Arun Kulkarniपुस्तक - वपुर्झा , हे पुस्तक अर्पण करतांना लेखक व .पु.काळे लिहितात , `शांतचित्त ज्ञाना रोखठोक तुका ` ह्यांचा अपूर्व संगम म्हणजे दुर्गाबाई भागवत. `वपुर्झा ` ची हि आवृत्ती दुर्गाबाई भागवत ह्यांना . -- वपु . पुस्तकावर लिहिलेला अभिप्राय - कोणतेही पान उघडा आणि वाचा !वपुर्झा हे पुस्तक कोणासाठी ? ज्यांना मोत्यातील चमक बघायची आहे अश्या वेड्यांसाठी ! हे पुस्तक कस वाचायच? एका बैठकीत? अथ ते इति एका दमात? छे मुळीच नाही. काही हौशी घरामध्ये ड्रेसिंग टेबलवर निरनिराळ्या अत्तरांच्या बाटल्या असतात . जसा मूड असेल तस अत्तर वापरायच किंवा जसा मूड व्हावासा वाटत असेल तस अत्तर निवडायचं . हे पुस्तक असंच वाचायचं .हव ते पान आपापल्या मूडनुसार उघडायचं आणि सुगंधाने भारून जायचं .एखादा सुगंध पुन्हा घ्यावासा वाटला तर पुन्हा शोधायचा . त्या शोधात आणखी काहीतरी सापडेल .म्हणून या पुस्तकात अनुक्रमणिका ,क्रमांक , संदर्भ काहीही दिलेलं नाही . या पुस्तकाच्या शेवटच्या पानावरच वाक्य . नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही .वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडायचे असतात . म्हणजे ते ते साहित्य स्वतः पुरतं चिरंजीव होत . करमणूक करवून घेतानाही स्वतःला खर्ची घातल्याशिवाय ती करमणूक भिनत नाही . साहित्य हे निव्वळ चुन्यासारखं असतं . त्यात आपल्या विचारांचा काथ टाकल्याशिवाय आपल्या आयुष्याचा ग्रंथ रंगत नाही . आणि लेखकांला हवा असतो संवाद . त्याशिवाय त्याच पान रंगत नाही .
Rajesh Javirवपुर्झा हे पुस्तक आज वाचून झाले पण केव्हा संपलं कळलेच नाही. वपुर्झा हे पुस्तक व पु काळे द्वारा लिखीतकथा-कादंबरी..
कोणतंही पान उघडा आणि वाचा!
प्रत्येक पानावर एक अनुभव किंवा विचार मांडला आहे, त्यामुळे तुम्ही कुठलेही पान काढून वाचले तरी चालेल.
हे पुस्तक एक उत्कृष्ट नमुना आहे. हे बागेसारखे आहे. आपण कोणत्याही विभागात टहल जाऊ शकता, आपण भेटू शकतील अशा छटा दाखवून आपण मंत्रमुग्ध व्हाल. लेखकाचा जीवनाचा दृष्टीकोन दर्शवितो आणि तो इतका सकारात्मक, हृदयस्पर्शी आणि पृथ्वीवर इतका खाली आहे. तो मैत्रीपासून ते लग्नापासून महत्वाकांक्षा या प्रत्येक गोष्टीवर आपले विचार सामायिक करतो .. हे जवळजवळ आपल्या अनुभवी वृद्ध शहाण्या माणसाशी बोलत असताना सारखेच आहे.
आश्चर्यकारक पुस्तक आपण वाचत असलेले विचार आपल्या स्थितीशी उत्तम प्रकारे जुळतील. आणि आपला मूड लगेच बदलेल. हे माझे आवडते पुस्तक आहे आणि मी ते नेहमी माझ्याकडे ठेवतो.
