* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE MAD TIBETAN:STORIES FROM THEN AND NOW
  • Availability : Available
  • Translators : SUNANDA AMRAPURKAR
  • ISBN : 9789386342263
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS THE MAIDEN ANTHOLOGY BY DEEPTI NAVAL, THE CRITICALLY ACCLAIMED ACTOR, PAINTER, DIRECTOR AND POET. EACH STORY IN THIS ANTHOLOGY CARRIES A VISUAL AND EMOTIONAL IMPACT AND VIVACITY OF A FILM. WHILE THULLI DRAWS YOU DEEP INTO THE SORDID AND BLEAK LIFE OF A PROSTITUTE IN KAMATHIPURA IN MUMBAI, THE PIANO TUNER GENTLY TUGS AT THE HEART WITH MUSIC. RUTH MAYBERRY INSPIRES WITH HER NEVER-SAY-DIE SPIRIT, YET GRAPPLES WITH LONELINESS. THE MORNING AFTER, THE MAD TIBETAN, PREMONITION, SISTERS, BIRDS ARE ALL FACETS OF LIFE ITSELF - EACH SPEAKS IN A VOICE THAT IS RESONANT OF HOPE, LOVE AND JOY OF ANOTHER DAY.
दीप्ती नवल या एक उत्तम अभिनेत्री म्हणून सर्वांना परिचित आहेत. त्यांनी आपलं अनुभवविश्व ‘द मॅड तिबेटियन’ या पुस्तकात कथारूपाने/लेखांच्या रूपाने चित्रित केलं आहे. ‘पियानो ट्युनर’ ही एका वृद्ध पियानो वादकाची कथा आहे. वयोमानामुळे तो पियानो वाजवू शकत नाही, त्याची अगतिकता आणि तरुणपणातील त्याच्या एका स्मृतीतून त्याला मिळणारा दिलासा, याचं संमिश्र चित्र या कथेतून प्रभावीपणे चित्रित केलं आहे. थर ‘दोघी बहिणी’ कथेतून गिनी आणि बनी या दोन बहिणींचं जगणं समोरं येतं. केवळ आई नसल्यामुळे या मुलींचं भावविश्व कसं उद्ध्वस्तझालंय हे एकाच घटनेतून ठाशीवपणे पुढे येतं. ‘अघटिताची चाहूल’ ही कथा वास या तरुणाचा मनोव्यापार अधोरेखित करते. थर ‘पाखरं’ लेखिकेची पाखरांबाबतची संवेद्यता मांडते. ‘मुंबई सेंट्रल’, ‘नवी सकाळ’, ‘द...द...दामन’, ‘द मॅड तिबेटियन’, ‘थुल्ली’ या कथा असचं नवल यांचं भावविश्वं उलगडतात. एवूÂण या कथा आणि अनुभव यातून मानवी मनाचे वंÂगोरे लेखिकेने टिपले आहेत. व्यक्तिचित्रांच्या कुशल रेखाटनातून जीवनाचं वास्तव दर्शन लेखिकेने घडवलं आहे. या कथा आणि अनुभव मुळातून वाचण्यासारखे आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
THE MAD TIBETAN #DEEPTI NAVAL THE PIANO TUNER# SISTERS# PREMONITION, BIRDS# BOMBAY CENTRAL# THE MORNING AFTER# THE MAD TIBETAN# D# THULLI# BALRAJ SAHANI# RUTH MAYBERRY SUNANDA AMRAPURKAR
Customer Reviews
  • Rating StarVijay Nimbalkar

    कुंटणखाण्यातील वेश्या, त्यांची दलाली करणारे भडवे, त्यांच्यावर निगराणी ठेवणारी मालकीण, त्या वस्तीचा दादा आणि वासनेची आग विझवायला तिथे जाणारी सभ्य समाजातली गिर्‍हाईकं. सभ्यता व संस्कारांना नागडं करून त्यांचं प्रदर्शन मांडणारी ही दुनिया. त्या दुनियेचं बलणं, चालणं, वागणं सगळं कसं अंगावर येणारं. रेड लाईट एरियाला भेट द्यायची तर मनाची भक्कम तयारी हवी. मुंबईच्या फाॅकलंड परिसरातली वेश्यावस्ती. चार जणांना घेऊन एक अँबेसिडर त्या भागात पाच चकरा मारते व शेवटी एका ठिकाणी थांबते. तोकडे कपडे, भडक मेकअप, तोंडात अर्वाच्य शिव्या असलेली एक उत्तान पोरगी गिऱ्हाईकांना पागल करणारे हावभाव करत कडेला उभी असते. अ‍ॅम्बेसिडरचा ड्रायव्हर तिच्याकडे पाहतोय हे लक्षात येताच एक दलाल गाडीजवळ येऊन काच खाली करायला सांगतो. ‘क्या मंगता है साऽब? बोलो ना! एकदम झकास माल देगा! तुम लोग के स्टँडर्ड का, साब!’ दलालाने प्रस्ताव दिला पण त्याच्या बोलण्यावर गाडीतल्या लोकांना काय बोलावं ते सुचलं नाही. ‘क्या बोलते साब? तीनों को ले लेगी! मंगता क्या?’ त्या वेश्येकडे बघत दलालाने या तिघांना डोळा मारला आणि गाडीतले तिन्ही पुरूष तोंड लपवून खाली बघू लागले. गाडीतल्या पुरुषांपैकी एक चित्रपट दिग्दर्शक तर दुसरे दोन अभिनेते होते. दलालाच्या बोलण्याने ते शरमिंदा झालेले. त्या वस्तीत ते `तसल्या` कामासाठी आले नव्हते. तेवढ्यात दलालाचं लक्ष गाडीत बसलेल्या, तोंडाला स्कार्फ गुंडाळलेल्या स्त्रीकडे गेलं. ‘बाजू में एक धरेली है, फिर भी इधरीच घूम रहेले साले!’ दलालाची शिवी त्या स्त्रीच्या जिव्हारी लागली. आणि ती स्त्री होती अभिनेत्री दीप्ती नवल. तिच्या बरोबर गाडीत बसलेल्या पुरुषांमध्ये एक होता तिच्या `चिरूथा` नावाच्या चित्रपटाचा दिग्दर्शक तन्वीर तर दुसरे पुरूष त्याच चित्रपटातील तिचे सहअभिनेते होते. विकृत शेवट असलेल्या एका घटनेविषयी दीप्तीने वर्तमानपत्रात वाचलेलं. एका वेश्येच्या आयुष्यात घडलेल्या त्या घटनेचा विषय अतिशय संवेदनशील व अस्वस्थ करणारा होता. त्या घटनेचं कात्रण दीप्तीने तन्वीरला दाखवलं आणि त्यांनी त्या विषयावर चित्रपट बनवायचं ठरवलं. पण वेश्येची भूमिका करण्याअगोदर आपण स्वतः वेश्यावस्तीत जाऊन, एखाद्या वेश्येला भेटून, तिच्याशी चर्चा करून ती भूमिका साकारावी असं दीप्तीला वाटलं. त्यासाठीच ते चौघे पावसाच्या रात्री त्या वेश्यावस्तीत आलेले. प्रसिध्द अभिनेत्री असल्याने तसंच तिथले लोक ओळखत असल्याने दीप्तीला एका वेश्येच्या खोलीत प्रवेश मिळाला. तिचं नाव थुल्ली. अंधारी, अतिशय छोटी खोली. उजेड नावालाच. हवा येण्या-जाण्यासाठी एकही खिडकी नाही. अस्वच्छ, घाणेरडी जागा. दीप्ती खोलीत आली त्यावेळी रात्रीचे तीन वाजलेले. थुल्ली, खोलीची मालकीण, खिडकीत बसलेली तर तिच्या देखरेखीखाली शरीरविक्रय करणाऱ्या नऊ वेश्या भुईवर आडव्या तिडव्या झोपलेल्या. त्या वेश्यांत दहा-बारा वर्षांच्या मुलीही होत्या. खोलीत दोन छोट्या खाटा मांडलेल्या. जागा इतकी अपुरी की नऊ पोरी एकमेकींत हात पाय अडकवून झोपल्यावर तिथे फुटभरही जागा शिल्लक नव्हती. थुल्ली व दीप्तीमध्ये गप्पा सुरू झाल्या. `आणि... ते पुरुष आल्यावर कुठे झोपतात?` दीप्तीने बिचकत विचारलं. `इथेच! एका वेळी दोन बेडवर दोन!` थुल्ली सहज बोलली. `एखाद्या कष्टमरला घाई असली की माझी पोरगी त्याला जिन्यातच घेते.` `हे सगळं चालतं त्यावेळी तुम्ही कुठे जाता?` मती गुंग झालेल्या दीप्तीने पुढचा प्रश्न विचारला. `कुठं जाणार? इथंच असतो! एखादी बाई खाटेवर गिऱ्हाईक घेत असली की त्याच खाटेखाली दुसरी पोरगी खेळत असते...` `काय?` थुल्लीला मध्येच थांबवत दिप्तीने विचारलं. `तुम्हाला `ते` आवाज येत नाहीत का?` `सगळे आवाज येतात! त्यांचं आरडणं, ओरडणं, चित्कार, घाण बोलणं... आम्हाला त्याची सवय झालेय.` कान बंद करावेत, डोळे झाकावेत आणि असंच इथून पळून जावं असं दीप्तीला वाटलं. वेश्येच्या जीवनाचा अभ्यास करावा म्हणून तिथे आलेली दीप्ती प्रचंड अस्वस्थ झाली. अभिनेत्री होण्यासाठी दीप्ती अमेरिका सोडून मुंबईला आलेली तसंच थुल्लीलाही `तू सुंदर आहेस. पिच्चरमध्ये छोटी-मोठी काम देतो` म्हणून कुणीतरी मुंबईत आणलेलं. दोघीही कामासाठी मुंबईत आलेल्या स्त्रिया. पण त्यांचं जग किती भिन्न होतं. एक स्त्री म्हणून दीप्तीला थुल्लीची कहाणी ऐकवेना पण त्याच वेळी तिच्यातील अभिनेत्रीचं थुल्लीच्या जगाविषयीचं कुतूहल वाढलं होतं. पहाटेचे चार वाजले आणि खाली गोंधळ सुरू झाला. कुंटणखाण्याचा दादा जिन्याने वर येत होता. `तिथे येणाऱ्या प्रत्येक नव्या स्त्रीचा उपभोग घ्यायचा पहिला हक्क आपलाच` असं समजणारा दादा खोलीत आल्यावर काय होईल याची दीप्तीला कल्पना नव्हती. - विजय निंबाळकर, लोहगाव - पुणे #दमॅडतिबेटियन #दीप्तीनवल #सुनंदाअमरापूरकर #मेहतापब्लिशिंगहाऊस #कथासंग्रह ...Read more

  • Rating StarChitra Rajendra Joshi

