* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THEMBHAR PANI ANANT AAKASH
  • Availability : Available
  • ISBN : 9788184981087
  • Edition : 2
  • Publishing Year : JUNE 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 312
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS AN INSPIRING BIOGRAPHICAL BOOK BASED ON THE DEVOTION AND ACHIEVEMENTS OF PADMASHRI BHAWARLALAJI JAIN, PIONEER OF DRIP IRRIGATION, TISSUE CULTURE, PEPINS, AGRO FOOD PROCESSING INDUSTRIES LIKE ONION POWDER PLANT, PAPAYA PEPINS, MANGO, BANANA, POMEGRANATE PULP PLANTS AND WHO HAS LED REMARKABLE CONTRIBUTION TO GREEN REVOLUTION OF INDIA, AND FOR UPGRADATION OF ECONOMIC CONDITION OF INDIAN FARMERS THE GOAL ACHIEVED BY MR. JAIN IS HIGHLY INSPIRING TO YOUTH IN AGRICULTURAL AND INDUSTRIAL FIELDS. MR. JAIN IS BORN IN BACKWARD VILLAGE IN KHANDESH, MAHARASHTRA, IN LOWER MIDDLE CLASS FAMILY. HE HAS COMPLETED LAW AND ALSO HAD PASSED IAS. BUT HE DID NOT JOIN THE HIGH POST GOVT. SERVICE, WHICH IS DREAM FOR OTHERS. BUT MR. JAIN HAD STARTED WORKING IN AGRICULTURAL AND INDUSTRIAL FIELDS. HE IS FOUNDER CHAIRMAN OF JAIN GROUP OF INDUSTRIES. WHICH IS SECOND HIGHEST INDUSTRY IN DRIP IRRIGATION IN THE WORLD. E HAS DEVELOPED “JAIN HILLS” AT JALGAON, WHICH IS CONVERSION OF HUNDREDS OF ACRES OF BARREN HILLS INTO GREENERY AND A WORTH PLACE TO VISIT FOR AGRICULTURAL TOURISM. HE HAS CREATED MANY WATER RESERVOIRS, RAIN HARVESTING, PLANTED LAKHS OF TREES, HE HAS STARTED AGRI TRAINING AND RESEARCH INSTITUTES TO GIVE TIME TO TIME GUIDANCE TO FARMERS. HE HAS CREATED CHARITABLE TRUST FOR EDUCATION, MEDICAL AND HEALTH & FOR SOCIAL UP GRADATION FOR PUBLIC AT LARGE. THIS BOOK IS BASED ON HIM AND HIS SOCIO AGRICULTURAL REVOLUTION CONCEPTS AND INDUSTRIOUS NATURE EVEN AT HIS OLD AGE, WHICH IS A LIGHT HOUSE FOR COMING GENERATIONS OF RURAL INDIA.
‘भवरलाल, ही दगडाधोंड्यांची ओसाडी विकत घेऊन तू काय करणार आहेस? या दगडांच्या वांझ शरीरातून काही उगवेल तरी का?’ त्यांच्या मनाने त्यांना जाब विचारला. पण व्यवहारी मनाच्या आत एक सृजनशील अंतर्मन दडले होते. त्याने सांगितले, ‘तू हे करच. कारण केवळ तूच हे करू शकशील. तूच या निकामी पथ्थरातून एक संजीवक स्वप्नशिल्प निर्माण करू शकशील.’ ही संजीवक कहाणी आहे, ओसाडीतून नंदनवन निर्मिणा-या, पाण्याच्या थेंबाथेंबातून जीवन देऊन शेतक-यांना समृद्ध करणा-या, भूमी व भूमिपुत्रांवर प्रेम करणा-या पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन या महापुरुषाची! त्यांनी केलेल्या संघर्षाची. निर्माण केलेल्या वेगळ्या वाटेची. श्रम, बुद्धी, संस्कार आणि निसर्ग प्रेमाच्या महामंत्राची आणि त्यातून निर्माण झालेल्या उत्तुंग यशाची!

