* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THIRD PERSON
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668216
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 216
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE STORY OF YASHODHARA DOES NOT FOLLOW THE USUAL CHRONOLOGICAL ORDER. SHE INCARNATES IN THE SELF-ABSORBED AND REJUVENATING STYLE OF ATMA VISHKARA. THIS INVENTION OF HERS MOVES FORWARD FROM THE SMALL AND NATURAL EVENTS THAT HAPPEN AT THAT TIME. TWO CHARACTERS IN A STORY EASILY MEET OR ENCOUNTER EACH OTHER AND A DIALOGUE BEGINS BETWEEN THEM. THE AUTHOR DOES NOT REFER BACK AND FORTH TO THOSE CHARACTERS.
यशोधराची कथा रूढ असलेल्या कालक्रमनिष्ठ पद्धतीने अवतरत नाही. ती अवतरते आत्माविष्काराच्या आत्ममग्न टवटवीत शैलीत. तिचा हा आविष्कार त्या त्या वेळी घडणाऱ्या आणि स्वाभाविक वाटणाऱ्या लहानमोठ्या घटना-प्रसंगांतून पुढे सरकत असतो. कथेतील दोन पात्रे एकमेकांना सहज भेटतात किंवा सामोरी येतात आणि त्यांच्यात संवाद सुरू होतो. त्या पात्रांचा मागचापुढचा संदर्भ लेखिका तिथल्या तिथे देत नाही. त्यामुळे पात्रांच्या नात्याला वाचकांच्या दृष्टीने धूसरता प्राप्त होते. त्यांची कथा वाचकाला आरंभापासूनच खिळवून ठेवते. त्यातूनच वाचकाची जिज्ञासा वाढत जाते आणि ती कथा पूर्ण वाचायची ओढच त्याला लागते.
* भैरू रतन दमाणी पुरस्कार २०१७ . * साहित्य समन्वय संस्था पुरस्कार, धारवाड २००९.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THIRDPERSON #THIRDPERSON #थर्डपर्सन #SHORTSTORIES #MARATHI #YASHODHARAKATKAR "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA (UTSAV) 08-03-2009

    नाट्यपूर्ण कथासंग्रह... परत तो, आकाशाचे गाणे. अ‍ॅन एन्काऊंटर, माघातरण शेवटचा दिवस. थिंग्ज हॅपन, अंत. डॉग्ज. मियाँव आणि थर्ड पर्सन अशा दहा कथांचा यशोधरा काटकर लिखित कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेला आहे. यशोधरा काटकर हे नाव आज बुजुर्गकथा लेखिकेच्या नामावलीत केव्हाच जमा झालेले आहे. १९९९ पासून २००४ पर्यंतच्या कालावधीत हेमांगी: साप्ताहिक वृत्तमानस. बेळगाव - तरुण भारत, अनुष्टुभ, तन्मय, कदंब, कथाश्री. चतुरंग अन्वय अशा विविध नियतकालिकांच्या खास अंकांमधून पूर्वप्रसिद्धी लाभलेल्या या कथासंग्रहातील दहाही कथा शहरातील भाऊगर्दीतील स्त्रीमनाचे, तिच्या एकाकीपणाचे भावविश्व बोलके करणाऱ्या आहेत. पाश्चात्त्य लेखकांच्या सहजतेने अंतर्मनात डोकावत वाचकांना त्या भावविश्वाशी साक्षीभावाने विचारात पाडणाऱ्या आहेत. जीवनातील स्वानुभवाची आत्मीयता बोलकी व्हावी अशा प्रत्ययकारितेने वाचकाच्या मनाला भिडणाऱ्या आहेत. दैनंदिन जीवनातील ताणतणाव, अपेक्षाभंग, एकटेपण आणि संवेदन यातले हळवेपण कुठल्याही अभिनिवेशाने दाटलेले नसून ते प्रामाणिक भावोत्कटतेतून आकारलेल्या सहानुभावाने भिडणारे झाले आहे. शब्दप्रभुत्व, कलात्मक मांडणी, वातावरण आणि अवतीभवतीचे व्यावहारिकपण याचे सुजाण भान लक्षात आणून देणाऱ्या या कथांवरील प्रत्येक नाट्यपूर्ण प्रसंगाच्या जोडीने जीवनानुभवाचे विविधांगीपणही या कथांतून वाचकाला गुंतवून टाकणारे झाले आहे. परतमधील सुधा, तिला आठवणारे तिच्या आजीचे घर, आजी, रघुमामा सारे नातेसंबंध आणि बालपण व आजी अशी गुंफण झालेल्या आठवणी अगदी ओळखून मियाँव करणाऱ्या मांजरीपर्यंतच्या या भावविश्वाशी चित्रमय रंगविणे सहज त्या माळरानावर घेऊन जाते. तोमधील भावविश्व एकदम आगळेवेगळे कलाकाराच्या चित्रमय धडपडीशी एकजीव करणारे नाव. प्रसिद्धी जगण्याची धडपड आणि कीडा-मुंगीसारख्या जगण्यात दमछाक होत मरुन जाणारे क्षुद्रपण शहरातील नाव प्रसिद्धीच्या धडपडताना बसणाऱ्या परिस्थितीच्या जीवनसंघर्षाची ही लक्ष वेधणारी. विचारात पाडणारी कथा. आकाशाचे गाणे अगदी वेगळ्या विश्वात नेणारे मांजराच्या कावळ्याच्या कोकिळेच्या म्हाताऱ्या झुळकेच्या अगदी गाण्याच्या आकाशात झेपावणारे. अ‍ॅन एन्काऊंटर आहे. झाडाखली कुडकुडून गोठलेल्या मिनू आणि पार्टी धमालीत रमलेल्या ललितच्या निमित्ताने अंतरंगातील आगडोंब. विषमतेची घृणा आणि थंड खुनी अचकट विचकटाशी केलेला सामना आषाढस्य प्रथम दिवसेच्या विरोधाभासाने भरलेला माघातला शेवटचा दिवस उदासवाणा, निर्जीव. चैतन्यशून्य वाजणारा कर्कश फोन. हुंदके, आक्रोश, धावणारी रिक्षा असे सारंच हरवत चालल्याच्या मन:स्थितीत अचानक फुलून आलेल्या लालभडक फुलोऱ्याचे दर्शन नवीन सृजन, नवीन निर्मिती आणि त्यातून आकारणारा आनंदमयी नवा जन्म साहित्य समंलेनाध्यक्ष आनंद यादव याची प्रस्तावना, चंद्रमोहन कुलकर्णी यांनी सजवलेले मुखपृष्ठ, वाजवी किंमत आणि निर्दोष छपाई असलेले थर्ड पर्सन, आल्बेरकाम्पू, रिचर्ड बाख, ओ हेन्री, मोपासाँ, आणि पी.जी. वुडहाऊस अशा कथालेखक पाश्चात्य दिग्गजांच्या वरदहस्तालाच शोभणारे जाणवल्यावाचून राहत नाही. - ललिता बापट ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more