* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789357208154
  • Edition : 2
  • Publishing Year : 1978
  • Weight : 130.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`THE CHARACTERS IN THE STORIES `CHINDHI`, `PUTALI`, `DAU`, `VASANA`, `MADHOSINHA`, `EK HASYA ANI EK KHOON` IN THE COLLECTION OF STORIES -`THRILLS` WRITTEN BY MAHADEV MORE BEHAVE IN AN INHUMAN WAY AND INSTIGATE PEOPLE OF THE SOCIETY AS WELL. SOME OF THEM ENDURE SUFFERING AND INJUSTICE, WHILE OTHERS RESORT TO VIOLENCE TO HANDLE THE SITUATION. `PUTALI`, A POOR DANCER, LEADS A LIFE OF STRUGGLE BY CARRYING A GUN, KILLING AND ROBBING. THE LAWYER IN `RAHASYA` IS RIDDLED BY HIS CLIENT-MRS. NEELA DESHPANDE. INSTEAD OF SOLVING HER MYSTERIOUS CONFUSION, MR.LAWYER GETS ENTANGLED IN IT HIMSELF. IN THE STORY `SOOD`, LAKHANSINGH, RAGHUVEER SINGH AND SUBASINGH, DESTROY THEIR LIVES DUE TO MUTUAL DIFFERENCES AND REVENGE. JASPAL SINGH FROM A PUNJABI FAMILY DIES IN ‘NIYATI ANI NYAY’.SO WHO IS THE MURDERER- JASPAL`S BROTHER-IN-LAW-MAHENDRA SINGH OR- PALWINDER KAUR? THIS MYSTERY CONTINUES TO HAUNT. “ AANIBANITIL GOSHTA” IS THE STORY OF FRAUDSTER PREMSHANKAR. HE PRETENDS TO BE A FAKE GOVERNMENT OFFICIAL, SPEAKS ENGLISH AND EVERYONE IS STUNNED TO SEE THE SCAM HE CREATES. THUS, MAHADEV MORE`S STORIES PORTRAY THRILL ANDMYSTERY IN REAL LIFE WITH PASSION.
महादेव मोरे लिखित ‘थ्रिल्स’ या कथासंग्रहातील ‘चिंधी’, ‘पुतळी’,‘दाऊ’, ‘वासना’,‘माधोसिंह’,‘एक हास्य आणि एक खून’ या कथांतील पात्रे मानवतेला हरताळ फासतात आणि मग समाजातील माणसेच पेटून उठतात. त्यांतील काही दु:ख-अन्याय सहन करतात, तर काही स्वत: हत्यारं उचलतात.‘पुतळी’ ही गरीब नर्तकी हाती बंदूक घेऊन खून-लूटमार करत संघर्षमय आयुष्य जगते. ‘रहस्य मधील वकिलाला त्याची अशिल-मिसेस नीला देशपांडे अजब कोड्यातच टाकते. तिचा गुंता सोडवण्याऐवजी वकीलमहाशय स्वत:च त्यात गुरफटत जाऊन फसतात. ‘सूड’मधील लाखनसिंह, रघुवीरसिंह, सुबासिंह यांच्यातल्या आपापसांतील वितुष्टांमुळे-सूड भावनेने त्यांची आयुष्ये उद्ध्वस्त होतात. ‘नियती आणि न्याय’ मधून पंजाबी कुटुंबातील जसपालसिंहचा मृत्यू होतो. जसपालच्या पत्नीचा चुलतभाऊ-महेंद्रसिंग,हा खून करतो का,की- पलविंदरकौर? हे गूढ सतावत राहते. ‘आणीबाणीतील गोष्ट’ ही तोतया प्रेमशंकरची. इंग्रजी भाषा बोलून, खोटा सरकारी अधिकारी बनून, तो जो धुमाकूळ घालतो, ते पाहून सर्वच थक्क होतात. अशा प्रकारे महादेव मोरे यांच्या कथेतून थ्रील, थरार व रहस्याचे वास्तव दर्शन उत्कटतेने होते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#थ्रिल्स #महादेव मोरे #ग्रामीण # कथासंग्रह #मराठीसाहित्य #मेहतापब्लिशिंगहाऊस #मराठीपुस्तके #THRILLS #MAHADEV MORE #STORIES #MARATHI LITERATURE #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHI BOOKS
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more