    फेसबुकच्या आठवणींतून वर आलेली ही चार वर्षांपूर्वीची पोस्ट. त्यावेळी हा ग्रुप नव्हता बहुधा, म्हणून इथे देत आहे. ------------------------ द मॅड तिबेटियन.. गोष्टी तेव्हाच्या आणि आत्ताच्या! दीप्ती नवल - अनुवाद: सुनंदा अमरापूरकर - मेहता पब्लिशिं हाऊस - प्रथमावृत्ती: जानेवारी २०१७ - किंमत: रु.१५०/- पृष्ठे:१३० कोणताही कथासंग्रह वाचताना त्या कथा `कोणी` लिहिल्या आहेत याला कितीसं महत्त्व असावं-द्यावं? त्यातील कथाभाग काय आहे, त्या कशा मांडल्या-विस्तारल्या आहेत, त्यात ‘पुढे काय होणार’ अशी उत्सुकता वाटतेय, त्या गुंगवून ठेवताहेत की कंटाळवाण्या वाटताहेत, त्यातील मतितार्थ काय आहे ... कथांमधे निसर्ग आहे, शहरं आहेत, डोंगराळ भागातील गावं आहेत, वेगवेगळ्या वयाची-वातावरणातील माणसं आहेत. थोडक्या आणि प्रभावी शब्दांतील अनुभव वाचून आपल्याला आनंद मिळाला, आपल्या परिघात नसलेल्या पण आपल्याला नवीन वाटणार्‍या दुनियेचं दर्शन घडलं. हे पुरेसं न ठरता त्या `कोणी` लिहिल्या आहेत याचं इतकं महत्त्व का वाटतं? लेखिका जर झगमगत्या चित्रपट दुनियेतील सुप्रसिध्द अभिनेत्री शिवाय आवडतीही असेल तर कुतूहल जरा जास्तच जागं होतं. अभिनेत्री, चित्रकार, फोटोग्राफर, कवयित्री आणि कथालेखिका दीप्ती नवल. ती अभिनय-दिग्दर्शन करते, पेंटिंग करते, फोटोग्राफी करते, तिला कविता होतात आणि ती कथा लिहिते. मनातली अभिव्यक्तीसाठी निरनिराळ्या माध्यमांवर तिचं प्रभुत्व आहे. ‘लम्हा लम्हा’ हा आसावरी काकडे यांनी मराठीत अनुवादित केलेला कवितासंग्रह आणि नुकताच वाचलेला, सुनंदा अमरापूरकरांनी मराठीत अनुवाद केलेला कथासंग्रह - द मॅड तिबेटियन.. गोष्टी तेव्हाच्या आणि आत्ताच्या! हे दोन्ही वाचल्यानंतर प्रश्न पडला - ह्यातील कोणती दीप्ती नवल जास्त आवडते? दृश्य माध्यमातून निरनिराळ्या भूमिका साकारणारी की थोडक्या शब्दांतील कवितांतून स्वत:च्या भावनांना मोकळं करणारी की कथांतून ‘तेव्हाच्या आणि आत्ताच्या’ गोष्टी सांगणारी? ह्याचं साधं सोपं उत्तर इतकंच आहे की प्रत्येक माध्यमातून अस्सलपणे व्यक्त होणारी दीप्ती नवल आवडली/ आवडते. तिची एक कविता आहे, ‘आठवणी’. त्या ‘आठवणीं’ना काळाचं बंधन नाही, त्यांत इंद्रधनुष्याप्रमाणे रंगीबेरंगी असणार्‍या सुंदर गाठीभेटी आहेत, हरवलेली स्मितं-विखुरलेल्या प्रतिमा आहेत. हिरवेगार डोंगरघाट अन त्यात थांबून थांबून पडणारा पाऊस आहे. आणि ह्याच आठवणींचा विस्तार म्हणजे ‘द मॅड तिबेटियन.. गोष्टी तेव्हाच्या आणि आत्ताच्या!’ आहेत. एकूण अकरा कथांचा हा संग्रह! लेखिकेच्या नजरेने टिपलेलं आणि नेटकेपणे साकारलेलं मुंबई, लडाख, दिल्ली, उ. हिंदुस्थान अशा अनेक ठिकाणी वास्तव्य करणार्‍या माणसांचं जगणं जसं ह्यात आहे तद्वतच आत्मकथनाप्रमाणे वाटणारे खास अनुभवही कथा-रूपाने व्यक्त झाले आहेत. देहबोली अथवा शब्दबोलीतून भूमिका साकारणे हे ह्या कलावतीत मुरलेलं आहे. चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली निरनिराळ्या व्यक्तिरेखांच्या भूमिका साकारताना त्यांच्यात देहप्रवेश करणे असो वा कथेनुसार त्या-त्या व्यक्तिरेखांचा विस्तार करण्यासाठी शब्दांच्या माध्यमातून त्यांच्यात शिरणे असो. ‘सहजता’ हा उपजत स्वभाव तिच्या प्रत्येक आविष्कारात आहेच आहे. कामाठीपुर्‍यातील दोन खोल्या-चार खाटा यावर कुंटणखाना चालवणारी मूळ नेपाळची असणारी ‘थुल्ली’. ती निव्वळ एक वेश्या नव्हे तर एक स्त्री म्हणून असणारी तिची अगतिकता ह्या कथेत सार्थ व्यक्त झाली आहे. एका सिनेमात वेश्येच्या भूमिकेचा पूर्वाभ्यास करण्यासाठी लेखिका तिला थेट तिकडेच जाऊन भेटते. अंदाधुंदपणे कोसळणार्‍या मुसळधार पावसातून आपल्या तीन पुरूष सहकार्‍यांसह उपनगरातून ती निघते. कामाठीपुर्‍यात वाटा चुकत, रस्ता शोधत, रात्री अपरात्री थुल्लीच्या खोल्यांवर पोचते. लेखिका एकटीच आत जाऊन थुल्लीशी गप्पा मारते, तिच्या व्यवसायाची(!) माहिती घेत रहाते. तिथून निघेपर्यंत उशीर होत रहातो, जवळ-जवळ पहाट होते. त्याच वेळी कुंटणखान्याचा तथाकथित मालक असलेला दादा दारू पिरून