* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171619269
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 1990
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
PEOPLE WERE GATHERING IN GROUPS WHILE TALKING AT THE HIGHEST PITCH. WITHIN AN HOUR THE NUMBER CROSSED A THOUSAND THOUGH NO ONE HAD PARTICULARLY GIVEN A CALL. IT TURNED INTO A HUGE MARCH. “STOP THIS ‘ROAD-BLOCK’!” “SAVE NIGAVANI!” “SHAME ON AGITATION!” PEOPLE WERE FED UP AND HENCE WERE JOINING IN TO SHOW THEIR SUPPORT. THIS CONTINUOUSLY SWELLED UP THE SIZE OF THE MARCH. NOW, IF THE FARMERS FROM SANGRAM NAGAR AND THESE PEOPLE COME FACE TO FACE THEN SURELY THERE WOULD BE A GREATER TROUBLE. PEOPLE ON BOTH THE SIDES ARE EXTREMELY DISSATISFIED AND ANGRY. NO ONE CAN TELL THE END RESULT.
लोक घुपळ्या घुपळ्याने जमत होते... सभेत भाषण दिल्यागत तावातावाने बोलत होते..तासाभरातच तेथे तीन-चार हजारांचा जमाव जमला! कुणी हाकारे-कुकारे न घालता एक प्रकारच्या चिडीने लोक जमले होते... जमत होते...आणि मग हा मोर्चा निघाला... ‘रास्ता रोको’ हटाओ...‘निगवणी बचाओ!’‘आंदोलनाचा...’‘धिक्कार असो!’वैतागलेले नागरिकही या मोर्चात अधे-मधे रस्त्यात सामील होत होते व मोर्चाची लांबी आणखीन फुगीर करीत होते. हे मोर्चातील नागरिक व संग्रामनगरातील शेतकरी आमनेसामने आले तर कदाचित अनावस्था प्रसंग ओढवेलही! कारण दोन्हीकडील लोक चिडलेत, खवळलेत! काय होईल सांगता येत नाही!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ZOMBADA #ZOMBADA #झोंबडं #FICTION #MARATHI #MAHADEOMORE #महादेवमोरे "
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    श्री महादेव मोरे यांची ‘झोंबड’ ही कादंबरी एकाच विषयाला धरून लिहिलेली नाही. त्यांनीच प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे कादंबरीतील रूढसंकेत व ठोकताळ्यांना बगल देऊन कादंबरीच्या फॉर्ममध्ये काही वेगळं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात हे वेगळं देताना अनेक विष एकत्र आल्याने सुसूत्रतेचा अभाव या कादंबरीत जाणवल्यावाचून राहत नाही. मुळात कादंबरीचा विषय विडी कामगारांचा. विडी कामगारांचे प्रश्न हाताळून एक युनियन पुढारी जन्माला येतो हे खरं. तो जन्माला येणं हेच जर दर्शवायचं होतं तर विडी कामगारांचा प्रश्नांना कादंबरीची पन्नास एक पृष्ठ खर्ची घालायचं कारण नव्हतं, त्यानंतर जोगतिणीचे प्रश्न. शेवटी तंबाखूचे भाव वाढवून मिळावेत म्हणून होणारं आंदोलन. कादंबरीची थोडक्यात ओळख करून देणं अवघडच. या कादंबरीत पात्रांची ओळख करून देणं अवघडच. या कादंबरीत पात्रांची रेलचेल भरपूर. ती पात्रं वास्तविक जगातील कुणावरून बेतलेली आहेत हे सहज ओळखता येतील, इतकं त्यांच्या नावाशी असलेले साधम्य जाणवतं. आता उदाहरणंच द्यायची झालीत तर कादंबरी न वाचताही ओळखता येतील. अशी काही नावे डॉ. आबा आडारकर, समाजवादी कार्यकर्ते. एक गाव एक मसणवटाचे प्रणेते