कथा-कादंबरी.व. पु.काळे ह्यांचे हे पुस्तक. कथा-कादंबरी वगैरे कोणत्याही प्रचलित साहित्यप्रकारात बदलता येणारे नसले तरी वपुस्पर्श झालेला हा वैविध्यपूर्ण लेखनगुच्छ असा आहे की वाचकांनी भरभरून दाद दिल्याने लाखो मनात घर करणारे म्हणुनच पुन:पुन्हा मुद्रण करावे लागले आहे. एकाचा दुसर्याशी संबंध नसलेल्या तरीही त्यांच्यात एक धागा असलेल्या अनेक ढंगी परिच्छेदांची सुरेख गुंफण ह्या पुस्तकात गुंफण्यात आली आहे. त्यामुळेच आपल्या इच्छेनुसार हाताला लागेल ते पान उघडावे आणि त्या पानावरील लिखाणात मग ती एखादी छोटीशी गोष्ट असो वा मोजक्या शब्दात सांगितलेला तो एक विचार असो रंगून जावे असे हे पुस्तक आहे. हा एक मुक्त आनंद आहे म्हणूनच त्याला शीर्षक-क्रमांक-संदर्भ वगैरेचे बंधन नाही.
#वपुर्झा #वपुकाळे #पुस्तकवाचन
Sunil Maneकोणतंही पान उघडा आणि वाचा! ‘वपुर्झा’ हे पुस्तक कोणासाठी? ज्यांना मोत्यातील चमक बघायची आहे अशा वेड्यांसाठी! हे पुस्तक कसं वाचायचं? एका बैठकीत? अथ ते इति? एका दमात? छे! मुळीच नाही. काही हौशी घरांमध्ये ड्रेसिंग टेबलावर निरनिराळ्या अत्तरांच्या बाटल्या असतात. जसा मूड असेल तसं अत्तर वापरायचं किंवा जसा मूड व्हावासा वाटत असेल तसं अत्तर निवडायचं. हे पुस्तक असंच वाचायचं. हवं ते पान आपापल्या मूडनुसार उघडायचं आणि त्या सुगंधाने भारून जायचं. एखादा सुगंध पुन्हा घ्यावासा वाटला तर? पुन्हा शोधायचा. त्या शोधात आणखी काहीतरी सापडेल. म्हणूनच या पुस्तकात अनुक्रमणिका, क्रमांक, संदर्भ काहीही दिलेलं नाही.
Sandhya Shanbhagवपुर्झा
लेखक: व पु काळे
इतक्या लोकांनी हे पुस्तक वाचले आणि त्याबद्दल लिहिले सुद्धा, मी ही बऱ्याच लोकांचे मत वाचून हे पुस्तक विकत घेतले आणि एका ही क्षणी मला ह्याचा पश्चाताप झाला नाही. ह्या पुस्तकाबद्दल सगळे म्हणत होते कुठूनही सुरुवात केली तरी चालेल. मी विचार केला असं कोणतं पुस्तक आहे जे कुठूनही वाचू शकतो. पण जेंव्हा सुरुवात केली तेव्हा कळलं- ह्याला कारण एकच - प्रत्येक पानावर एक अनुभव किंवा विचार मांडला आहे, त्यामुळे तुम्ही कुठलेही पान काढून वाचले तरी चालेल. हे इतकं सुरेख पुस्तक आहे की, एखादा गोड किंवा आपल्याला आवडणारा पदार्थ कसा आपण अगदी थोडा थोडा, चव घेऊन खातो त्याप्रमाणे अगदी ४-५ पाने रोज अस मी वाचलं, आणि अजूनही वाचून झालेलं नाही पण मला इथे लिहील्याशिवाय राहवलं नाही. हे विचार, अनुभव किंवा संवाद वाचताना आपणही असे विचार बऱ्याचदा करतो अस लक्षात आलं. वपुंचं लिखाण म्हणजे - अगदी सामान्य लोकांमधील संभाषण किंवा त्यांची विचार करण्याची पद्धत.
त्यांच्या लिखाणाचा असा काही प्रभाव आहे ज्यामुळे हे पुस्तक कोणालाही नावडणार नाही. टीका म्हणून नाही पण त्यांनी माणसाच्या स्वभाव धर्माचे उत्तम उदाहरणे देऊन खुलासे केले आहेत. एखादी सामान्य परिस्थिती कशी हाताळावी वा कशी हाताळू नये ह्याचे अगदी मजेशीर व काहीसे उपहासात्मक किस्से सांगितले आहेत.