झिंगलेल्या अवस्थेत पोचतो. कुणी नवीन पाखरू इथे आलाय अशी त्याला कुणकुण लागलेली असते. त्याच्यापासून वाचण्यासाठी लेखिकेला अक्षरश: तिथून पळ काढावा लागतो. तिला तिथून निसटता यावं यासाठी थुल्ली जे काही करते ते वाचताना आपलाही जीव थुल्लीसाठी व्याकुळतो. दिल्लीत अत्यंत घाई-गडबडीत असताना शाळेतील एक जुनी मैत्रीण भेटते. लेखिका तिला ओळखते. तिच्याशी बोलताना एकीकडे तिचं नाव खूप प्रयत्न करूनही लेखिकेला आठवत नाही. ‘ही आता मोठी अभिनेत्री झालीये तरीही आपली ओळख ठेवतेय. परंतु हिला आपलं नावही आठवत नाही म्हणजे ही आपल्याला विसरली आणि तोंडदेखलेपणाने ती आपल्याशी बोलतेय’ असं समजून ती मैत्रीण नाराज होत ‘सॉरी, तुमचा वेळ घेतला’ असं म्हणून निघून गेल्यानंतर लेखिकेला काही क्षणांतच तिचं नाव आठवतं आणि ती हाका मारते तोवर मैत्रीण निघून गेलेली असते. ओशाळून गेलेली लेखिका आपल्या मनाशी विचार करत रहाते की मी खोटी ओळख दिली का? माणसांच्या अति वावरापासून अजूनही बर्‍यापैकी दूर असलेला लेह-लडाखचा पहाडी-बर्फाळ-रंगीबेरंगी निसर्ग आणि तिथल्या एकांतवासात अवचितपणे भेटलेला द मॅड तिबेटियन.. न्योनबा! ह्या कथेतील गूढता शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. ३ नोव्हेंबर १९६३. दीप्ती नवल नऊ वर्षांची होती. तिच्या गावात, अमृतसर, बलराज साहनींना नाटकात बघण्याची, त्यांची सही घेण्याची संधी तिला मिळाली आणि त्याचवेळी तिचा निश्चय झाला की - ‘मी बलराज साहनीसारखी रुबाबदार होणार.. त्याच्यासारखीच तरल.. कुठलीही भूमिका केली किंवा आयुष्यात काहीही केलं, तरी ते अस्सल असेल. मी अभिनेत्री झाले तर बलराज साहनीसारखी होणार, अस्सल!’ तिने अंमलात आणलेला हा निश्चय, तिचं ‘अस्सलपण’ जसं आपण तिच्या सगळयाच चित्रपटांमधून अनुभवलेलं आहे तेच तिच्या कविता-कथांमधून झिरपलेलं आहे. चित्रा राजेन्द्र जोशी.... 9.5.2017 ...Read more

  • Rating StarKiran Borkar

    सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि चित्रकार दीप्ती नवल यांचा हा कथासंग्रह .यातील कथा छोट्या आहेत .पण त्या वाचताना आपण त्यात गुंतून जातो .जणूकाही आपल्याच आजूबाजूला घडणाऱ्या या गोष्टी आहेत.त्यांच्या पियानो ट्युनर मधील हताश म्हातारा .तर डोके भादरले म्हणून सैरभैर ालेल्या दोन छोट्या बहिणी .अपघाताची जाणीव झालेला आणि स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करणारा तरुण.या कथा वाचून मन हेलावून जाते . ...Read more

  • Rating StarSAPTAHIK SAKAL 12-08-2017

    ठसा उमटवणाऱ्या कथा... दीप्ती नवल एक संवेदनशील अभिनेत्री, चित्रकार, कवयित्री आणि लेखिका. १९८०च्या सुमारास आलेल्या ‘चष्मेबद्दूर’ सिनेमातील तीच ती मिस चमको... हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रत्येक भूमिकेवर एक उत्कट ठसा उमटवणारी अभिने्री. अमेरिकेत राहून फाइनआर्टचे शिक्षण घेतलेली. तरुणपणीच ‘लम्हा लम्हा’ सारख्या रोमन्टिक मूड टिपणाऱ्या कविता लिहिणारी आणि आता आपली चित्रकाराची आणि फोटोग्राफीची नजर घेऊन, आयुष्याची गुंतागुंत जाणत शब्दातून कथा उभी करणारी दीप्ती नवल ‘द मॅड तिबेटियन’ या कथासंग्रहात भेटते आहे. तिच्या शैलीचा उत्कट स्वर सुनंदा अमरापूरकर यांनी मराठी अनुवादात उत्तम उमटवला आहे. खूप वेळा सेलिब्रेटीजनी लिहिलेल्या लेखनाचे स्वरूप त्यांच्या चाहत्यांनी कौतुकाने वाचावे इतपतच असते किंवा त्यांच्या स्वत:च्या प्रमोशनचा भाग असते. साहित्य म्हणून त्याचा विचार करण्याइतके त्याचे आयुष्य नसते. पण दीप्ती नवल यांच्या लेखनाचे छोटेखानी अवकाशाची ताकद ओळखून त्यांचे शब्द कधी एखाद्या व्यक्तीच्या भावना, मनातील स्पंदनं, आशा, प्रेम, आनंद, एकाकीपणा, जगण्याचा परीघ दाखवत जातात. वृत्तीची काव्यात्मता, प्रवासीपण, सिनेमा तंत्राचा प्रभाव या गोटींनी त्यांची