ग. बा. हेगडे. संपादक, पत्रकार त्यांचे चार चार दिवाळी अंक उमेश कुलकर्णी - बटाटा आंदोलन कुलकर्णी आणि जोशी उदंड असल्याने नाव लगेच समजून येणार नाही, पण शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळणारे एखादे दुसरेच जोशी असतात, तर अशी अनंत पात्र कादंबरीत आहेत. कादंबरीची थोडक्यात ओळख करून देण्याचा प्रयत्न करतो. निगवणी गावातील विडी कामगारांचे, यात स्त्रियांचा भरणा जास्त. प्रश्न हाताळण्यासाठी एका कॉलेजातील प्रा. सतीश कुलकर्णी हे पुढाकार घेतात, त्यात यशस्वी होतात. त्यांचं नाव होतं. ते युनियन पुढारी म्हणून उदयास येतात, त्यामुळे ज्यावेळी जागतिणी भगिनीचं अधिवेशन घेतलं जातं, त्यावेळीही सतीश कुलकर्णीला आपोआपच मान मिळतो. त्यानंतर तंबाखू पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची संघटना करावी आणि त्यांना तंबाखूचा रास्त भाव मिळावा. यासाठी प्रयत्न सुरू होतात. धरणं मोर्चा, आंदोलन, रास्ता रोको अशा वाटेने जात कादंबरी शेवटी अशा निष्कर्षाप्रत येते. कशा ते लेखकाच्याच शब्दातून वाचा. ‘‘खरं सत्य आहे तरी काय मग ?’’ ‘‘ते सारं अशा ओझरत्या भेटीत सांगून संपणार नव्हे, तो एक स्वतंत्र व्याख्यानाचाच विषय आहे म्हणा ! थोडक्यात म्हणजे दोन तालेवारांमधील झोंबडं. हेच केवळ त्यात सत्य आहे ! भारतातील कुठल्याही भागात जा, तिथं बुडाखाली बक्कळ पैसा असलेले निदान दोन तालेवार तरी असतातच व पैशाच्या जोरावर समाजकारण, राजकारण करण्याचं निमित्त करून त्यांचं कायम झोंबडं चालू असतं. एकमेकांवर मात करावयाची बंधनं म्हणून हे लोक माणसं वापरत असतात. काही इकडे असतात काही तिकडे असतात. हे ‘छू’ घालतात. त्याच्या त्याच्यात आणि झोंबड लावून रिकामे होतात. एखाद्याकडील हरला की, दुसरा विजयोन्मादाने थय-थय नाचायला लागता, तोवर पराजित मनात काही डावपेच ठेवून परत त्याला भिडतो ! सुटलं-सुटलं. संपलं-संपलं, असं वाटतंय तोवर परत झोंबडं सुरु होतं ! त्यात वेगळं काय नाही गायकवाड ! लोकशाही भारतात किंवा भारतातील तथाकथित निरोगी लोकशाहीत आढळणारी रोजाना स्टोरी आहे ही ! इथं एका भिडूचं नाव आहे जयपुरीया, तर दुसऱ्याचं जीवजी भाय ! आणि ह्यांचं हे झोंबडं दोघातील कुणी एक ‘संपेल’ तेव्हाच खऱ्या अर्थानं संपायचं !!’’ इतं कादंबरी संपली आहे. खरं तर दोन-तीन विषय एकत्र घेऊनही कादंबरी छानचं रंगली असती. कादंबरीचा आवाका मोठा, परंतु वास्तव जगातील पात्रांना कादंबरीत घुसडण्याचा अट्टाहास केल्यानं विषयाची कुतरओढ झाली आहे. वास्तविक जगातील पात्रं त्यांच्या त्यांच्या परीनं कार्य करीत आहेत. त्यांच्यातही गुणदोष आहेत. पण त्या सगळ्या पात्रांना कादंबरीत आणल्यानं विषयांतर होत राहून वाचकाची मुख्य विषयापासून ताटातूट होत राहिल्यानं रसभंग होतो. डॉ. सुनील अचलापूरकर याला बोकड छापदाढी कशासाठी ? तर केवळ वास्तव पात्राची ओळख पटावी म्हणून. एकंदरीत ‘झोंबडं’ ही कादंबरी वेगळ्या विषयावरील असूनही घाईघाईत लिहिल्यासारखी वाटते. अर्थात ग्रामीण वाचकांना ही कादंबरी आवडायला हरकत नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more