परत परत वाचावे असे हे पुस्तक जरूर संग्रही असावे.
Tejaswini Tawade Kolungadeआज वपुर्झा हे व पु काळे यांनी लिहिलेले पुस्तक वाचून झाले. पुस्तकातिल प्रत्येक ओळ दोनदोनदा वाचावीशी वाटते. जर हे पुस्तक मी 15 वर्षापूर्वी वाचले असते तर निश्चितच मी आज वेगळे आयुष्य जगत असते. अप्रतिम विचारसरणी. जगण्याचे सरळ साधे नियम आणि वपुंचि मनाला डायरेक्ट भिडणारी भाषा. ज्यांनी वाचले आहे त्यांनी पुन्हा एकदा वाचा आणि ज्यांनी अजून वाचले नाही त्यांनी एकदा तरी वाचावे असे हे पुस्तक. ज्याप्रमाणे रक्त शरीरात चढवतात त्याप्रमाणे ह्या पुस्तकाची प्रत्येक ओळ न ओळ शरीरात मनात आणि मेंदूमधे भिनवता आली पाहिजे.
वपु द ग्रेट
Vinay Maneकोणत्याही वेळी कोणतही पान काढून वाचायला सुरुवात करावी असे पुस्तक .
Swati Khedekar Borkarव . पु. च. वपुर्झा.. हे पुस्तक वाचलं.किती छान लिहिलं आहे पुस्तक... वपुंनी .
प्रत्येक परिच्छेद टिपण म्हणून लिहून ठेवावा.. ..इतकं मोहात पाडणारं ..हे पुस्तक.
इतक्या वर्षापुर्वी लिहिलेलं हे पुस्तक ...तरीही आत्ताच्या परिस्थितीशी, मनस्थिती शी अगदी तंतोतंत जुळावं ...परिच्छेदातील नायक-नायिका, संवादक आपण स्वतः वाटावं इतक आपलं वाटणारं पुस्तक..
कोणतेही पान उघडावं आणि वाचायला सुरुवात करावी... विवेचन इतक मार्मिक की जीवनाकडे पाहण्याचा डोळस दृष्टिकोन अगदी सहज विकसित व्हावा ..प्रत्येक वाक्य जीवनाच्या बऱ्याच प्रसंगात quote म्हणून वापरता यावं इतकं छान ..खरच अप्रतिम पुस्तक.
Uchita Thorwatकधी काही problem आला किंव्हा मन अस्वस्थ असेल,तर वपुर्झा च कोणतंही पान उघडाव आणि नजर जाईल तिथून वाचायला सुरुवात करावी, लगेच समाधान होतं.
Sandip Suryavanshiवपुंचे खूप छान पुस्तक आहे.आज दुसऱ्यांदा वाचायला घेतले तरीही नवीनच अनुभव येत आहे.विचारांना खतपाणी देणारे हे पुस्तक आहे.कुठल्याही पानावरून आपण सुरूवात करा.
Nilima Nandurkarकोमलतेत ताकद असते. पावसाचं पाणी आकाशातून पडतं. माती वाहून जाते. नद्यांना पूर येतात. भले भले खडक झिजतात. पाणी वाहातच रहातं, फुलं ही पाण्यासारखीच कोमल असतात. एक दगड भिरकावला तर दहाबारा फुलं खाली पडतात. ज्या दगडामुळं फुलं वेचायला मिळाली तो दगड कुणी घरी आणत नाही . आपण फुलंच घरी आणतो. ती कोमेजतात पण एवढ्याश्या जीवनात तुम्हाला सुगंधच देतात. पाण्याचं सामर्थ्य त्याच्या सातत्यात असतं. प्रवाहात एखादा खडक आला तर पाणी त्याच्याशी झुंज देत बसत नाही . बाजूने वाट काढून निघून जातं. या वाहण्याच्या सातत्याने खडक लहान होत जातो. प्रवाह रुंदावत जातो. सातत्य म्हणजे काळ. काळाचे सामर्थ्य मोजता येणार नाही. अशा जबरदस्त शक्तीची साथ एवढ्याशा दिसणाऱ्या जलधारेच्या पाठीशी असते.