शैली घडवलेली आहे असे म्हणण्यापेक्षा ही शैली सहज घडली आहे असे म्हणणे योग्य ठरेल. एकेकाळच्या उत्तम पियानो वादक आणि आजचा ‘पियानोट्यूनर’, आयुष्याच्या एकटेपणाची चौकट बांधली गेल्यावरही आपल्यापुढे ठसा ठेवतो तो एका निर्धाराचा! ‘अघटिताची चाहूल’ लागलेला तरुण प्रवासी अघटित घडून गेल्यावर ‘ती’ वाचत असलेले पुस्तक दडपण्यासाठी धडपडतो. ‘ती’ तर गेली, तिचं नावही कळणार नाही आता, पण तिचे पुस्तक सुरक्षित होतं, तो पान उघडून पाहतो तर त्या यु. आर. अनंतमूर्तींच्या कथा असतात. ‘दोघी बहिणी’च्या मनातली आई परत येईल ही आशा स्वातंत्र्यापेक्षा मोठी ठरते. ‘मुंबई सेंट्रल’ कथेतील सोळा वर्षाच्या मुलाला अचानक मोठा करून गेलेला अनुभव. एका रात्रीत लीलीच्या आयुष्यात सुरू झालेली नवी सकाळ आणि नवा दिवस. खूप घाई-गर्दीच्या दिवसात केवळ वेळेवर नाव न आठवल्याने दुखावून दूर गेलेली ‘द... द... दामन’ या कथा एका ओघात वाचकांना बरोबर नेतात. ‘द मॅड तिबेटियन’, ‘थुल्ली’, ‘बलराज साहनी’, ‘रुथ मेबेरी’ या कथा खास दीप्ती नवलचा स्पेशल टच ठळक करतात. लडाखच्या दऱ्या-खोऱ्यात फोटोग्राफीसाठी भटकंती करताना भेटलेला ‘द मॅड तिबेटियन’ त्याला भेटण्याचा क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करणं म्हणजे अन्याय केल्यासारखेच. त्याच्या या मॅडपणातली स्वभावाची आनंदी फकिरी छटा कॅमेऱ्यात कशी पकडता येणार म्हणून शब्दबद्ध झालेली. तर भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी मुंबईच्या कामाठीपुऱ्यात गेल्यावर भेटलेली ‘थुल्ली’ एक स्त्री म्हणून नातं जोडताना मानवी संबंधाचे विस्कटलेले समीकरणच समोर ठेवून थक्क करते. ‘रुथ मेबेरी’ ही एका पटकथा लेखिकेची अशीच सुन्न करणारी कहाणी. सतरा वर्षे एका पटकथेचं लेखन करणारी रुथ, तिची लेखननिष्ठा (जीवननिष्ठा?), तिचे उतारवयाने येत चाललेले एकाकीपण, काहीसे विक्षिप्तपण, तिला एक्झिट घेण्याची वेळ आल्याची झालेली जाणीव आणि सर्व डिलीट करून टाकण्याचा निर्णय, त्याचा भोवतालच्या जगावर एखादा तरंगही न उठणं जगाच्या संवेदनशीलतेलाच प्रश्न करते. उत्कट जाणिवेच्या प्रवासाला नेणाऱ्या कथांचा वाचनीय असा कथासंग्रह. -आशा साठे ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
साधना साप्ताहिक ३ ऑगस्ट २०२४ ... अशोक राणे

सुनंदा अमरापूरकर यांनी त्यांचं `खुलभर दुधाची कहाणी` हे आत्मकथन पाठवलं तेव्हा `आता हे वाचायचं केव्हा` असा प्रश्न सर्वप्रथम मनाशी आला. देणेकरी दाराशी ठाण मांडून बसावेत तशी अनेक पुस्तकं, कोणी कोणी पाठवलेल्या त्यांच्या फिल्म्स आणि माझे सतराशे साठ व्याप सोर असताना कसा वेळ काढायचा? माझं सबंध आयुष्य सिनेमा, तो आकाराला आणणारे दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ, त्यांच्या निर्मितीमागच्या प्रेरणा आणि त्यांच्यातला माणूस याचा शोध घेण्यात गेलं. एका गोष्टीचं कुतूहल होतं आणि ते म्हणजे या सर्वांच्या पलीकडे असलेलं, परंतु क्वचितच कळलेलं असं त्यांच्या कुटुंबातल्याच व्यक्तीने वर्णिलेलं अमरापूरकरांचं चरित्र ! सगळी व्यवधानं बाजूला ठेवून सुनंदा अमरापूरकरांचं आत्मकथन वाचायला हे कुतूहल पुरलं. मनोगतातलं पहिलंच वाक्य आहे... `मी या आठवणी का लिहिल्या ?` ...आणि मला चट्‌कन थोर अभिजात अभिनेत्री इंग्रीड बर्गमन हिचं `माय स्टोरी` आठवलं. तिनेही अशीच सुरुवात केलीय. तिची मुलं म्हणाली, `तुझ्या आयुष्याविषयी कुणी तरी तिखटमीठ लावून काहीबाही लिहील, त्याआधी तूच सारं खरं मोकळेपणानं सांगून टाक. तिने जाडजूड ग्रंथात अभिनेत्री म्हणून तिचा सारा प्रवास कसलाही आडपडदा न ठेवता सविस्तर सांगितला. सुनंदाताईंचं पुस्तक आणि त्यातलं हे पहिलं वाक्य वाचताना मला हे का आठवावं? त्यांची पहिली ओळख म्हणजे नाट्य-चित्रसृष्टीतला एक मोठा अभिनेता, दिग्दर्शक सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी आणि अलीकडचा परिचय म्हणजे एक उत्तम अनुवादकर्त्या. तर आता त्या आपल्या प्रसिद्ध नवऱ्याविषयी काय आणि कसं सांगतात, त्याचबरोबर त्यांचं वैवाहिक सहजीवन, एकूणच त्यांचं कौटुंबिक जीवन कसं उलगडून दाखवतात याचं कुतूहल होतं. मुख्य म्हणजे त्यांची मध्यमवर्गीय पार्श्वभूमी आणि सदाशिव अमरापूरकरांना मुंबईत स्थैर्य लाभेपर्यंत नगरसारख्या छोटया शहरातला त्यांचा वावर यातून पुढला सारा अचंबित करणारा प्रवास त्या का मांडतात याचीही उत्सुकता मनात होतीच, अमरापूरकर कुटुंबाचा प्रवास हा केवळ नगर ते मुंबई नव्हता. एखाद्या नवख्या नटाने रंगमंचाच्या अंधाऱ्या अवकाशात प्रवेश करावा आणि अचानक त्याच्यावर सर्व अंगांनी प्रखर प्रकाशझोत यावा, त्याचे डोळे इतके दिपून जावेत की त्याला ते नीट उघडून सभोवताल पाहता येऊ नये असाच काहीसा अनुभव या कुटुंबाने घेतला आहे. प्रायोगिक वे व्यावसायिक रंगभूमी हे स्थित्यंतर तसं फार तर कनिष्ठ ते उच्च मध्यमवर्गीय याच काहीशा परिचित अवकाशातलं; परंतु हिंदी सिनेमातली प्रसिद्धी तर भिरभिरावून टाकणारी. ते अंगावर घेत, वागवत या कुटुंबाने कशी वाटचाल केली हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. एवढी प्रचंड प्रसिद्धी आणि वलय लाभूनही अमरापूरकर कधी फिल्मी झाले नाहीत हे वाटतं तितके सोपे नाही. `खुलभर दुधाची कहाणी यातून ते उलगडणार होते... वाचायला सुरुवात केल्यावर ते खूप तपशीलवार आणि पसरटही वाटलं. पण वाचत गेलो तसतसं लक्षात आलं की, सुनंदाताईंनी चितारलेला परिसर तप‌शिलातल्या काही फरकाने आपलाही आहे. आपणच प्रत्यक्ष जगलेले, पाहिलेल वाचतो आहोत. साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या आमच्या शाळकरी वयापासून वाचलेल्या साहित्यातून हेच सर्व पाहत आलोय. आपल्या मुलांच्या आणि नातवंडाच्या पिढीला तर हा काळ अवकाश सर्वस्वी अपरिचित. हे त्यांच्यासाठीही आहे. आजच्या नव्या पिढीला 2000 चा चित्रपट जुना वाटतो, तेव्हा त्याआधीच्या त्यांच्या आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या सिनेमाशी आपण जसा त्यांचा परिचय करून देतो तसंच आहे हे. शिवाय या कथनाच्या नायिकेने पुढे अपरिहार्य असं जे वळण गाठलं आहे, त्यासाठी हे आवश्यकच आहे. संथ लयीत सुरू झालेलं आणि काहीसं रेंगाळल्यासारखं वाटणारं गाणं उत्तरोत्तर हलक्याशा द्रुत लयीत समेवर यावं असं हे आत्मकथन आहे. तरीही पूर्वार्धावर थोडे अधिक संपादकीय संस्कार झाले असते, तर आवश्यक असणाऱ्या संथ लयीला रेंगाळावं लागलं नसतं. `प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते` या प्रसिद्ध उक्तीच्या पलीकडे इथे काहीतरी आहे. ही नायिका इथे केवळ एवढ्याच भूमिकेत नाही. ही भूमिका पार पाडताना तिने सर्व प्रकारे गांगरवून टाकणाऱ्या परिस्थितीतही स्वतःला जपलं, स्वतःमधल्या गुणांना जमेल तसं आणि तेवढं खतपाणी घालत जोपासलं आणि आपली म्हणून एक ओळख निर्माण केली. ज्या संपूर्णतः अकल्पित, अनपेक्षित जबाबदाऱ्या येऊन पडल्या, त्या लीलया पार पाडत तिने आपलं व्यक्तिमत्त्व जपलं. `मीच एकटीने सारं पहायचं` असा सतत तक्रारखोर धोशा लावत एखादी कर्कशा झाली असती; परंतु सुनंदाताईंचं तसं झालं नाही. म्हणून पुस्तक वाचून झाल्यावर फोनवर मी त्यांना एवढंच म्हणालो, `माउली, कुठून गं इतकी ऊर्जा आणलीस?