No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #सुरेखा शहा #थेंबभर पाणी अनंत आकाश : डॉ. भवरलालजी जैन यांचे चरित्र #THEMBHAR PANI ANANT AAKASH #SUREKHA SHAH #THEMBHAR PANI ANANT AAKASH
Customer Reviews
  • Rating Starश्री. वसंत लक्ष्मण पवार

    नुकतेच आपण लिहिलेला चरित्रग्रंथ ‘थेंबभर पाणी अनंत आकाश’ हा भाऊंच्या जीवनावरील चरित्रग्रंथ वाचून पूर्ण केला. आपल्या समृद्ध भाषेने, नितांत सुंदर श्रद्धेने सदर चरित्रग्रंथ ओतप्रोत भरलेला असून मला तो खूपच भावला. त्यातले अनेक प्रसंग मी पुन्हा पुन्हा वाचलेव त्यातील भावनांशी समरस झालो. आपली दीर्घ वाङमयीन सेवा वाचून मी खूपच प्रभावित झालो. आपल्या वाङमयाचे वाचन जरूर करायचे असा मनोमन आजतरी निश्चय केला आहे. अतिशय स्वच्छ, सुबोध, मनाची पकड घेणारी आपली भाषा मन मोहवून टाकते. समोर बसून गप्पागोष्टी जितक्या सहजतेने होतात, तितकीच सहजता आपल्या लिखानात असल्यामुळे पुस्तक हातातून खाली ठेववत नाही. ही आपली लिखानाची खासियत आहे, असे मला जाणवले. भाऊंचे चरित्र सांगताना आपण अगदी त्यांच्या अंतरंगाचाही वेध घेतलेला दिसतो. त्यामुळे भाऊंचे व्यक्तिमत्त्व हुबेहुब डोळ्यांसमोर साकार होते. त्याशिवायही त्यांच्या एकूण कुटुंबाचा जीवनप्रवास, त्यांची श्रद्धा, त्यांची श्रद्धास्थानं, त्यांचे कुटुंबातील संस्कार, प्रामाणिकपणा यांचेही वर्णन अंतर्मुख करणारे वाटले. त्यामुळे पुस्तक, चरित्रग्रंथ खूप खूप आवडला. भाऊंच्या मातोश्री स्व. गौराबाई यांचा जीवनप्रवास आदर्श मातेचा आहे. एका कुटुंबपद्धती, घरातील कर्ती स्त्री, स्वत:चे दु:ख उरात ठेवून कर्तव्यनिष्ठेने आपली कर्तव्य पार पाडणारी गृहस्वामिनी, सुरुवातीच्या काळात अपत्य विरहाचे दु:ख सोसणारी माता, आप्तेष्ठांवर, शेजाऱ्यापाजाऱ्यांवर मायेची पाखर करणारी माऊली अशी विविध रूपं मातोश्रींची मूर्ती साकारण्यासाठी, त्या माऊलीने किती अनंत खस्ता खाल्ल्या याचे विवेचन वाचून मन दु:खी, कष्टी होते. बऱ्याच वर्षांच्या विरहानंतर या मातेला पुत्रजन्माचा लाभ झाला. त्यांचे पोटी एका असामान्य वक्तित्वाने जन्म घेतला. त्यांच्यावर आईने कष्ट, जिद्द, प्रामाणिकपणा, वेळेचे महत्त्व, परोपकार, समाजाप्रती उत्तरदायीत्व हे संस्कार केले. अगदी अजाणतेपणी खिशात घातलेला ‘भवरा’ परंतु त्याबद्दल कोवळ्या बालकाला केव्हडी कठोर शिक्षा या माऊलीने केली? परंतु त्या शिक्षेच्या मागील उदात्त भाव नेमका बालकानेही समजून घेतला. असे हे कठोर व्रत मातोश्रीने घेतले होते. त्यांच्या मनात ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा’ अशा आशयाचे विचार होते. परंतु त्यांनी हे देवावर न टाकता त्यासाठी निरक्षिर विवेकाने पावले उचलली. व आज जगासमोर ‘भवरलाल जैन’ हे नाव साकार झाले. त्यासाठी किती अथांग कष्ट, अपरंपार मेहनत, रात्रीचा