कोणतेही शब्द ऐकावे लागले तरी त्या शब्दाचं गीतात रूपांतर करण्याचं सामर्थ्य असणारी स्त्री #जलधारा असते.
साथीदाराला सुधारण्याच्या खटाटोपात पडण्यापेक्षा त्याला वळसा देऊन पुढे जाणे चांगलं. कारण त्याच्या दृष्टिकोनातून त्याचं वागणं योग्यच असतं.
जलधारा हो, वाहात राहा.
#वपुर्झा.. व. पू. काळे
.. कधीही नैराश्य आलं ... उदास वाटलं ... #वपुर्झा मधील कोणतंही पान उघडावं अन वाचावं ... जीवनात नव्याने चैतन्य आणण्याचं सामर्थ्य या पुस्तकात आहे .
खरोखर अशी पुस्तके हीच खरे मित्र . कधीही अंतर न देणारे . सुमती क्षेत्रमाडेन्च #अनुहार आणी #वपुर्झा अत्यंत प्रिय मित्र अशी आहेत ही पुस्तकं.
Seema Suryawanshi हो! खूप छान पुस्तक आहे. मी वाचले अनेकदा. अगदी संग्रही ठेवावे असे पुस्तक आहे.
Mukesh Sutar वपुर्झा पुस्तक सध्या वाचतोय....
Filling वपुमय......
अनेक समस्या, त्या क्षणी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या लागतात. थोडा अवधी लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा. दूध अचानकपणे, म्हणजे आपण तंद्रीत असताना, कोणत्या तरी क्षणी लाट अंगावर येते, त्या वेगाने वर काठापर्यंत येतं. चिमटा शोधायला वेळ नसतो. अशा वेळेला पाण्याचा शिडकावा करून ते तिथल्या तिथे शांत करायचं असतं. थांबवायचं असतं. मग सावकाश चिमटा शोधावा, उसंत घेऊन ते खाली उतरवावं. तसचं काहीसं.. अनेक समस्यांचं..- व पु काळे
Vrushali Sarnaikकितीदाही वाचा... प्रत्येक वेळी वेगळा अर्थ उमगतो..
Vaishali Kulkarniखुप वेळा वाचले.त्यातली वाक्य,परिच्छेद अप्रतीम
Ravikumar Kambleहे पुस्तक मी कायम नजरेच्या टप्प्यात ठेवतो.
Prachi Divekar हे अत्तर आहे... रोज थोडं थोडं.
Manali Powarवपुर्झा..एक नंबर..कंटाळा न येणार...वाचून समाधान देणारं...
वपु आणि वपुर्झा दोन्हीही अप्रतिम..
Anjali BarsawadeEvery statement in vapurza is a guideline.
Aishwarya Vaijapurkarग्रेट हा एकमेव शब्द , कोणत्याही वेळी वाचा मनाला दिलासा मिळतो, आपल्याला आपल्याच आयुष्याचे घटनांचे किंवा मानसिक स्थिती चे प्रतिबिंब त्यात आढळते , आयुष्याचे सार च जणू सापडते त्यात प्रत्येक वाचण्यात नवे काही उलगडत उमगत जाते
Manjusha NebHo khasiyat hi aahe kuthun he surwat karta yete
Meena Kharolkar MundeApratim pustak
सागर सुलभा आयरे अप्रतिम पुस्तक ..... & the grate व. पु.
Bhakti Gharat वपुर्झा ......कोणत्याही क्षणी कोणत्याही मनस्थितीत .....मनाच्या दोलायमान स्थितीला स्थिरता देणार ...कधीही वाचता येणार .......
आणि व पु ....म्हणजे माणसाच्या भावनांच्या स्पंदनांना अक्षरांच रूप देणारे अवलिया ....
NitinRaje Baviskarapratim,,, khara tr vapurza he vishal bhandar aahe jivanat jaganyachya vicharancha
Rupali More Menge Khup sundar
Wanashri Meshram रोजच वाचते...मला खुप खुप आवडतात वपुर्झा चा प्रत्येक Paragrap
डॉ कृष्णा सुभाष सपाटेवपुर्झा कशासाठी वाचायचं?
