* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HOT WATER THERAPY
  • Availability : Available
  • Translators : SUBHASH JOSHI
  • ISBN : 9788184980967
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
DO YOU SUFFER FROM: *TENSION HEADACHES FROM STRESS? *CHRONIC BACKACHE FROM HOURS OF DESK-WORK? *SPRAINS AND STRAINS FROM WEEKEND SPORTS? *INJURIES FROM ACCIDENTS? JOINTS AND MUSCLES DUE TO OVER-EXERTION, AGING OR INACTIVITY? *PAINFUL. HOT WATER THERAPY CAN HELP. THIS BOOK WILL INTRODUCE YOU TO SIMPLE, EFFECTIVE TECHNIQUES YOU CAN USE WHILE RELAXING IN YOUR SHOWER, BATH, OR HOT TUB TO RELIEVE PAIN AND STRENGTHEN ACHING MUSCLES. AND THEY TAKE ONLY A FEW MINUTES TO DO! YOU WILL LEARN THAT YOU CAN SAVE YOUR "BAD BACK` BY USING A COMBINATION OF GENTLE MASSAGE, EXERCISE AND STRETCHING. WHEN YOU BLEND THESE ROUTINES WITH THE SOOTHING, HEALING QUALITIES OF HOT WATER, YOU`LL ENJOY THE AGE-OLD BENEFITS OF SPA TREATMENT - RIGHT IN YOUR OWN BATHROOM!
तुम्हाला खालील गोष्टींचा त्रास आहे का? तणावामुळे डोकेदुखी ? सतत बैठ्या कामामुळे पाठदुखी सप्ताहाच्या अखेर सुट्टीत खेळल्यामुळे उसण भरणे, लचकणे? अपघातामुळे इजा? अतिश्रमानी, वयोमानापरत्वे अथवा हालचालीच्या अभावामुळे, सांधे व स्नायु दुखणे? गरम पाण्याच्या उपचारपद्धाीची मदत होऊ शकते. दुखऱ्या स्नायुंना आराम देऊन सशक्त करण्याच्या, सोप्या पण परिणामकारक पद्धातींची या पुस्तकात ओळख करून देण्यात आलेली आहे. हे सर्व, गरम पाण्यानी अंघोळ करतांना, टबात डुंबत असतांना करता येत आणि करायला फक्तकाही मिनिटच लागतात ! हलकस मालीश, व्यायाम आणि ताण देण्याचे प्रकार करून, तुम्ही `` वाईट पाठीला सरळ करु शकता. गरम पाण्याच्या औषधी व दु:खशामक गुणांची, या व्यायामाशी सांगड घालून, तुम्ही घरबसल्याप्रसिद्ध स्पा उपचारपद्धाीचा आनंद घेऊ शकता, तेही स्वत:च्या बाथरुममध्ये ! डॉ. पॅट्रिक होरे हे स्नायू आण् अस्थींचे उपचारतज्ञ असून, ते त्यांच्या उपचारपद्धतीत, सुलभ जीवन शैली आणि स्व-संगोपन यावर भर देतात. ते बर्वले, कॅलिफोर्नियामधे कार्यरत आहेत. अमेरिकेतल्या नॉर्दन व्हरमॉन्टच्या कडाक्याच्या थंडीत आपल्या पाठीसाठी गरम पाण्याचे उपचार घेऊन, ते तंदुरुस्त राहतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"# मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50 #USHNAJALPOCHAR #HOTWATERTHERAPY #उष्णजलोपचार #HEALTHCARE&PSYCHOLOGY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUBHASHJOSHI #सुभाषजोशी #DAVIDHARPDR.PATRICKHORAY "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 18-06-2010