दिवस केला असेल हे त्यांचे त्यांनाच माहीत. एवढे अलौकिक यश मिळविण्यासाठी त्यामागे नितांत परिश्रमाची आवश्यकता असते. १४-१४ / १६-१६ तास काम, काम आणि काम! तेव्हाच आणि तेव्हाच हे शक्य होते. भाऊंच्या पत्नी कांताबाई यांनीही आपल्या सासूबार्इंच्या पावलावर पाऊल टाकून आदर्श सून, आदर्श माता ही बिरुदं मिळवली. अतिशय अबोल राहून कर्म करीत राहणे हा त्यांचा स्थायी भाव. हा स्थायीभाव पाहून गीतेतील वचनाची आठवण होते. कर्मण्ये वाधिरस्ते, मां फलेशू कदाचन! कर्म करीत राहणे हा माझा धर्म आहे. त्याच्या फळाची अपेक्षा धरली नाही. परंतु असे कर्म करणाऱ्यांनाच प्रभू भरभरून देतात. इतके की त्यांच्या कल्पनेतही नसेल. हा निष्काम कर्मयोगाचा महिमा आहे. भाऊंचा घरातील प्रपंच जसा मोठा, त्यापेक्षाही हजारो पट मोठा प्रपंच भाऊंचा घराबाहेर होता. या मोठ्या प्रपंचासाठी भाऊंना खूप वेळ द्यावा लागला तरी त्या गृहस्वामिनीने चकार शब्द काढला नाही. हे त्यांचे मोठेपण त्यांच्या बद्दलचा आदर द्विगुणीत करते. त्यांच्या संसारवेलीवर चार काश्मिरी गुलाब फुलले. या गुलाबांचा दरवळ आज जगभर पसरला आहे. श्री. अशोक, श्री. अजित, श्री. अतुल व श्री. अनिल ही मुले आणि सौ. ज्योती, सौ. निशा, सौ. शोभना व सौ. डॉ. भावना या भाऊंच्या स्नूषा! या सर्व भाऊंच्या पोटी जन्मलेल्या हिऱ्यांचे कोंदण आहेत. भाऊ व कांताबार्इंनी यांच्यावर सुवर्णसंस्कार केल्यामुळेच एवढे मोठे साम्राज्य ही सर्व तरुण मंडळी प्रामाणिकपणे सांभाळताहेत. भाऊंच्या या पुत्रांच्या संसारवेलीवर उमललेली त्यांची गोंडस, निरागस नातवंड, त्यांच्यासोबतच भाऊ व कांताबार्इंचा फोटो म्हणजे अप्रतिम असा पुष्पगुच्छ! असे हे सर्वांगसुंदर चरित्र वाचून मला खूप खूप आनंद झाला. हे चरित्र वाचून भाऊंची एक सर्वांगसुंदर प्रतिमा माझ्या हृदयपटलावर उमटली आहे व अंतरंगातून त्याचेबद्दल माझ्या हातून एक छोटेसे ‘मानपत्र’ तयार झाले आहे. ...Read more

  • Rating Starआनंद गुप्ते, मुंबई

    अगदी आठवणीने मला पाठवलेली `थेंबभर पाणी अनंत आकाश` या तुमच्या पुस्तकाची प्रत आजच मिळाली. मन:पूर्वक आभार व धन्यवाद. पुस्तकातील सुरवाती-सुरवातीची काही प्रकरणं मी प्रूफांच्या स्वरूपात वाचली होती, तेव्हाच ही भट्टी फर्मास जमणार, अशी कल्पना आलीच होती. आता ांतपणे व्यवस्थित व संपूर्ण वाचेन. कादंबरीचा ढाचा, मांडणी, प्रसंग रंगविण्याची तुमची शैली फारच छान. म्हणजे आमच्या अवधूतच्या भाषेत सांगायचं झाल्यास एकदम `चाबूक!` त्यामुळेच वाचक सतत खिळलेलाच राहतो. पुस्तक खाली ठेवतच नाही. ही कादंबरी यशस्वी होणारच. सिद्धहस्त लेखिका तर तुम्ही आहातच. तुम्हाला तुमच्या पुढच्या लेखनासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 14-10-2010

