* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ZATPAT VYAKTIMATVAVIKAS : SWAPARIVARTANACHE NAVIN TANTRA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667936
  • Edition : 7
  • Publishing Year : MAY 2007
  • Weight : 110.00 gms
  • Pages : 68
  • Language : MARATHI
  • Category : HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :SANJEEV PARALIKAR COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EVERYONE LIKES TO BE A WINNER IN THIS COMPETITIVE WORLD. PEOPLE WANT NAME, FAME, MONEY OR SUCCESS QUICKLY. EVERYONE IS IN A HURRY. EVERYONE WANTS IT INSTANTLY. FOR ACHIEVING SUCCESS, ONE IS REQUIRED TO ACQUIRE NEW SKILLS & HABITS. MANY PEOPLE DO NOT KNOW ABOUT NEW SKILLS AND HABITS. THEY SHOULD KNOW THAT. NOONE HAS PATIENCE TO LEARN THESE NEW SKILLS. EACH ONE WANTS IT INSTANTLY. THIS BOOK WILL HELP YOU DISCOVER NEW SKILLS & HABITS WHICH ARE REQUIRED FOR SUCCESS INSTANTLY & LEARN THEM INSTANTLY.
आजचा जमाना हा ‘इन्स्टन्ट’चा जमाना आहे. येथे सर्व काही, अगदी यशसुद्धा इन्स्टन्ट हवे आहे. म्हणजेच झटपट हवे आहे; पण ते तसे मिळत नाही. कारण त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. आणि इथे कोणालाही थांबायला वेळ नाही. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्वत:मध्ये कोणते बदल करावेत व कसे करावेत हेही कित्येकांना माहीत नाही. हे बदलही आपल्याला झटपट हवे असतात. ह्या पुस्तकातील सूचना अमलात आणल्यात, तर कमीतकमी दिवसात तुम्ही स्वत:मध्ये अनेक महत्त्वाचे बदल घडवून विजयश्री स्वत:कडे खेचून आणू शकता.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#पाल्यव्यक्तिमत्त्वाचाकानमंत्र #संजीवपरळीकर #व्यक्तिमत्त्वविकसन #PALYAVYAKTIMATVACHAKANMANTRA #SANJEEVPARLIKAR #PUDHAKARGHYA #ZATPATVYAKTIMTVAVIKASAN #CHARSHABDADYAVEGHYAVE #CHARJABARDASTFANDE #YALAJIVAN AISENAAV #KELYANEHOTAHERE! #VIKRIKAUSHALYASHIKA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 12-08-2007

    व्यक्तिमत्व परिवर्तनासाठी तीन दिवस... तीन दिवसात आपण आपल्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो असे कोणी म्हटले तर आपला विश्वास बसणार नाही. परंतु तसे करणे शक्य आहे अशी खात्री ‘झटपट व्यक्तिमत्त्व विकास’ हे छोटेखानी पुस्तक वाचून होऊ शकेल. स्वपिवर्तनाचे त्यात एक नवीन तंत्र (न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग) विशद करून सांगण्यात आले आहे. आपल्या मराठी माणसाचा ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा बाणा असल्याचा अभिनिवेश जगजाहीर आहे. त्यामुळे स्वत:ला बदलायला आपण तयार नसतो. समर्थ रामदासांनी सांगून ठेवले आहे– असेल हरी तर देईल खाटल्यावरी. कुणीतरी आयते सगळे आणून देईल. आता या आपल्या लाडक्या गृहीतकृत्यांना घट्ट कवटाळून बसायचे, की ‘महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती’ हे वास्तव लक्षात घेऊन परिस्थितीशी सामना देण्याएवढी लवचिकता दाखवायची, परिवर्तनाची तयारी ठेवायची असा विचार करायला हवा की नाही? तुम्ही लवचिक आहात, बदलायला तयार आहात, नव्या स्पर्धेच्या वातावरणात प्रगतीच्या ज्या संधी उपलब्ध आहेत त्यांचा उपयोग करून दैदीप्यमान यश मिळवण्यास उत्सुक आहात असे तुम्हाला वाटत असेल तर झटपट व्यक्तिमत्त्व विकास हे पुस्तक तुम्हाला मार्गदर्शक ठरू शकेल. या नव्या युगातल्या स्पर्धात्मक वातावरणात आपल्या अंगी असणाऱ्या बौद्धिक आणि मानसिक क्षमतांचा जास्तीत जास्त वापर करून ऐहिक विकासाचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. संन्यस्त जीवन जगण्याची आकांक्षा बाळगून आपल्या वृत्तीप्रवृत्तींना दडपून ठेवण्यात अर्थ नाही. इंग्लंड-अमेरिकेत न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग (एन. एल. पी.) म्हणून परिवर्तनाची एक प्रणाली विकसित केली गेली आहे. त्यामुळे न्यूनगंडाने पछाडलेल्या, नैराश्याने हैराण झालेल्या, काळलीने पोखरलेल्या व्यक्तीमध्ये उत्साह