Smita Narayanप्रतीक्षा - रणजित देसाई
ग्रुप वर मी प्रथमच पोस्ट करत आहे म्हणून माझ्या आवडत्या लेखकाचे पुस्तक निवडले, पण सर्वात प्रथम याच लघुकादंबरी बद्दल लिहावेसे वाटले..देसाईंच्या अनेक पुस्तक पैकी हे मला खूप जवळचे आहे, देसाईंची जी ठराविक लिखाण शैली आहे त्याहून ही मला थोडी वेगळी वाटली थोडी अनपेक्षित अशी ही कथा आहे, परंतु बाज तोच.. व्यक्त न झालेल्या भावना, पात्रांची दुःखे त्यांचा भूतकाळ या बद्दल ते असे लिहतात की डोळयांत सहज पाणी उभे राहते, त्यांच्या कथा ह्रदयाचा ठाव घेतात.. ही एक प्रेमकथा म्हणण्यापेक्षा भावकथा म्हणू शकता.कमी शब्दात ही कादंबरी त्यांनी मांडली आहे. कथेतील मिलिंद दुःखी आहे, प्रवासी आहे कशाच्या तरी शोधात तो एक हिमालयतील आश्रमात येतो. तिथे त्याची भेट बाबा, नंदिनीं, लहान राहुल यांच्याशी होते. त्यांच्या प्रेमळ वागण्याने तो सुखावून जातो आणि काही दिवस तिथे राहतो, नंदिनी ला पाहताक्षणी दोघांनाही एकमेकां बदल ओढ जाणवते, बाबांना या सर्व गोष्टी जाणवतात पुढे काय होते ते तुम्हाला कादंबरी वाचूनच कळेल..मला असे वाटते या कथेचा शेवट काय आहे यापेक्षा त्यांनी पुस्तकातून जीवना बदल, प्रेमबद्दल जे काही विचार मांडले आहेत ते खूप काही देऊन जातात मला या कथेत जर कोणते पात्र आवडले असेल तर ते आहेत बाबा..बाबा संन्यासी आहेत, परंतु त्यांच्या गतायुष्यात ते देखील प्रेम ,वैवाहिक जीवन यातून गेले आहेत..ते नंदिनी वर मुलीसारखे प्रेम करतात. स्वतःच्या वयाचा विचार न करता रुग्ण सेवा करतात. ते खूप प्रेमळ करुण आहेत. भटकलेल्या मिलिंद ला समजावून घेतात, त्यांच्यात आणि मिलिंद मधले सवांद म्हणजे कथेतला आत्मा आहेत आवर्जून सारखे सारखे वाचावे असे. निस्वार्थी प्रेम, वैवाहिक सुख, ईश्वर भक्ती, श्रद्धा, मृत्यू या बद्दल बाबा खूप भरभरून बोलतात. प्रेमाचा विशुद्ध ,सात्विक, तरल भाव या कथेत आहे जो मला खूप प्रिय आहे, असाच "अभोगी" मध्ये जाणवतो आणि खांडेकरांच्या `अमृतवेल` मध्ये पण...For me it`s a philosophical feast, we are looking for something and I hope we will find that someday.. मला आवडलेला एक परिच्छेद खाली देत आहे तुम्ही वाचा आणि तुम्हाला यामधील कोणता संवाद आवडला किंवा कोणत्या ओळी आवडल्या ते नक्की सांगा..
धन्यवाद.
"ही बघ ना गौरंगी! कसल्या ओढीनं ती या पर्वतकड्यावरून झेप घेते आहे? ज्या ओढीननं ती या प्रचंड नगाधिराजाच्या मस्तकावरून झेपावत आहे, ती सागरतृष्णा खरोखरच एवढी श्रेष्ठ आहे का? जेव्हा ती सागराला मिळेल, तेव्हा या तपश्चर्येचं सार्थक होईल का? ह्यालाच का आपण प्रेम म्हणतो? हे प्रेम नव्हे. हे वासनेचं प्रतीक आहे. वासना प्रबळ आहे; पण त्याहीपेक्षा प्रेमाचा ओघ शतपटीनं प्रबळ असूनही त्यात रौद्रता नाही. त्यात समाधान आहे. सुख आहे आणि आज प्रमत्त्त होऊन पर्वतशिखरावरून झेपावणारी कर्पूरगंगा तन्वंगी प्रेमाचा अर्थ कळू लागल्यावर पुढे अधिक शांत, गंभीर होत असावी...
Tushar Kute#पुस्तक_परीक्षण
📖 प्रतीक्षा
✍️ रणजित देसाई
📚 मेहता पब्लिशिंग हाऊस
`पाहिलंस, मिलिंद, माणूस अंतर्मुख होण्याला केवढा भितो, ते ? दुसर्याच्या दुःखाकडे तो निर्विकारपणे पाहू शकतो. त्याच्या दुःखाची छाननी करू शकतो; पण स्वत:चं परीक्षण करताना मात्र तो व्याकूळ होतो. दुसऱ्याच्या जखमेवरची पट्टी चारचौघात त्याला बेदरकारपणे काढता येते; पण स्वत:च्या जखमेवरची पट्टी दूर करण्याच्या कल्पनेनंही तो कासावीस होतो...
