* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SHRIMANYOGI (NATAK)
  • Availability : Available
  • ISBN : 9788171616886
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 1997
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 80
  • Language : MARATHI
  • Category : PLAY
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHIVAJI MAHARAJ SPENT HIS ENTIRE LIFE WITH SINGLEMINDED DETERMINATION TO ACHIEVE NOT ONLY FREEDOM, BUT ALSO ESTABLISH A STATE WITH GOOD GOVERNANCE. WITH THE GOOD OF HIS SUBJECTS CONSTANTLY ON HIS MIND, HE COULD NOT DEVOTE SUFFICIENT TIME TO ADDRESS THE CONFLICTS AND RESENTMENT WITHIN HIS FAMILY. HE COULD GROOM AN EXCEPTIONAL CADRE OF MEN WHO WERE ALL READY TO LAY DOWN THEIR LIVES FOR HIM; BUT HE COULD NOT NURTURE THE MIND OF HIS IMPETUOUS, INTENSE SON SHAMBHU MAHARAJ WHO GREW UP DEPRIVED OF A MOTHER’S LOVE. ALL HIS LIFE SHIVAJI MAHARAJ NURTURED THE DREAM OF SEEING TOTAL ROUT OF AURANGZEB IN DELHI, AND THE HINDU FLAG OF SOVEREIGNTY FLYING HIGH. BUT GOD HAD SOMETHING ELSE IN MIND –
स्वराज्याला सुराज्य करण्याच्या एकाच जिद्दीने शिवाजीमहाराज धडपडत राहिले. अहोरात्र रयतेची काळजी करणारे छत्रपती शिवाजीराजे घरातील असंतोष, दुजाभाव थोपवायला पुरेसा वेळ देऊ शकले नाहीत. शिवाजीमहाराजांनी एकाहून एक जिवाला जीव देणारी माणसं जोडली; परंतु आईविना पोरक्या, हट्टी, मनस्वी स्वभावाच्या शंभूराजांचं, आपल्या लाडक्या पुत्राचं मन सांभाळणं महाराजांच्या आवाक्याबाहेरचं ठरलं. दिल्लीत औरंगजेबाचा सपशेल पराभव करून ‘हिंदू स्वराज्याचा झेंडा’ फडकवायचं स्वप्नं हयातभर शिवाजीमहाराजांनी मनी बाळगलं. परंतु परमेश्वरी संकेत काही वेगळाच होता
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarA.M Patil

    श्रीमानयोगी- रणजित देसाई एक राजा जो जनतेसाठी जगला. एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध आणि लोकहितासाठी लढला. *श्री छत्रपती शिवाजी महाराज* भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून हिंदवी स्वराजय स्थापन केले.या बलाढ्य सत्तांचे राज्य कोरत महाराजांनी शुन्यातुन आपले स्वराज्य उभारण्यास सुरुवात केली.अवघ्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं.संपुर्ण आयुष्य परदास्यातुन सुटका व्हावी,या भूमीवर श्रींच राज्य नांदावं हे स्वप्न साकार करण्यासाठी लढले. निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंतयोगी । यशवन्त कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवन्त नीतिवन्त । जाणता राजा । समर्थ रामदासांनी वर्णिलेलं शिवरायांचं हे उदात्त, दिव्यभव्य रूप म्हणजे प्रत्येक मराठी मनानं पूजलेला शक्तीरूप आदर्श. भारताच्या इतिहासातील तेजानं लखलखणारा दीपस्तंभ. पितृसहवासाला मुकलेल्या राजांना जिजाऊंनी कर्तृत्ववान बनवलं.जिजाऊंनी आणि दादोजींनी केलेल्या संस्कारांमुळे जाणता राजा रयतेला मिळाला. अनेक संकटांची धाड एकामागोमाग येत असतानाही हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नानं पछाडलेेेले शिवबाचे हजारो मावळे आनंदानं जोहार करत होते.बाजीप्रभू,तानाजी,शिवा न्हावी,रामजी,मुरारबाजी,प्रतापराव असे असंख्य हिरे धारातीर्थी पडले. मृत्युच्या दाढेत जावं तसे राजे आग्र्याला गेले आणि आलमगीरच्या कैदेत अडकले. मोरोपंत,प्रतापराव,अनाजी,तानाजी अशा कितीतरी जणांनी त्या परिस्थितितही न खचता पुरंधरच्या तहातून वाचलेलं राज्य राजे नसतानाही धीरानं सांभाळलं.केवढी अमर्याद निष्ठा! अफजल वध, शाहिस्तेखानाची मोहीम,आग्र्याच्या कैदेतुन सुटका,पन्हाळ्यावरुन सुटका,सुरतेची बेसुरत सगळे पराक्रम करणारे राजे वाचताना खुप अभिमान वाटतो. शहाजीराजे,सईबाईंचं अकाली जाणं, मासाहेबांचं जाणं,संभाजी राजांचं वागणं, सोयराबाईंचे शब्द यांमुळे राजांच्या मनाला होणार्या वेदनांची जाणीव वाचताना होते. शंभुराजांना मिर्झाराजांच्या कडे पाठवताना,शिवपिंडीसमोर शिरकमल अर्पण करण्याचा प्रसंग,शंभुराजे मोगलांना मिळाल्याचा प्रसंग, पितृतुल्य फिरंगोजींना तोफेच्या तोंडी देण्याच्या निर्णयाचा प्रसंग,गढीच्या पाटलीणीला न्याय देताना चा प्रसंग असे कितीतरी प्रसंग वाचताना कंठ दाटुन येतो. शिवाजी राजांच्या सहवासातील कित्तेकांना राजे किती मोठया मनाचे होते हे कधी समजलंच नाही याची खंत वाटते.शिवाजी राजांना आयुष्याच्या शेवटच्या काळात पडलेल्या असंख्य प्रश्नांबद्दल वाचताना खुप वाईट वाटतं आणि खरंच राजेपण सर्वांना दिसतं पण त्याच्या वेदना किती भयंकर असतात हे श्रीमानयोगी वाचतानाच समजतं.मनात अढळ स्थान प्राप्त करणारी ही कादंबरी आहे हे निश्चित. ...Read more

  • Rating StarNeeta Andhale

    शिवाजी महाराजांच्या जीवनावर योग्य रितीने प्रकाश टाकणारे पुस्तक

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more