चैतन्याचा तसेच आत्मविश्वास, ध्येयाचा ध्यास, इच्छाशक्ती यांचा झरा खळाळू लागतो असा अनेकांचा अनुभव आहे. आपला मेंदू हा एक महा संगणक आहे. आपल्या इंच्छेप्रमाणे आपल्या भावना, विचार आणि कृती यात बदल होत राहतात. आपल्या सवयीही बदलत असतात. आपण स्वत: सकारात्मक दृष्टिकोन विकसित करून नेहमी उच्च प्रतीची कामगिरी करू शकतो. आपल्या मज्जासंस्थेद्वारे मेंदूकडे ज्ञानेंद्रियांद्वारे गोळा होणारी सर्व माहिती पोहोचविण्याची प्रक्रिया अहोरात्र चालू असते. या प्रक्रियेची विशिष्ट भाषा असते. या भाषेद्वारे मेंदूला सूचना मिळतात. त्या सूचनांच्या संदर्भात मेंदू निर्णय घेतो. ते निर्णय आपण कृतीत उतरवतो. या प्रक्रियेत सूचनांची भाषा हा महत्त्वाचा घटक असतो. भाषा ही वेगवेगळी भाव व्यक्त करते. भाषा वाकवता येते. एकच विचार वेगवेगळ्या प्रकारे प्रकट करता येतात. भाषा वाकली की सूचनांचे अर्थ बदलतात. सूचना बदलल्या म्हणजे मेंदूचे निर्णयही बदलतात. आपल्या कृतीतही त्यामुळे बदल होतो. आपण सूचनांसाठी या शब्दयोजना करतो त्यामुळे मेंदू गोंधळात पडतो. मेंदूला नकारात्मक भाषा कळत नाही. त्यासाठी सकारात्मक कृती घडवून आणतील. चित्त स्थिर ठेव, हसतमुख रहा, रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूंना लक्ष ठेव. फुप्फुसांची कार्यक्षमता टिकवून ठेव... यासारख्या सकारात्मक भाषेचे-कल्पनाचित्र रंगवत राहिले तर त्याच्याशी मिळवून घेणे मेंदूला सोपे जाते. तशी सूचना मेंदू देतो. त्याप्रमाणे कृतीला आपण प्रवृत्त होतो. कल्पनाचित्राशी जुळवून घेण्याचा मानसिक सराव केला तर होणारी कृतीही सफाईदार होते. उपजत कौशल्य असल्यासारखी ती वृत्ती आपल्यालाही उभारी देते. हे सूत्र लक्षात ठेवले तर तुमच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून येईल आणि हे शास्त्र वापरून तीन दिवसात आपणास आत्मपरिवर्तन साध्य होऊ शकेल. पहिला दिवस : न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंगचा आरंभ करताना आपल्याजवळ काय आहे, आपल्याजवळ काय नाही, आपल्याला काय हवे आहे, आपल्याला काय नको आहे याची नोंद करायची आहे. डावीकडे आवडत्या गोष्टी लिहा. उजवीकडे नावडत्या, नको असलेल्या गोष्टी लिहा. त्याच्यापुढे आपल्याला आवडणाऱ्या ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत, त्यांची नोंद करा. ज्या नाहीत त्यांची नोंद करा. नावडणाऱ्या गोष्टींबाबतही अशीच नोंद करा. दुसरा दिवस : आपल्याकडील टाकाऊ गोष्टींचे रुपांतर आपल्याला हव्या असलेल्या चांगल्या गोष्टींमध्ये कसे करायचे हे दुसऱ्या दिवशीच्या अभ्यासाचे मध्यवर्ती सूत्र आहे. उदा. धूम्रपान आणि मदिरापान या गोष्टी ठाऊक वाटत असतील तर सुदृढ आणि निर्व्यसनी व्यक्तिमत्त्व हे रुपांतर हवेसे वाटेल. त्यासाठी धूम्रपान व मद्यपान यापासून दूर रहायला हवे. (डिस-असोसिएट). त्यामुळे जी उत्तेजना मिळत असे किंवा रंजन होत असे, ते अन्य मार्गाने आवडत्या गोष्टींद्वारे मिळवायचे आहे. (असोसिएट व्हा.) तिसरा दिवस : स्वत:भोवती ऊर्जेचे वर्तुळ तयार करण्यासाठी प्रयोग करणे. पुस्तकात या प्रयोगाचे सविस्तर वर्णन केलेले आहे. या प्रयोगात पाच टप्पे आहेत. स्वत:ला नवीन सवय लावण्यासाठी प्रचंड मानसिक बळ लागते. त्यासाठी ऊर्जा खर्च करावी लागते. सवय अंगवळणी पडली की ऊर्जा जास्त लागत नाही. चांगल्या सवयी लावण्यासाठी निर्णय घ्यावा लागतो. चांगल्या सवयी या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीसारख्या असतात. बदल आवश्यक असतो तेव्हा झटपट बदलण्याची वृत्ती बाणवा. बदल नको असेल तर बदलण्याएवढा ठामपणाही ठेवा. आपल्या नकारात्मक विचार-वृत्तींना सकारात्मक वळण देण्याचे काम केवळ आपल्या योग्य भाषेद्वारे मेंदूला सूचना देऊन होऊ शकते, या कल्पनेचा शास्त्रीय पातळीवर पाठपुरावा करून, तिचा प्रभावीपणा अजमावण्यात आलेला आहे. त्यामुळे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमचे हे तंत्र आपल्यालाही उपयुक्त करू शकेल. अवघ्या साठ पृष्ठांमध्ये हे सर्व तंत्र विशद केलेले आहे. त्यामुळे ते आत्मसात करण्याला आणखीनच सुलभ ठरेल. झटपट व्यक्तिमत्व विकास ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more