`याचं कारण?`
कारण एकच... जीवनावर श्रद्धा. जीवन जगण्यात असलेला प्रामाणिकपणाचा अभाव. सारेच व्यवहार स्वार्थप्रेरित. मानव एकटाच जन्माला येतो आणि त्याला शेवटी एकटाच जावं लागतं, तरीही त्याला आयुष्यभर सोबतीची आवश्यकता असते ही सोबत तो शोधीत असतो. आयुष्य क्षणभंगुर आहे, हे माहीत असूनही, चिरंतन, शाश्वत प्रेमाचे ठिकाण त्याला हवं असतं; पण हे सारं स्वत:ला सुरक्षित राखून....
`दिल्याखेरीज काहीच मिळू शकत नाही. स्वतः हरवल्याखेरीज काही गवसत नाही. हे हरवण जो शिकला, त्यालाच ती शांती, ते समाधान मिळू शकेल. मात्र ते ठिकाण प्रत्येकानं शोधायला हवं...
हिमालयाच्या कुशीमध्ये एक प्रवासी भटकत चालला आहे. वाटेत त्याची भेट एका संन्याशाची होते. तो एका तरुण स्त्री व तिच्या मुलासोबत राहत आहे. प्रवासी एका रात्रीसाठी त्याठिकाणी थांबतो. परंतु नंतर मात्र त्याचा पाय तेथून निघत नाही. तो त्या तरुण स्त्रीच्या प्रेमात पडतो. तिचा एक भूतकाळ आहे. त्यालाही तो सहजपणे स्वीकारतो व दोघांचे मिलन घडते. अशी साधी सरळ प्रेमकथा असलेली कादंबरी म्हणजे "प्रतीक्षा" होय. रणजीत देसाईंनी सुटसुटीतपणे घटनांची व प्रसंगांची मांडणी करून ही वाचकांसमोर सादर केलेली आहे. ती वाचत असताना आपण सतत हिमालयाच्या कुशीत वावरत राहतो. शिवाय संवादांची रचना मोठ्या प्रमाणात असल्याने तिच्याशी सातत्याने बोलतही राहतो, हे या कादंबरीची वैशिष्ट्ये होय.
https://www.tusharkute. net/2021/04/pratiksha-ranjit-desai.html
Prashant Joshiअनेक वर्षांपूर्वी वाचली होती ही कादंबरी पण अजूनही सर्व घटना तशाच डोळ्यासमोर आहेत. मिलिंद जेव्हा थकून मठात येतो तेव्हा नंदिनी त्याच्यासाठी जेवणाची थाळी आणते, मात्र तोपर्यंत मिलिंद झोपी गेलेला असतो. त्यावेळचे बाबांचे वाक्य, `थकल्या शरीराला अन्नापेक्षा आरामाची जास्त गरज आहे` हे मी अजूनही आचरणात आणतो😀
Pritam Katkarआज रणजित देसाई ह्यांची #प्रतीक्षा ही कादंबरी वाचून पूर्ण झाली. एक वेगळ्याच विश्वात ही कादंबरी घेऊन गेली....
कथेचा विषय असा...
कादंबरीचा नायक मिलिंद अतृप्त आणि असफल प्रेमजीवणातून आलेल्या निराशेपोटी भटकत असतो.
खऱ्या प्रेमाच्या शोधत तो फिरत फिरत हिमालयातील एका मठात येतो. आणि तेथेच त्याची नंदिनी ह्या नायिकेशी गाठ पडते.
मिलिंद अतिशय हलक्या व भावपूर्ण अंतःकरणचा आहे.
तर नंदिनी सुंदर, सत्वशील, प्रेमळ, संयमी, कर्तव्यदक्ष आणि विचारी आहे. अतिशय अलगदपणे त्या दोघांनमधील भावबंध विणले जातात. ती हळूहळू घट्ट होणारी वीण वाचकाला मंत्रमुग्ध करते.
तिसरी व्यक्तिरेखा ह्या कादंबरीतील बाबा (मठातील अध्यात्मिक गुरू) ही आहे.
बाबाच्या व्यक्तीरेखेतून पाप, पुण्य, प्रेम जीवन परमेश्वर इत्यादी विषयांची वेगळी पण ठाम मते वाचकांसमोर येतात.
कादंबरीतील वातावरण निर्मिती ही लक्षणीय आहे.
कादंबरी वाचताना आपण देखील हिमालयात वावरत आहोत असा भास होतो.
निसर्गवर्णनाबरोबरच लोकजीवणाचेही चित्रण येते आढळते. एखाद्या चित्रपटात शोभेल अशा प्रकारचे रहस्यपुर्ण कथानक रंगवून लेखकाने ही छोटेखानी कादंबरी वाचकांच्या मनाला भिडवण्याचा प्रयत्न केला आहे.
©प्रितम र. कातकर
Dhiraj Videप्रेम या विषयावर आवडलेलं साहित्य
DHIRAJ VIDEरणजित देसाईंच "प्रतिक्षा"... एक अप्रतिम प्रेमकहानी...नक्की वाचा.