` 1950 चं दशक, त्याआधीचा आणि नंतरचाही काळ तसा गरिबीचा आहे. समाजाच्या सर्व थरांत अभावग्रस्तता आहे. कसला अभाव आहे याचीही त्या काळ अवकाशाला जाण नाही. आहे ते गोड मानून घेत जगण्याचा हा काळ. या सामाजिक स्तराखाली असाहाय्यपणे जगणारा एक वर्ग आहे. त्याचीही वास्तपुस्त करण्याची गरज या वातावरणात आहे. परंतु सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे संस्कारक्षम घडण्याची, घडविण्याची, अभावग्रस्तता तिथे महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या या नायिकेला हे पर्यावरण लाभलं आहे. त्यांचे वडील मुलं लहान असतानाच गेले. नंतर घरही गेलं आणि मुलांना घेऊन आईला देवळात राहावं लागलं. आहे त्या परिस्थितीतून वाट काढावी या धारणेत सभोवतालच्या सुसंस्कृत वातावरणाचाही मोठा आधार होता. ते सारं मुळातून वाचण्यासारखं आहे. यात गरिबीतले दिवस, हलाखी, अभावग्रस्तता यांपेक्षा हे संस्कार सर्वांत महत्त्वाचे आहेत हे सहजपणे अधोरेखित केलेले आहे. वर ज्या ऊर्जेचा उल्लेख केलाय ती इथूनच सुनंदाताईंना मिळाली आणि म्हणूनच यशस्वी नवन्याच्या पाठीशी उभ्या राहताना त्या स्वतः सर्वप्रकारे यशस्वी ठरल्या आहेत. त्यांच्या आणि अमरापूरकरांच्या कथेला कुठून कुठे नेऊन ठेवणारं वळण शाळा-कॉलेजच्या वयातच आलं. नाटक ! अमरापूरकर म्हणजे नाटक आणि नाटक म्हणजे अमरापूरकर असं हे रसायन होतं. सुनंदाताईही नगरच्या त्या छोट्या नाट्यअवकाशात मनापासून वावरत होत्या. सोबत, साथ होती अमरापूरकरांची. परंतु हा माणूस स्वतःमधल्या रंगकर्मीत इतका खोलवर बुडालेला होता की, जिच्या तो प्रेमात पडलाय; तिलाही नाटकाची आवड आहे; नोंद घेण्याजोगे कलागुण आहेत, तिच्यातला कलावंत घडविण्यात मात्र त्याने रस दाखविला नाही. इतकंच नाही तर पुढे मुंबईत यश मिळविल्यानंतर, बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाल्यानंतरही सुनंदाताईंनी `यशस्वी पुरुषामागे...` ची सर्व प्रकारची भूमिका यशस्वीपणे पार पाडल्यानंतर जेव्हा ऑफिसच्या नाटकात काम करायचं ठरवलं, तेव्हा यांनी त्यास ठाम नकार दिला. इथे पुस्तकातला एक प्रसंग आठवतो. नगरमध्ये नाटकाची तालीम चालली होती. अमरापूरकर खूप सिगरेट्स ओढतात म्हणून पाकीट लपवून ठेवण्यात आलं होतं. पण जसजशी तलफ अनावर होत गेली, तसतसे ते अस्वस्थ होत गेले. नाटकावरून त्यांचं लक्ष उडत चाललं होत. तेव्हा सुनंदाताईनी आपल्या पर्समध्ये लपवून ठेवलेल्या पाकिटातून दोन सिगरेट्स आणून दिल्या. हीच लग्ना आधीची प्रेयसी नंतर पत्नी, गृहिणीच्या भूमिकेतही त्याला असंच सांभाळते. अमरापूरकरांची नाट्यवेडापायी अडलेली त्यांची पदवी या पद‌वीधारक मुलीशी लग्न ठरल्यानंतर ते पूर्ण करतात. इथे लग्न पार पडतं आणि हे भाऊ म्हणतात, `मला पुण्यात राहून एम.ए. करायच आहे. ही बाई हो ला हो करते. नववधू म्हणून तक्रार करत नाही. शिक्षण पूर्ण करून नोकरी करणारी ही मुलगी नोकरीधंदा न करणाऱ्या मुलाशी लग्न करते. तो काळ आणि लहान गाव हे लक्षात घेतलं, तर कदाचित कल्पना येईल की किती अवघड होतं ते. यांचं भांडवल काय तर पिढीजात वाडा आणि व्यवसाय. बरं त्या व्यवसायात तरी सहभाग तर तोही नाही. दिवसरात्र एकच ध्यास. एकच नाद... नाटक पुढे मिळणारे अमाप यश आणि वैभव यांची काही अंशी तरी शक्यता आणवली असेल, तर तसंही काही नव्हतं. आपलं मानलं आणि निभावलं. असेल तर एक विचार मनाशी असेल आधार द्यायला, याची कलानिष्ठा सोळा आपणे सच ! तिथे अन्य गोष्टीला थारा नाही. ते मात्र खरंच होतं. अमरापूरकरांमधला अस्वस्थ रंगकर्मी त्यांना कायमचा मुंबईत घेऊन आला आणि मग सर्वाच्या वाट्याला येतो तसा स्ट्रगल करत ते आधी व्यावसायिक रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक म्हणून यशस्वी होता होता अनपेक्षितपणे सिनेमात जाऊन पोहोचले आणि `अर्धसत्य` नंतर रेस्ट इज द हिस्टरी असा पुढला प्रवास घडला. या आत्मकथनात तो तपशीलवार वाचायला मिळेलच. परंतु त्यात महत्त्वाचं आहे ते भाड्याच्या घरात पितळी स्टोव्ह आणून मुंबईतल्या संसाराला केलेली सुरुवात ते नंतर ऑडीसारख्या महागड्या परदेशी गाड्यांपर्यंत झालेला प्रवास... आणि त्याहीपेक्षा हे घबाड सहजपणे घेणं, हाताळणं, स्वतः सुनंदाताईंनी, अमरापूरकरांनी आणि त्यांच्या तीन मुलींनीही. एकीकडे हे वैभव आणि दुसरीकडे मध्यमवर्गीय साध्या राहणीचे संस्कार ! दस्तुरखुद्द अमरापूरकर