहरणं म्हणजे शेष’ ची कथा. पण या सगळ्यातही एक गोष्ट अतिशय सकारात्मक आहे, ते म्हणजे या सगळ्या जणी सार्व्हायव्हर आहेत. त्यांच्या जवळच्या, लांबच्या अनेक पुरुषांनी त्यांच्यावर अनेकदा नको त्या वेळा आणल्या होत्या, नियतीने त्यांचा अंत पाहीला होता तरीही या सगळ्या पचवून उभ्या आहेत, हीच या कथेतली महत्वाची गोष्ट वाटते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
...गणेश जोशी, पुणे.

मी मूळचा अमरावतीचाच परंतु आता पुण्यास स्थायिक झालॊ आहे. या प्रस्तावनेस कारण की मी नुकतेच जी.बी.देशमुख ह्यांनी शब्दबद्ध केलेला श्री. रवींद्र वानखडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभव कथा `कुलामामाच्या देशात ` हा कथा संग्रह वाचला. खुपच आवडला. त्यातील `माकाय आकांत` ही कथा मनाला चटका लावून जाते.. एकंदरीत सर्वच कथा खूप छान शब्द बद्ध केल्या आहेत. मी स्वतः भारतीय स्टेट बँकेत असतांना जवळपास १० वर्षे परतवाड्यास होतो त्यामुळे मेळघाटशी माझा खूप जवळचा संबंध आला आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शरद जवंजाळ, अमरावती.

मी नुकतंच `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचलं. उत्तम लेखन व ओघवती भाषा शैली.