जीवनाचे रंग चौखुर उधळत असतात आणि आपण वेडंवाकडं तोंड करून बसलेलो असतो.कशासाठी हे सगळं? कधी तरी शोध घेणार आहोत की नाही आपण या रसरसलेल्या जीवनाचा.डुंबायला यायला हवं,समरसून जगायला यायला हवं,नात्यांची रेश्मी शाल पांघरूण उबदार व्हायला हवं,ज्यावेळी अपयशाच तोरण डोक्यावर बांधलं जात त्यावेळी त्यावरही यशाचा झंझावात उभा करता यायला हवा. मरण्याआधी जगून घ्यायला हवं आपण,मरण्यासाठी नसतो जन्म आपला हेही तितक्याच प्रखरतेने कळायला हवं.मग वाट कशाला बघायची कोणी सांगण्याची? आपणच धुंडाळत निघायला हवं आपला स्वर्ग,मोक्षाच द्वार,अमृताचा डोह.हे सर्व आपल्या आजूबाजूला असताना आपण मात्र थातूर मातूर जगण्यात,लोकांचे उट्टे काढण्यात धन्यता मानून का बरं जगत असू? जग नव्याने अनुभवायचं का?रात्रीच स्वप्न दिवसाही सोनसळी अंकुरांनी उगवायच का? मग हा सुखांचा पेटारा घ्या, यातले जे माणिकमोती,
पाचू,अत्तरांच्या कुप्या,मखमली मधाळ जीवनगाणं या पुस्तकात भरून ठेवलंय किती तरी वर्षांपूर्वी.काय म्हणतात जरा बघा...
"आपण केवळ बाह्य देखाव्यावर भुलून,कातडीचा रंग पाहून लग्न जमवतो.आर्थिक बाजू पाहतो,सौंदर्य शोधतो,शिक्षणाचा अंदाज घेतो आणि केवळ रूपावर भाळून आयुष्यातले सर्व निर्णय घेतो.आणि म्हणून वैतागतो,पस्तावतो.परमेश्वराने भलताच जोडीदार गळ्यात मारला म्हणून कातवतो. शेजाऱ्याची बायको सुलक्षणी वाटते "
वपुंच लिखाण गुलकंदासारखं आहे,एकदा मेंदूला सवय जडली की पानच पान गोडवा बनून मेंदूत विरघळत जातात,नुसता गोडवाच नाही हा!,त्याबरोबर जीवनाला झळाळी मिळते जेव्हा ते आचरणात उतरत तेव्हा.बघा इथं काय म्हणतात ते..
"अस्थिर माणसं जशी बारमध्ये सापडतात तशीच सिद्धिविनायकाच्या रांगेतही.अर्थहीन श्रद्धा व्यसनासारखीच.जित्याजागत्या माणसांशी संवाद संपला की हे तकलादू आधार शोधावे लागतात."
पुस्तक वाचत असताना 440 होल्टचा करंट बसत राहतो सारखा आपल्याला, कच्चे दुवे गळून पडतात आणि पक्के होण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करतात.ऊस गोड लागला की मुळापासून खाऊ नये असं लोक म्हणतात पण या पुस्तकाचा ऊस गोड तर आहेच पण तो मुळापासून खाल्ल्याशिवाय समजत नाही.जगाचं तत्वज्ञान वाचण्यासाठी आपल्याला बरीचशी पुस्तक वाचावी लागतात पण हे एक अस पुस्तक आहे ज्यात या जगाचं तत्वज्ञान ओतप्रोत भरलेलं आहे.आणि त्याची भाषा आजीने प्रेमाने डोक्यावर हात फिरवून आपला आलाबाला घ्यावा असं वाटत राहतं.इथं काय म्हणतात बघा...
"पुरुषांचं लग्न झालं म्हणजे त्याला आई दुरावते आणि त्याला मूल झालं म्हणजे बायको दुरावते."
