* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789392482205
  • Edition : 1
  • Publishing Year : MARCH 2022
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 152
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :SWATI CHANDORKAR COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AS CUSTOMARY, SHIVA LEAVES FOR SUGARCANE CUTTING JOB, WHICH IS SEASONAL. NEVERTHELESS, HE DOES NOT RETURN HOME AS ALWAYS. STUNG BY A POISONOUS SNAKE, SHIVA DIES IN THE FIELD LEAVING HIS PARENTS DAGADU AND KALSUBAI, WIFE BHIKU AND THREE CHILDREN, THE DAUGHTER IS AN INFANT. HIS PARENTS START CURSING THE GIRL SAYING THAT IT WAS HER EVIL-DOING THAT HE DIED. COMPELLED TO RUN THE FAMILY, BHIKU STEPS IN HIS SHOES. SHE CARRIES HER INFANT DAUGHTER WITH HER TO KHURDAWADI WHERE SHE MEETS BHUMI WHO KNOWS SHIVA AND DAGADU. BHUMI NOTICES DAGADU`S HATRED TOWARD THE INFANT AND DECIDES TO LOOK AFTER HER. SHE NAMES THE CHILD GAURI. A LEARNED WOMAN, BHUMI RUNS A SCHOOL FOR THE CHILDREN OF SUGAR-CANE CUTTERS. THOSE LABORERS RESPECT HER. WHEN THE SEASON GETS OVER, DAGADU ANNOUNCES THAT HE IS NOT GOING TO TAKE GAURI HOME. FINALLY, IT IS DECIDED THAT BHUMI WILL TAKE CARE OF HER. AFTER RETURNING TO HER NATIVE PLACE, IT BECOMES IMPOSSIBLE FOR BHIKU TO SURVIVE WITHOUT HER DAUGHTER. SHE BECOMES AGGRESSIVE AND WARNS HER IN-LAWS THAT SHE WOULD BRING HER DAUGHTER BACK. BY NOW, BHUMI HAS DEVELOPED MOTHERLY LOVE FOR GAURI. SHE IS WORRIED THAT THE NEXT SEASON, BHIKU WILL COME AND DEMAND HER DAUGHTER BACK. WILL SHE BE ABLE TO RETURN THE CHILD TO HER MOTHER? `TOD` IS AN EMOTIONAL STORY REVEALED BASED ON THE LIFE OF SUGAR CANE CUTTERS.
ऊसतोडीच्या हंगामाला जायच्या तयारीत असतानाच शिवाचा सर्पदंशाने मृत्यू होतो. त्याची बायको भिकू सासऱ्याबरोबर (दगडू) आपली तान्ही मुलगी बारकी हिच्यासह ऊसतोड हंगामाला खुर्डावाडीला जाते. बारकीच्या पायगुणामुळे आपला मुलगा गेला असं वाटून तिचे सासू-सासरे बारकीचा रागराग करत असतात. खुर्डावाडीला गेल्यावरही दगडू बारकीचा दुस्वास करतच राहतो. तो बारकीवर राग काढण्यासाठी टोकाचं पाऊल उचलेल या भीतीने भिकू भूमीताईंकडे काही वेळेला बारकीला सांभाळायला देते. ऊसतोड मजुरांना भाड्याने जागा देणाऱ्या, एकाकी असलेल्या भूमीताईंना बारकी ऊर्फ गौरीचा लळा लागतो. हंगाम संपल्यानंतर दगडूच्या गौरीला बरोबर न नेण्याच्या दुराग्रहामुळे भिकू नाईलाजाने गौरीला भूमीताईंकडेच ठेवते. भिकूने मागितल्यावर भूमीताईंनी गौरीला परत द्यायचं, असा लेखी करार झालेला असतो; पण प्रत्यक्षात जेव्हा गौरीला परत द्यायची वेळ येते तेव्हा काय होतं? ऊसतोड कामगारांच्या जीवनाच्या पार्श्वभूमीवर रंगलेलं एक उत्कट भावनाट्य.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#कादंबरी #तोड #स्वातीचांदोरकर #युथनेशिया #पवित्रम #एकपायरीवर #फॉरवर्डअँडडिलिट #अनाहत #उत्खनन #हिजडे #शेष #गोलगोलराणी #सेलिब्रेशन #काळाकभिन्न #आणिविक्रमादित्यहरला #वपु #भिकू #भूमी #खर्डावाडी #खरातसाहेब #ऊस #बॉयलर #मत्स्यादेवी #दगडू #शिवा #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #NOVEL #TOD #SWATICHANDORKAR #EUTHANASIA #PAVITRAM # EKPAYRIVAR #FORWARDANDDELETE #ANAHAT #UTKHANAN #HISDAY #SHESH #GOLGOLRANI #CELEBRATION #KALAKBHINNA #AANIVIKRAMADITYAHARLA #VAPU #BHIKU #BHUMI #KHARDAWADI #KHARATSAHEB #BOILER #MATSYADEVI #DAGADU #SHIVA #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #MEHTAPUBLISHINGHOUSE
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more