    `जोहड‘कार सुरेखा शहा यांनी लिहिलेली `थेंबभर पाणी अनंत आकाश’ ही चरित्रात्मक कादंबरी नवयुवकांना उद्योगधंद्याकडे वळवून आपण जीवनात कसे यशस्वी होऊ शकतो, याची प्रेरणा यातून मिळते. उद्योजक भवरलालजी जैन यांच्या जीवनातील चढउतारांचा आढावा येथे घेण्यात आल आहे. जैनउद्योग समूह, जैन गुरुकुल, जैन इरिगेशन जी जगात आज दुसऱ्या क्रमांकावर आहे तिथंपर्यंत पोहचण्यासाठी त्यांच्यात असलेला आत्मविश्वास, चिकाटी, प्रामाणिकपणा, सामर्थ्य, ध्येयाची आस, कठोर परिश्रम, भव्य कल्पकता, स्वप्नवेडी वृत्ती, अपार जिद्द, अचूक निर्णयक्षमता आदी गुणांमुळे त्यांनी आपल्या व्यवसायाचं शिखर गाठलं आहे. `जहाँ न जाऐ बैलगाडी वहाँ पहुँचे मारवाडी’ या उक्तीप्रमाणे भवरलालजींचे पणजोबा राजस्थानमधील आगोळाईहून जळगावच्या वाघोर नदीच्या काठावर असलेल्या वाकोद या खेड्यात स्थानिक झाले. त्यांच्या जन्माची कहाणी लक्षात रहाण्यासारखी आहे. गौराबाई आणि हिरालाल या दांपत्याला होणारी अपत्ये जगत नव्हती. ९ वेळच्या प्रसव वेदनेनंतर झालेलं दहावं अपत्य जगावं म्हणून आजी जमनाबार्इंनी गावकुसाबाहेर राहणाऱ्या सोनाबार्इंच्या ओटीत झालेल्या मुलाला घातलं. मूल माझं आहे असं तिच्याकडून वदवून घेऊन मापटंभर मीठ देऊन, त्या बाळाला विकत घेतलं. तेच बालक म्हणजे भवरलाल जैन. त्यांच्या लहानपणीच्या काही घटना लेखिकेने नोंदविलेल्या आहेत. लहानपणी भोवरा चोरल्यामुळे आई गौराबार्इंनी फुंकणी तुटेपर्यंत भवरला चोपले होते. गावात चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना पुढील शिक्षणासाठी जळगावात ठेवले. मॅट्रिकनंतर मुंबईला कॉमर्स ग्रॅज्युएट होऊन एल.एल.बी. पूर्ण केले. नंतर एम.पी.एस.सी. परीक्षा पास झाले, तरी वकिली अथवा सरकारी उच्चपदस्थ नोकरी न स्वीकारता जिल्हाधिकारी होण्याची संधी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मनाचा कल व्ययसायाकडे बदलवण्यामध्ये आई गौराबाई व भिकमचंद जैन यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. जे भारतीय भूमीपुत्रासाठी वरदान ठरले म्हणावे लागेल. भिकमचंद जैन यांना त्याचं जीवन बदलणारा सल्ला दिला. वकिली काय किंवा कलेक्टर काय दुसऱ्याची गुलामगिरीच, त्यापेक्षा मारवाड्याचा बच्चा आहात-व्यवसाय, धंदा करा. या सल्ल्यानुसार तीन पिढ्यांची असणारी सात हजार रुपयांची पुंजी धंद्यासाठी लावली. रॉकेलची एजन्सी घेतली. प्रत्येकाच्या जीवनात कलाटणी मिळते. प्रत्येकाच्या जीवनात कलाटणी मिळते, ती विवाहामुळे. त्यांनी नाशिकच्या सुंदर मुलीला नाकारुन विजापूरच्या कांताबार्इंशी हुंडा न घेता लग्न केलं. नंतर एकदा मुलांच्या तब्येतीमुळे स्वयंपाकाला उशीर झाला. म्हणून दीर रागावले. तेव्हा कुटुंब विभक्त होऊ शकले असते. तेव्हा भवरलाल आपल्या पत्नीला आदरार्थी संबोधन `तुम्ही मोठे व कर्त्या आहात, त्यांना तुम्ही मनातून क्षमा करा’ अशी समजूत घालून त्यांना शांतवलं. अशा बऱ्याच