शेवटी इतकंच म्हणेन की अशी पुस्तकं शोपीस म्हणून पुस्तकांच्या कपाटात ठेवायची नसतात,तर ती हृदयाच्या कप्प्यात खोवून आरपार ठेवायची असतात,म्हणजे होत काय? तर ज्यावेळी पण गरज भासेल त्यावेळी ती उघडली की क्षणार्धात मोरपीस फिरतील मनावरून आपल्या आणि आपण विचारांचे न्यारे पंख लेवून अशी गगनभरारी घेऊ की सगळंच जगण्याचं आकाश ह्या दोन हातांच्या मनगटात आणि मेंदूच्या दुनियेत अनंत काळासाठी वास्तव्य करील इतकं मात्र नक्की. शेवटी जाता जाता या त्यांच्या काही ओळी...
"संशयी माणसं टॅलेंटेड असतात असं मुळीच समजू नका.तस असत तर संशयी वृत्तीच्या एकूण एक माणसांना समजल असत की,आपल्या जोडीदाराला निव्वळ प्रेम करून आपल्याला जिंकता आलं असत.संशयाच्या बेडीपेक्षा प्रेमाची बेडी तोडणं फार कठीण असतं. "
"भीतीमधूनच फिलॉसॉफी निर्माण होते अस मी समजत होतो.पण तसं नाही.स्वार्थी आणि निष्क्रिय माणूस जास्त चांगलं तत्त्वज्ञान सांगू सांगू शकतो".
Yogayog Chaudhari आज पुन्हा एकदा हे वाचायला घेतलं(नव्याने), खरंतर आजवर या पुस्तकाची अनेक पारायणं केलीत, पण प्रत्येक वेळी वाचताना एका वेगळ्याच विश्वाची अनुभूती होते आणि सुरु होतो एक विलक्षण प्रवास. स्वतःच्या मनाला शोधणारा.
आत्मशोध म्हणजे काय? हे जाणवतं ते फक्त वपुंच्या लिखानातूनच!
आपल्या आजूबाजूला अनेक चांगल्या वाईट घटना अगदी सहज आणि नेमक्या भाषेत मांडणारा हा लेखक मनाला भिडत नसेल तर नवलच..
याबद्दल लिहावं ते कमीच, असं हे प्रत्येकाने आवर्जून वाचावं आणि आपल्या संग्रही ठेवावं असं हे पुस्तक ..
योगायोग..
Mrunal Deshpandekhup mast book ahe .
Swati Joshi अप्रतिम पुस्तक ...केव्हाही कधीही ,कोणतही पान वाचाव अस
Shaikh Gani हे पहिलंच पुस्तक जे मी परत परत वाचेन...
Yogayog Chaudhari वपुर्झा म्हणजे मोरपीस, खुप साऱ्या रंगानी एकरूप..
Prachi Divekar वपुंची बाकी पुस्तकं वाचल्यानंतर वपुर्झा वाचायला आणखी मजा येते.. संदर्भ आठवून त्यात रमायला मस्त वाटतं...
Omkar Shinde वपूंचे विचार Time -travelling आहेत ....प्रत्येक पिढीचा गुरु✍️
Vaishali खूप सुंदर भाषासौन्दर्या आहे ह्या पुस्तकात.
मधुकर धाकरावअप्रतिम.
Amol Korde Nice #VAPU#
Sapanarani Upadhye Amazing book No word
Sonali Lokhandeखरोखरचं अत्तराची कुपी ......
कधीही उघडा प्रत्येक वेळी नवा सुगंध मिळेल......
Akanksha Pande मस्त आहे पुस्तक, कोणतेही पान कधीं ही काढा केव्हा ही वाचा ,फ्रेश वाटेल माझ्या आवडीचे पुस्तक
Amol Korde Must read
NEWSPAPER REVIEWवपुर्झा : कोणतंही पान उघडा नि वाचा!...
मला वाचनाची आवड शालेय जीवनापासूनचीच. मैत्रिणीकडून पुस्तकांची अदलाबदल करून वाचनाची भूक आम्ही भागवत असू. कॉलेजमध्ये असताना ग्रंथालयाच्या माध्यमातूनही अनेक पुस्तके वाचनात आली. मराठी वाङ्मय घेतल्याने वेगवेगळ्या साहित्यप्रकारांचा अभ्यास करता आला. याशिवाय लहानपणी माझ्याकडे आणखी एक काम असे. आजोबांना वृत्तपत्रे वाचून दाखविणे. त्यातही विशेषत: अग्रलेख. त्यामुळे कळत्या वयातच विविध विषय समजत गेले.