    गरम पाण्याचा शेक घ्या!... सध्याच्या गतिमान आयुष्यात थोडी विश्रांती घेऊन म्हटले तरी आसपासचे जग आपल्याला ती घेऊ देत नाही. त्यातून वेगवेगळे तणाव निर्माण होत आहेत. रोजच्या ताणामुळे शरीरात व मनात तणाव निर्माण होतात. त्यातून डोकेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी कध मागे लागते, हे नेमके कळत नाही, तर कधी कमरेत लचक भरलीय का, ही शंका येते. फ्रोजन शोल्डरचा कुणाला त्रास होऊ लागतो, तर कुणाचे गुडघे कुरकूर करू लागतात. एखाद्या वेदनाशामक मलमाने मालिश करून आपण तातडीचा आराम मिळवतोही; पण या दुखण्यातून पूर्ण सुटका होत नाही. आपल्याला माहीत असलेले उपचार घ्यावेत, तर ते महागडे तरी असतात किंवा ते करून घेण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. या दोन्ही गोष्टी आपल्याला शक्य नसतात आता एक आणखी पर्याय आपल्यापुढे आला आहे, तो म्हणजे ‘उष्ण जलोपचार’! गरम पाण्यात पंचा बुडवून दुखऱ्या ठिकाणी शेक घ्यायची आपली पद्धत होतीच की! पण आजीच्या पद्धतीना अशास्त्रीय ठरवून आपण त्या बाद केल्या आहेत. आता त्या पद्धतीची परदेशी आवृत्ती आली आहे : ‘हॉट वॉटर थेरपी’, डॉ. पॅट्रिक होरे व डेव्हिड हार्प यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा सुरेख अनुवाद सुभाष जोशी यांनी केला आहे. अगदी अंघोळ करता करता दहा मिनिटे राखून ठेवायची आणि उपचार घ्यायचे, हे सोपे सूत्र यामागे आहे. एकीकडे गरम पाण्याचा दुखऱ्या भागाला होणारा स्पर्श आणि त्या भागाला दिलेला थोडासा ताण यामुळे हे उपचार होतात. ही पद्धत सोपी आहे. ती खूप परिणामकारक असल्याचा डॉ. होरे यांचा दावा आहे. या उपचारपद्धतीची खूप चांगल्या रीतीने या पुस्तकात ओळख करून देण्यात आली आहे. ही उपचार पद्धती नेमकी काय आहे? तिचे वेगळेपण कशात आहे? गरम पाण्याने नेमके काय साधते? याविषयी सुरवातीला निवेदन आहे. भारतीयसंस्कृतीने, आयुर्वेदाने पाण्याला अंतर्गत व बाह्यउपचारात महत्त्व दिलेले आहेच. गरम पाण्याची कुंड ही तीर्थक्षेत्रे बनतात, हा आपला अनुभव आहे. आयुर्वेदातील स्वेदनाची आपल्याला माहिती आहे. याचाच वेगळा उपयोग डॉ. होरे यांनी करून घेतलेला आहे. आपल्या प्रभावी कथनशैलीत सोपेपणाने ते शरीराची माहिती करून देतात आणि आपल्याला विश्वासात घेतात. नेमके कुठे दुखते हे कसे ओळखायचे? तिथे आपल्या आपण मसाज कसा करायचा? हे समजावून सांगतात. मग गरम पाण्यात व्यायाम कसा करायचा,शरीराला ताण कसा द्यायचा, हे सांगतात. आपल्या नेहमीच्या शरीरिक क्रियाच व्यायाम म्हणून किंवा ताण देण्यासाठी उपयोगात आणलेल्या असल्याने आपण काहीतरी वेगळे करायचे आहे, ही भवनाच दूर होते व रुग्णांना आत्मविश्वास मिळतो. त्यांनी दैनंदिन सरावाची आखणीही करून दिली आहे. गरम पाण्याच्या उपचारपद्धतीत जसे आयुर्वेदाचे वेगळे रूप तुम्हाला दिसेल, तसे त्यानंतर शरीराला देण्याच्या पद्धतीतही जाणवेल. प्राणायाम, ध्यानधारणा हे उपाय आयुर्वेदाने सांगितले आहेत. शरीर व मन स्वस्थ ठेवण्यासाठी या गोष्टी उपयुक्त ठरतात. या पद्धतीत थोडा बदल करून अमेरिकन रीतीने मोजणी करीत ध्यानधारणा करण्यास डॉ. होरे सुचवतात. ऐकूण भारतीयांना सहज स्वीकारता येईल, आपल्या जीवनशैलीत असलेलीच अशी ही उपचारपद्धती आहे. ती मुळात अमेरिकनांना सांगितली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अमेरिकन जीवनशैलीनुसार तपशील येतो. भाषांतराच्या वेळी हा तपशील सुधारून घेता आला असता खरा; पण मग कदाचित आपणच म्हणालो असतो, हे तर आपल्याला आजीने आधीच सांगितललेले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.