प्रसंगांचं वर्णन वाचायला मिळतं. त्यांनी नंतर खते, बी-बियाणे, पाईप्स, शेती उत्पादने, ट्रॅक्टर्स, स्पेअरपार्टस अशा एजन्सीज घेतल्या. जैन ब्रदर्स प्रख्यात झाले. औद्योगिक विकास साधत असताना, त्यांना आलेल्या बऱ्याच प्रसंगांची नोंद लेखिकेनी घेतली आहे. जगात प्रत्येक पाचवा माणूस खोटा असतो. असं सांगणाऱ्या जॅकहाईम स्पष्टवक्तेला त्यांनी निर्भयपणे उत्तर देऊन, पपई पासून बनवलेल्या पपेनची निर्यात गुणवत्तेने प्रामाणिकपणे केली. अमेरिकेच्या त्या दौऱ्यात थंडी पासून बचाव व्हावा, म्हणून अजाणतेने `मिंक’ चा कोट विकत घेतला. नि:ष्पाप मुक्या प्राण्याची निर्दय हत्या करुन कोट बनवल्याचं कळलं, तेव्हा त्यांनी अहिंसा परमो धर्म न्यायाने वापरायचं सोडून दिलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाङ्गी शेतकऱ्यांनी वर्षातून दोन-तीन पिके घ्यायला हवीत म्हणून मरुभूमी असलेल्या इस्त्रायलमध्ये जाऊन ठिबक सिंचन पध्दतीचा अभ्यास करुन त्यांनी जलक्रांती घडवून आणली. प्रत्येकांनी श्रमप्रतिष्ठा जपली पाहिजे. याचं उदाहरण लेखिकेने चांगल्या पध्दतीने दिले आहे. सायकलसुध्दा नसताना गिऱ्हाईकाला देण्यासाठी भर उन्हात हातात रॉकेलचे कॅन घेऊन ते चालत जात असतं. जैन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, साहित्यिक, धार्मिक, प्रयोगशील, प्रतिभावंतांना त्यांनी मदत केली. आकाशाएवढे उत्तुंग यश मिळवून त्यांचे पाय मात्र शेतात भिजलेल्या मातीवरच राहिले. प्रा. कमलाताई ठकार यांच्या विनंतीने त्यांनी औसा येथील अंध, अपंग आधार केंद्रात वनौषधी उद्यानात ठिबक सिंचन संच घालून दिला. कविवर्य ना.धों. महानोर हे त्यांचे बालपणीचे मित्र. त्यांच्या घरोबाच्या संबंधाच्या आठवणी लेखिकेने विस्ताराने कथन केल्या आहेत. भवरलालजींनी ३ `नि’ चा मंत्र जपला- निर्व्यसनीपणा, नियमितपणा आणि त्यांनी जळगावातील हजार शालेय विद्यार्थ्यांची राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची भेट घडवून आणली. सुरुवातीच्या दिवसात एस्सो रॉकेल डेपोचे व्यवस्थापक नूर मोहम्मद शेख यांचे सहकार्य लाभले. त्यांची स्मृती जपण्यासाठी त्यांनी जळगावात त्यांच्या नावाने उर्दू ज्युनिअर कॉलेज काढले. आत्मकथेतील काही भाग जैन चोरडिया परिवारातील व्यक्तिरेखे भोवती फिरत राहतो, घुटमळत रहातो. काही गोष्टीची दुरुक्ती, पुनरावृत्ती झालेली आहे. चहापानाला सुध्दा विषपान समजणाऱ्या भवरलालजी जैन यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. कॉफर्ड ग्रीड, पद्मश्री पुरस्कार आदिंनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. लाख तर होतच रहातील, पण लाखांचा पोशिंदा होण्याची ताकद, हिंमत ठेवावी असा संदेश देण्यात लेखिका यशस्वी झालेल्या आहेत. -नागेश खमितकर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more