तसेच होते, परंतु त्यांच्या प्रचंड बिझी शेड्यूलमध्ये घरच्या आघाडीवर निगुतीने सांभाळलं, निभावून नेलं ते सुनंदाताईंनी. बरं हे करता करता आपली नोकरीही सांभाळली. मुलींची शाळा- कॉलेज, त्यांची जडणघडण, इतर साऱ्या सांसारिक बाबी, अमरापूरकरांच्या वाढत्या उत्पन्नाचं व्यवस्थापन, त्यासाठी नेमावयाचा चार्टर्ड अकाउंटंट वगैरे. आणि हे सारं करताना जे जग कालपरवापर्यंत आपल्यापासून दूर होतं तिथे सहज शिरकाव करण्याची, तिथल्या स्टार मंडळींमध्ये बावरण्याची संधी असताना ते स्वतःहून दूर ठेवणं, आपल्या मुलींनाही त्याचं आकर्षण वाटणार नाही याची काळजी घेणं हे अवघड काम या माउलीने सहज केलंय. अशीच कमाल त्यांनी केली ती त्यांच्या आई, सासू- सासरे आणि अमरापूरकरांच्या घरातच असलेल्या आत्याबाई ताई यांच्या व्यक्तिरेखा, त्यांच्याशी असलेलं नातं आणि रोजचा संबंध यांविषयी लिहिताना. त्यातून त्या वेळचा काळ अवकाश आणि बदलता कौटुंबिक सामाजिक - पोतही सहजपणे दिसून येतो. सासरे म्हणजे घरातला अखेरचा शब्द हे मनाशी कायम मानलेलं. स्वीकारलेलं. परंतु एक वेळ अशी येते की, मागल्या पिढीतलं कुणी दुखावलं तरी त्याची क्षिती न बाळगता, नव्या पिढीला आपली वाट काढावी लागते. कारण तिच्या काळ - अवकाशाचा तो रेटा आहे. तो मागल्या पिढीला कळणे शक्य नाही. स्वतःचा विचार करण्याची ही प्रेरणा खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरते. आणखी एक नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, स्वतंत्रपणे स्वतःचं आयुष्य घडवणारी तरुण मुलगी कट्टर पुरुषसत्ताक सासरी जाते, तेव्हा तो विरोधाभास पेलणं किती अवघड असतं याचंही उदाहरण इथे प्रस्तुत होतं. या दरम्यान वेगळा विचार करणारा, सर्वांना समजून घेणारा संवेदनशील नवराही मधूनच नवरेपणा गाजवतो, पण अशा वेळी `आम्ही यांच्यासाठी एवढं करतो ,पण आमच्याबद्दल काही वाटत नाही` असा तक्रारखोर विचार दूर सारत आपलं काम करत राहणं यासाठी साधनाच लागली असेल. `स्वतःची समजूत घातली यापेक्षा `परिस्थिती नीट समजून घेतली` हा मा हा मार्ग पत्करला की सोपं होतं. मन शांत होतं. कडवटपणा तर कणभर राहात नाही. सर्जनशीलता आणि मनाचा प्रसन्नपणा ताजा टवटवीत राहतो. आणि मग आपल्याला जे करावंस वाटते ते करता येतं. त्याचं व्यवस्थापन सुचतं, जस सुनंदाताईंना त्यांच्या अनुवादाच्या कामाच्या नियोजनात सुचलं. घर आणि एकूणच कुटुंबाचे सर्व करताना त्यांना त्यांच्या लेखनासाठी वेळच काढता येईना, तेव्हा पहाटे लवकर उठून त्यांनी निवांत दोन तास काढले आणि आपलं काम केलं. एवढंच नव्हे तर कॉलेज, अभ्यास हे चाळीसेक वर्षे मागे पडल्यानंतर पुन्हा त्या मुंबई विद्यापीठात हजर झाल्या आणि मायथोलॉजीवरच्या एक वर्षाच्या घनघोर अभ्यासक्रमात स्वतःला झोकून दिलं आणि त्यात उत्तम गुण मिळवून पासही झाल्या. वयाच्या या टप्प्यावर घरगुती जबाबदाऱ्यांत, लेकींच्या बाळंतपणाचीही एकीचं तिकडे अमेरिकेत भर पडली. आरंभी मी म्हटले तस `कुठून आणते ही ऊर्जा ही माउली...!` असं करता करता आता कुठे स्वतः साठी वेळ मिळतोय असं वाटेवाटेपर्यंत अमरापूरकरांचं शेवट गाठणारं आजारपण सुरू होतं. आता पुन्हा नव्याने सारं नियोजन, आता दिवसाचा प्रत्येक क्षण त्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत राहण्यासाठी. अमरापूरकरांची कामं कमी होत चालली होती. जिथून आयुष्याची सुरुवात केली, तिथे जाऊन तिथल्या घरात दोघांनी पुढली वर्ष काढायची असं ठरवता ठरवता तोच सारा वेळ मुंबईत हॉस्पिटलमध्ये काढावा लागला. नगरला पोहोचला तो अमरापूरकरांचा निष्प्राण देह... `खुलभर दुधाची कहाणी` ही एका समजदार आणि कर्तृत्ववान स्त्रीची कहाणी आहे. त्या कहाणीतून मला जाणवलेलं तिचं व्यक्तिमत्त्व अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. सुनंदा अमरापूरकर यांना सलाम! ...Read more