असेच एकदा नागपुरात भरलेल्या पुस्तक प्रदर्शनातून पु. ल. देशपांडे आणि व. पु. काळे यांची प्रत्येकी पाच पाच पुस्तके विकत घेतली. त्यातले एक आगळेवेगळे पुस्तक म्हणजे व. पु. काळे यांचे ‘वपुर्झा’. एखाद्या लेखकाची लेखनावरील हुकमत आणि आजूबाजूच्या गोष्टींकडे पाहण्याची नजर किती तीव्र असावी, याचा प्रत्यय ‘वपुर्झा’मुळे आला.
‘वपुर्झा’ हे पुस्तक म्हणजे कोणतंही पान उघडा आणि वाचा! असंख्य विषयांचा उलगडा या पुस्तकातून होतो. हे पुस्तक कोणासाठी आहे विचारले तर, ज्यांना मोत्यातील चमक पाहायची आहे, अशा वेड्यांसाठी हे पुस्तक आहे. कोणत्याही वेळी आपल्या मूडनुसार उघडायचे आणि त्यातील विचारांनी भारावून जायचे. बरेचसे प्रसंग तर जणू काही आपल्या घरात किंवा सभोवतीच घडले असावेत. एवढे जिवंत लेखन या ‘वपूर्झा’त आहे.
या पुस्तकाने मला एवढे झपाटून टाकले, की निसर्गाचा अभ्यास करून सृष्टीच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा योग आला. खरंच, निसर्गात सगळेच अमाप आहे. विराट आहे. अतिप्रचंड आहे. सूक्ष्म असे काहीच नाही. पर्वतराशी जेवढ्या प्रचंड, समुद्र तेवढाच अमर्याद, वनश्री, खळाळत्या नद्या-ओढे हेही तेवढेच सुंदर. शुभ्रधवल. गुलाब जेवढा मोहक, तेवढाच सोनचाफाही धुंद, मयूरनृत्य जेवढे अप्रतिम, तेवढ्याच जलधाराही नितांतसुंदर. या निसर्गाला जपले पाहिजे, याचे भान त्यामुळे मिळाले.
याशिवाय संसार म्हणजे तडजोड, जबाबदारी, नीती-नियमांच्या आधिपत्याखाली येणारा संघर्ष तर आहेच; पण कुटुंबसंस्था हा भारतीयांचा संस्कारही होय. त्यात नात्याचे रेशीमबंध जेवढे नाजूक आहेत, तेवढेच शक्तिशालीही आहेत... असे बरेच काही या पुस्तकातून मनावर बिंबले. व्यक्ती वाचणे, तिचा अभ्यास करणे याची सवय या पुस्तकाच्या वाचनातूनच लागली.
लेखनकला ही सर्वात जुनी आणि श्रेष्ठ कला आहे. जोपर्यंत अचूक शब्द स्फुरत नाही, तोपर्यंत लेखनाचा आनंद लेखकाला व वाचकाला-दोघांनाही मिळत नाही. मात्र, असा आनंद दोघांनाही देते ते ‘वपुर्झा’. ‘जगात कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही आणि म्हणूनही अपूर्णतेत आनंद आहे...’, ‘शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर करून लक्षात ठेवलेली माहिती; पण त्यापलीकडेही व्यवहारात मिळते ते शिक्षण वेगळे आणि महत्त्वाचे...’, ‘भाषा शाळेत शिकविली जाते; पण संवाद मात्र व्यवहारातच कळतो...’ अशी अनेक साधी साधी; पण अर्थपूर्ण वाक्ये विचारप्रवृत्त करतात. खरंच, ‘वपुर्झा’ म्हणजे कुठलंही पान उघडा आणि वाचा... कधी प्रसन्न व्हा, कधी अंतर्मुख व्हा, तर कधी चकित व्हा!
PoojaNice book